AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यात फक्त 20 जणांमध्ये लग्न लागणार, जास्त लोक जमल्यास कारवाई; कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जालना जिल्ह्यात लग्न समारंभात फक्त 20 जणांना परवानगी देण्यात आली आहे. (corona pandemic jalna district collector marriage)

जालन्यात फक्त 20 जणांमध्ये लग्न लागणार, जास्त लोक जमल्यास कारवाई; कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सांकेतिक फोटो
| Updated on: Mar 11, 2021 | 12:27 AM
Share

जालना : कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोनाची (Corona) दुसरी लाट येते की काय याची धास्ती अनेकांनी धरली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांत कडक निर्बंध घलण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यातही कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे येथील जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade) यांनी नव्याने कडक निर्बंध लागू केले आहेत. नव्या निर्बंधानुसार जिल्ह्यात लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी फक्त 20 जणांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, नगरपरिषद हद्दीतील हॉटेल, चहा हॉटेल, खानावळी, बार, रेस्टॉरंट पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे नवे आदेश 31 मार्चपर्यंत लागू असतील. (due to Corona Pandemic Jalna district collector imposes new law and allowed only 20 people in marriage)

लग्न समारंभात फक्त 20 जणांना परवानगी

जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्या अशीच वाढली तर आगामी काळात कोरोनावर नियंत्रण ठेवणे मुश्कील होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील जिल्हाधिकाऱ्यांनी नवे कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. नव्या नियमांनुसार यानंतर लग्नसमारंभास फक्त 20 जणांनाच जमण्यासाठी परवानगी असेल. 20 पेक्षा जास्त नागरिकांनी लग्नसमारंभात भाग घेतल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, जिल्ह्यातील नगरपरिषद, नगर पंचायत हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने रात्री 7 वाजेनंतर बंद ठेवण्यात येणार आहेत.

धार्मिक सभा, मिरवणूक, रॅली बंद

जालना शहरातील सर्व दुकानदारांनी दर 15 दिवसाला कोरोना चाचणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील व्यायामशाळा, जीम पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात धार्मिक सभा, राजकीय सभा, रॅली, मिरवणूक, धरणे, मोर्चे आंदोलनं तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांवरसुद्धा पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. वरील आदेश हे 31 मार्च पर्यंत लागू राहतील. जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी तसे आदेश दिले आहेत.

दरम्यान, राज्यात आज 13,659 नवे कोरोना रुग्ण सापडले.  आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 22,52,057 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 99,008 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.21% पर्यंत खाली आले आहे. तर दिवसभरात राज्यात 54 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.

इतर बातम्या :

विश्वास नांगरे पाटील शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

सात दिवसांत कांदा 21 रुपये प्रतिकिलो स्वस्त; नेमकं असं काय घडलं?

INS Karanj : कलवरी श्रेणीतील INS करंज पाणबुडी नौदलाच्या सेवेत दाखल

(due to Corona Pandemic Jalna district collector imposes new law and allowed only 20 people in marriage)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या