AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ खडसे यांच्याबाबतचा प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट; शरद पवारांशी काय झाला होता संवाद?

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज रावेरमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. हा हल्ला चढवतानाच त्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरही जोरदार टीका केली. एकनाथ खडसे हे भाजप सोडणारच होते. सुनेला तिकीट जाहीर झाल्यानंतर खडसे राष्ट्रवादीत थांबणारच नव्हते, असा दावाच प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांच्याबाबतचा प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट; शरद पवारांशी काय झाला होता संवाद?
प्रकाश आंबेडकर
| Updated on: May 03, 2024 | 3:31 PM
Share

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्याविषयी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीत रावेर लोकसभेची जागा एकनाथ खडसे यांच्यासाठी सोडण्यात आली होती. पण खडसे पक्ष सोडून जाणार होते. सुनेला जागा मिळाल्यानंतर सासरे थोडेच थांबणार होते. शरद पवार यांना माझं आवाहन आहे. तुमच्याकडे एखादी मशीन आहे का? मशीनमध्ये टाकल्यावर नेते साफ होतील अशी, अशी उपरोधिक टिप्पणी करतानाच एकनाथ खडसे यांना पक्षात घेऊ नका, असं मी शरद पवार यांना सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर आज रावेरमध्ये आहेत. रावेरमध्ये प्रचार रॅलीला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एकनाथ खडसे यांना सर्व कळतं. खडसेंनी स्वत:च्या वापरासाठी बरोबर हुशारी केली. एकनाथ खडसे राष्ट्रवादीतून उठले आणि पुन्हा भाजपात गेले आणि हे नीतिमत्तेचे राजकारण करतात. खडसे यांनी आयाराम गयारामचं राजकारण केलं, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

पाकिस्तानातून खोके आले तरी घेतील

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली. पाकिस्तान आणि अमेरिकेतून खोके आले तरी हे लोक घेतील, असा हल्ला करतानाच अशा लोकांपासून सावध राहण्याचा सल्लाही आंबेडकर यांनी दिला.

तुम्हाला रस्त्यावर बसावं लागेल

शेतकरी जेव्हा दिल्लीला उपोषणाला बसले तेव्हा मोदी काय करत होते? मोदी घरामध्ये बसून बिन वाजत बसले होते. मात्र शेतकऱ्यांना ते भेटले नाहीत. पुन्हा तुम्हाला भाजपचं सरकार आणायचं का? तुम्हाला रस्त्यावर बसावं लागेल, असंही ते म्हणाले.

शेतकरी प्रचंड हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाला कुठे हमीभाव मिळाला नाही. मुख्यमंत्री त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. देशातील घराणेशाही आधी संपवा, मगच लोकशाही वाचेल. सध्या लोकशाही संपत चालली आहे. मोदी 2014 पासून झाले. तेव्हापासून 17 लाख नागरिक देश सोडून गेले आहेत. हे सरकार वसुली करणारं सरकार आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

मोदींनी सर्व विकलं

पंतप्रधानाचा कार्यालय हे वसुली करण्याचा कार्यालय झालं आहे.व्यापाऱ्यांवर धाडी टाण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढे तुमच्यावर धाडी पडणार आहेत. मोदी हे कर्ज काढत गेले आणि आपल्याला बुडवत गेलेत. एखाद्याने घरदार विकावं असं सुरू आहे. देशातील कंपन्या विकल्या आहेत. मोदींना पुन्हा एकदा पाच वर्ष आपण दिले तर आपल्याला सावकारापुढे झुकावं लागेल अशी परिस्थिती राहील, असंही ते म्हणाले.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.