AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia Flood : गोंदियातील चुमली नदीत पुन्हा गेला एकाचा जीव, जीवघेणा प्रवास केव्हा संपणार, नागरिकांचा सवाल

दीची पाहणी करत लवकरच नागरिकांना ये-जा करण्याचा मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु, काल पुन्हा चुमली गावातील एका व्यक्तीचा त्या नदीतील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाला.

Gondia Flood : गोंदियातील चुमली नदीत पुन्हा गेला एकाचा जीव, जीवघेणा प्रवास केव्हा संपणार, नागरिकांचा सवाल
गोंदियातील चुमली नदीत पुन्हा गेला एकाचा जीवImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Aug 01, 2022 | 2:31 PM
Share

गोंदिया : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील पालांदूर/जमीनदारी (Palandur -Zamindari) येथून पाच किलोमीटर अंतरावर चुमली गाव आहे. चुमली या गावी परत जात असताना पुन्हा एका व्यक्तीचा नदीतील पाण्याचा प्रवाहात वाहून जीव गेला. ही दुर्दैवी घटना काल घडली. विशेष की दहा दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदार यांनी गावाला भेट दिली. नागरिकांना आश्वासन दिले होते. ही घटना घडली असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. याकडं स्थानिक आमदारांनी लक्ष वेधलं. गावात जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन गेले. प्रशासकीय चमून पाहणी केली. व्यवस्था करण्याची गावकऱ्यांची मागणी लवकरच पूर्ण होईल, असं आश्वासन प्रशासनानं (Administration) दिलं. पण, काल पुन्हा एक नागरिकाचा नदीनं बळी घेतला. या गावात जाण्यासाठी रस्ता खडतर आहे. पुलाची व्यवस्था नाही. त्यामुळ नदी ओलांडून गावात प्रवास करावा लागतो. हा जीवघेणा प्रवास (Fatal Journey) केव्हा संपणार, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला

देवरी तालुक्यातील पालांदूर/जमीनदारीपासून चुमली गावाला जाण्याकरिता रस्ता आणि नदीवर पुल नाही. गावात जाण्यासाठी चुमली नदी ओलांडूनच गावातील नागरिकांना अनेक वर्षापासून ये-जा करावे लागत आहे. यामुळे सतत वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात पर्यायी व्यवस्था नसल्याने काहींचे जीव या चुमली नदीत गेले आहेत. याचीच दखल घेत काही दिवसा अगोदरच जिल्हाधिकारी व संपूर्ण जिल्हा प्रशासनाने चुमली गावातील नागरिकांची भेट घेतली. नदीची पाहणी करत लवकरच नागरिकांना ये-जा करण्याचा मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु, काल पुन्हा चुमली गावातील एका व्यक्तीचा त्या नदीतील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाला.

चिचगड ठाण्यात घटनेची नोंद

मृत व्यक्तीचे नाव मोरेश्वर देवाजी सलामे (वय 38) वर्षे राहणार चुमली आहे. हा व्यक्ती पालांदुर/जमीनदारीवरुन चुमली गावी परत जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनेची नोंद चिचगड पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. मृतदेह ग्रामीण रुग्णालय चिचगड येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले आहे. या घटनेबद्दल सरपंच देवविलास भोगारे यांनी दुःख व्यक्त केलं.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.