समृद्धी महामार्गालगत गॅसलाईन फुटल्याने गोंधळ, दुर्गंधीने मोठी वाहतूक कोंडी, मुंबईच्या दिशेची वाहतूक बंद
समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना घटना घडली आहे.या परिसरातून जाणारी गॅस पाईपलाईन लिकेज झाल्याने वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. खबरदारी म्हणून मुंबईच्या दिशेचे वाहतूक बंद करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगराच्या समृद्धी महामार्गालगत जाणारी गॅस पाईपलाईन लिक झाल्याने या परिसरात एकच घबराट पसरली आहे. या गॅस गळतीने महामार्गावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ट्रॅफीक जाम झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, लासूर हडस पिंपळगाव टोलनाक्यावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ४५१.२ येथे गॅस पाईपलाईन लिक झाल्याची घटना घडली आहे.घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, गॅस गळती थांबवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, गॅस गळतीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशातील सर्वात मोठा महामार्ग
मुंबई ते नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग हा ७०१ किलोमीटर लांबीचा असून देशातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे म्हणून ओळखला जातो. हा महामार्ग सहा पदरी असून यामुळे मुंबई ते नागपूर प्रवास आता अवघ्या ८ तासांत पूर्ण होतो.या महामार्गावर वाहनांना कमाल १२० किमी प्रति तास वेगाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील १० प्रमुख जिल्ह्यांमधून आणि ३९० हून अधिक गावांमधून जातो.