AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज, उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत; गुणरत्न सदावर्तेंचा खोचक टोला, म्हणाले दोघेही करमणुकीचं साधण…

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचे संकेत मिळत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सदावर्ते यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज, उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत; गुणरत्न सदावर्तेंचा खोचक टोला, म्हणाले दोघेही करमणुकीचं साधण...
Gunaratna Sadavarte Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 19, 2025 | 9:51 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले आहेत. यावर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी यावरून ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रोडक्शन हाऊसमधील चित्रपटाप्रमाणे ही बातमी तयार करण्यात आली आहे,  अभिनेते महेश मांजरेकरांकडून ठाकरे बंधूंनी चित्रपट बनवला आहे, एक बात कहूंगा, उद्धव ठाकरे, राज ठाकरे कन्फ्यूज, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? 

सदावर्ते यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रोडक्शन हाऊसमधील चित्रपटाप्रमाणे ही बातमी तयार करण्यात आली आहे,  अभिनेते महेश मांजरेकरांकडून ठाकरे बंधूंनी चित्रपट बनवला आहे, एक बात कहूंगा, उद्धव ठाकरे, राज ठाकरे कन्फ्यूज. राजकारणात काय कौटुंबीक असते का? उध्दव ठाकरेंचं राजकारण भाईजानचं राजकारण आहे. राज ठाकरे गले मीलो म्हणत असतील तर, हे दोघेही करमणुकीचं साधण झाले आहेत, असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्याकडे विधानसभेत एकही माणूस नाही, उद्धव ठाकरेंकडे किती लोक राहातील सांगता येत नाही. दोघांचे पक्ष हे गल्लीतील आहेत, गल्लीतून घरापर्यंत हे जातील. लोकांना टोल, ब्रिज सगळं समजलं आहे. हिंदी भाषेच्या फेल्युलर नंतर यांनी गले मीलो गले मीलो सुरू केलं आहे. राज ठाकरे यांचे लोकच याला अभद्र युती म्हणत आहेत. हिंदीचा विरोध फेल जाणार म्हणून महेश मांजरेकर यांच्या मार्फत नवीन प्रोडक्शन सुरू झालं आहे. दोघांचही काही राहीलं नाही, कागदावरची आयडीयॉलॉजी नाही, यांना राजकीय सल्ल्याची गरज आहे, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

युतीचे संकेत

महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वापुढे भांडणं, वाद या क्षुल्लक गोष्टी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.