AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पुढील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

maharashtra rain news today in marathi : महाराष्ट्रात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे, तर काही जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी सुरु आहेत. पुढील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जाहीर केला आहे.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पुढील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Alert
| Updated on: Aug 03, 2023 | 11:53 AM
Share

महाराष्ट्र : संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जूलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली. मान्सून (Maharashtra Rain Update) संपूर्ण राज्यात सक्रीय झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्याचबरोबर काही जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. ज्या भागात मुसळधार पाऊस (Maharashtra Rain Alert) झाला आहे. तिथली धरणं भरली आहेत. काही धरण कधीही भरु शकतात अशी स्थिती आहे.त्यामुळे यापुढे मुसळधार पाऊस झाल्यास धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येणार आहे. यापुर्वी रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. सकाळपासून जिल्ह्यात पाऊस (maharashtra rain news today in marathi) सुरु झाला आहे. खाडीपट्यात पावसाचा जोर अधिक आहे. जूनपासून आत्तापर्यंत पावसाने सव्वा दोन हजार मिलिमीटरची सरासरी ओलांडली आहे.

अकोला जिल्ह्यात गेल्या महिन्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. तर काही ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीची कामे खोळंबली होती. तर आता पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा आपल्या शेतीच्या अंतर्गत मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. फवारणी, खुरपनी, डवरणी यासारख्या कामांना वेग आला आहे. तर शेतातील पिके शेतात मोठ्या थाटात डोलतांना दिसत आहे.

अमरावती जिल्ह्यात पावसाची उसंत मिळाल्यानंतर शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण शेतीची कामे खोळंबली होती. मात्र आता पावसाने उसंत दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा आपल्या शेतीच्या मशागतीच्या कामात गुंतला असल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या पाच सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पिकामध्ये तण वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त होऊन आर्थिक संकटात सापडला शेतात मोठ्या प्रमाणात तण वाढल्यामुळे पिकांवर परिणाम होत असल्याने आज पावसाच्या विश्रांतीनंतर शेतकरी राजा शेती मशागती कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम मिळालं आहे..

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण…

गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र काल सायंकाळपासूनच पावसाची रिप रिप सुरू झाली असून सकाळी सुद्धा ही रिपरिप सध्या कायम आहे. हलक्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षीय तुलनेत जुलैपर्यंत जिल्ह्यात 125 मिलिमीटर पावसाची तूट आहे मात्र रात्रीपासून येणाऱ्या पावसामुळे ही तूट भरून निघण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....