AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळी अधिवेशनावरही पावसाचे सावट, आमदारांना जायचंय मतदारसंघात, अधिवेशनाला चार दिवस सुट्टी

राज्यात पावसाचे प्रमाण वाढले असून काही ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार आपल्या मतदारसंघात जाऊन तेथील नुकसानीचा आढावा घेऊन त्यानंतर ती माहिती सभागृहाला अवगत करून देतील.

पावसाळी अधिवेशनावरही पावसाचे सावट, आमदारांना जायचंय मतदारसंघात, अधिवेशनाला चार दिवस सुट्टी
VIDHAN BHAVANImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 27, 2023 | 4:55 PM
Share

मुंबई । 27 जुलै 2023 : राज्यात पावसाने अनेक जिल्ह्याना झोडपले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाता येत नाही. आढावा घेता येत नाही. त्यामुळे अनेक आमदारांनी अधिवेशन लवकर संपवा अशी मागणी केली होती. विरोधी पक्षाच्या आमदारांनी अधिवेशन पूर्ण काळ चालविण्याची मागणी करत सरकार अधिवेशनापासून पळ काढत असल्याचा आरोप केला. त्यावर आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनाला चार दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षांचे गटनेते उपस्थित होते.

आज घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार असे चार दिवस अधिवेशन होणार नाही. तर, पुढील बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस अधिवेशन होणार आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात पावसाचे प्रमाण वाढले असून काही ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार आपल्या मतदारसंघात जाऊन तेथील नुकसानीचा आढावा घेऊन त्यानंतर ती माहिती सभागृहाला अवगत करून देतील. राज्यातील एकूण नुकसानीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात सर्विस्तर निवेदन करून नुकसानग्रस्तांसाठी मोठी मदत जाहीर करतील अशी माहिती विधानभवनातील सूत्रांनी दिली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.