Weather Updates : अवकाळीचं संकट टळणार ? पण दिलासा नाहीच, हवामान विभागाच नवा अलर्ट

गेल्या काही काळापासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून अवकाळी पावासाने राज्यातील अनेका भागांना झोडपून काढलं. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. बुधवार, 8 एप्रिल रोजी राज्यातलं वातावरण कसं असेल ?

Weather Updates : अवकाळीचं संकट टळणार ? पण दिलासा नाहीच, हवामान विभागाच नवा अलर्ट
आज कसं असेल हवामान ?
| Updated on: Apr 08, 2026 | 8:04 AM

गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रातील विविद भागात अवकाळीचं संकट घोंगावत आहे. पाऊस, गारपीट यामुळे पिकांनाही मोठा फटका बसला असून शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. पावसाच्या संकटामुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी डोक्याला हात लावून बसला होता. मात्र आता राज्यात हवापालट होत असल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वमोसमी पावसाच्या उघडिपीनंतर उन्हाचा चटका वाढू लागला आहे. आज राज्याला पावसाचा कोमताही मोठा अलर्ट नाही, मात्र असं असलं तरी राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान मुख्यतः कोरडे आणि उन्हाळी असेल. अवकाळी पावसाचे प्रमाण कमी झाले असून तापमानात हळूहळू वाढ होऊ शकते.

उन्हाचा पारा चढणार, दुपारी बाहेर पडणे टाळा

राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे सूर्य डोक्यावर आलयावर, दुपारी घराबाहेर पडणं नागिरकांसाठी अशक्य होत आहे. मुंबईसह कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. अवकाळीचा धोका टळला असून उन्हाचा पारा चढला आहे. आज पावसाची शक्यता नाही. हवामान कोरडं, उष्ण आणि दमट राहील. कमाल तापमानाचा पारा 31-35 अंशांच्या दरम्यान राहील. पुढील काही दिवसांत तापमान 2-3 ते अंशांनी वाढू शकतं. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, उन्हात बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आलं आहे.

देशात काय परिस्थिती ?

देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये हवामान बदललं आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये जोरदार वारे आणि पाऊस सुरू आहेत. आज दिल्ली आणि इतर अनेक राज्यांमध्येही असेच हवामान अपेक्षित आहे. रविवारी रात्री दिल्लीतील हवामान मुसळधार पाऊस आणि वादळी पावसामुळे बिघडलं. हवामान विभागाने या हवामान घडामोडी लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज, ८ एप्रिल रोजीही शहरात पाऊस आणि वादळी पावसासह वादळी हवामानाचा अंदाज आहे. सकाळ ते संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याचा (३०-४० किमी प्रति तास) अंदाज आहे. संध्याकाळी वाऱ्याचा वेग आणखी वाढू शकतो. मात्र, उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून हवामान सुधारेल.

दिल्ली व्यतिरिक्त, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्कायमेट वेदरनुसार, आज जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर आणि पूर्व राजस्थान, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये विखुरलेला पाऊस, मेघगर्जनेसह पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

आज, म्हणजेच बुधावर ८ एप्रिलच्या सकाळपर्यंत, राजस्थानच्या बहुतांश भागात हवामान निरभ्र होऊ लागेल आणि मुख्य घडामोडी हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या तराई प्रदेशाकडे सरकतील. उद्या, गुरूवार 9 एप्रिल रोजी, उत्तर प्रदेशच्या तराई प्रदेशात हवामानाचा प्रभाव सौम्य राहील, तर उर्वरित भागात हवामान निरभ्र राहील.

Follow Us