AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगराचं नाव द्यावं, गोपीचंद पडळकर यांच्या प्रश्नावर दीपक केसरकर यांनी काय दिलं उत्तर

राज्य सरकारनंही अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्यात यावं, अशी मागणी केली.

या जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगराचं नाव द्यावं, गोपीचंद पडळकर यांच्या प्रश्नावर दीपक केसरकर यांनी काय दिलं उत्तर
गोपीचंद पडळकर
| Updated on: Dec 28, 2022 | 4:35 PM
Share

नागपूर : गोपीचंद पडळकर म्हणाले सभागृहात मी तारांकित प्रश्न टाकलेला होता. देशात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देशात सर्वांना माहीत आहे. अहिल्याबाईंना शस्त्र आणि शास्त्र घेऊन राज्यकारभार केला. काशी विश्वेश्वराच्या मंदिराचे जिर्णोद्धार अहिल्यादेवी यांनी केलेला देशाला माहिती आहे. १२ जोतीर्लिंग घाटबांधणी असे अनेक विषय अहिल्यादेवी यांच्या हातून झालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वेस्वराच्या मंदिरात अहिल्यादेवी यांचा पुतळा तयार केला. केंद्र सरकारनं ही दखल घेतली. राज्य सरकारनंही अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्यात यावं, अशी मागणी केली.

सरकारच्या वतीनं मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रश्नावर उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की,सरकार अहिल्यादेवी यांचं नाव अहमदनगर जिल्ह्याला देण्याबाबत सकारात्मक आहे. तसा अहवाल आयुक्त अहमदनगर, रेल्वे प्रमुख, पोस्ट खात्याचे प्रमुख यांच्याकडून तसा अहवाल मागितला आहे.

अहिल्यादेवी यांचं नाव किती दिवसात देण्यात येईल, असं विचारलं असता येत्या काही दिवसांत कॅबिनेटसमोर हा विषय आणू. परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडं पाठवू, असं सांगण्यात आल्याचंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.सरकारच्या वतीनं सकारात्मक भूमिका घेतली आहे. अहिल्यादेवींवर प्रेम करणाऱ्या जनतेच्या वतीनं सरकारचं अभिनंदन करत असल्याचंही पडळकर म्हणाले.

मराठवाडा मुक्ती संग्रामच्या बाबतीत अग्रेसर भूमिका घेतली ते नवसाजी नाईक. इंग्रज आणि निजामांविरोधत नवसाजी नाईक हे ताकदीनं लढले होते. यांचा इतिहास महाराष्ट्रातील लोकांच्या समोर यावा. इसापूर जलाशयाला नवसाजी नाईक यांना नाव देण्यात यावं. अशी मागणी सभागृहात केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी यालाही सकारात्मक उत्तर दिलं आहे. नामकरण करण्यात येईल, असं उत्तर सरकारच्या वतीनं देण्यात आल्याचंही पडळकर यांनी सांगितलं.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...