Vidhan Parishad Election : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा टि्वस्ट, काँग्रेसचा उमेदवार देण्याचा निर्णय, मग दगा-फटका कोणासोबत होणार?

Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक रंजक होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसची भूमिका महत्वाची होती.

Vidhan Parishad Election : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा टि्वस्ट, काँग्रेसचा उमेदवार देण्याचा निर्णय, मग दगा-फटका कोणासोबत होणार?
harshwardhan sapkal
| Updated on: Apr 30, 2026 | 10:39 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा टि्वस्ट आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीने एकमताने उद्धव ठाकरे यांचं समर्थन केलं होतं. उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असतील तर आमचा पाठिंबा आहे असं काँग्रेसने आधीच स्पष्ट केलं होतं. पण उद्धव ठाकरे विधान परिषदेवर न जाण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून काल अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज सकाळी माध्यमांशी बोलले. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.

विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार देणार आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत टि्वस्ट आला आहे. काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर एकूण 10 उमेदवार होतील. भाजपचे पाच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि मविआचा एक उमेदवार विधान परिषदेवर सहज निवडून येऊ शकतो. पण आता काँग्रेसने 10 वा उमेदवार दिल्यास एक उमेदवार पडणार? हे निश्चित आहे. तो उमेदवार अर्थाच मविआचा असू शकतो. विधान परिषदेच्या एका जागेसाठी 28 मतांचा कोटा आहे. महायुतीकडे त्यांचे आठ उमेदवार निवडून आणण्याइतका कोटा आहे.

मग या भांडणात सरशी कोणाची होणार?

मविआचे एकूण 46 आमदार विधानसभेत आहेत. त्यामुळे त्यांचा एक उमेदवार विधान परिषदेवर जाऊ शकतो. त्यांना दोन उमेदवार निवडून आणायचे असतील तर अतिरिक्त 10 मतांची बेगमी करावी लागेल. काँग्रेस जर स्वत:चा उमेदवार देणार असेल, तर त्यांच्याकडे फक्त 16 आमदार आहेत. पण अजून 12 मतांची गरज आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 20 आमदार आहेत. त्यांना सुद्धा 8 मतांची गरज आहे. मग या भांडणात सरशी कोणाची होणार? कारण महायुतीने अतिरिक्त उमेदवार उतरवण्याचा अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाही. त्यांनी अतिरिक्त उमेदवार दिला तर मतांची फाटाफूट निश्चित आहे. काल रात्री अतिरिक्त उमेदवार देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री हजर होते.

भाजपचे उमेदवार कोण?

सुनील कर्जतकर, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील भेंडे, विवेक कोल्हे

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार कोण?

निलम गोऱ्हे किंवा शितल म्हात्रे यांच्यापैकी एक

बच्चू कडू यांना मिळू शकते उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

झीशान सिद्दीकी उमेदवार

उद्धव ठाकरे गट

अंबादास दानवे उमेदवार

Follow Us