AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना इतक्या कोटींची मदत, मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला निर्णय

नियोजन कसं होणार याचा विचार केला. हजारो लाखो लोकं शासन आपल्या दारीमध्ये हजेरी लावू लागले. निर्णय, योजना, लाभ हे सर्व एका छताखाली घेण्याचा निर्णय सरकारने घेतला.

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना इतक्या कोटींची मदत, मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला निर्णय
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jun 13, 2023 | 7:00 PM
Share

प्रतिनिधी, कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासन आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोल्हापूरची माती छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आहे. कुठलंही संकट आलं तरी कोल्हापूरकर संकटावर यश मिळवतो. कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्यांमध्ये काहीतरी नवीन करून दाखवायचं असते. जलसिंचनाची सुरुवात कोल्हापुरातून झाली. शक्ती आणि भक्तीचा संगम येथे आहे. शासन आपल्या दारी आहे. सरकारने ही योजना कोल्हापूरकरांसाठी सुरू केली आहे. मुंबई-कोल्हापूर अंतर दूर आहे. प्रवासाला ८ ते १० तास लागतात. त्यामुळे जाणार केव्हा, काम करून घेणार कधी. म्हणून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी विचार केला. सर्वसामान्यांसाठी आपल्या योजना मिळाव्या, म्हणून ही संकल्पना पुढे आली.

नियोजन कसं होणार याचा विचार केला. हजारो लाखो लोकं शासन आपल्या दारीमध्ये हजेरी लावू लागले. निर्णय, योजना, लाभ हे सर्व एका छताखाली घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. लागणारी कागदपत्र ही फार मोठा खटाटोप लागतो. पण, या सरकारने अनेक योजना राबवल्या. दीड लाख लाभार्थ्यांची नोंद कोल्हापुरात झाल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

२९ सिंचन प्रकल्प मंजूर केले

एका ड्रोनने तीन मिनिटात एक एकराचे शेत फवारून होणार आहे. शेतकरी आधुनिक शेतीकडे वळतो आहे. आधीच्या सरकारने एकही सिंचनाचा प्रकल्प मंजूर केला नव्हता. आमच्या सरकारने २९ सिंचनाचे प्रकल्प मंजूर केले. सहा ते सात लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

लेक लाडकी लखपती

महिलांसाठी लेक लाडकी लखपती, जन्म पाच हजार, पहिली पाच हजार, सातवीत सात हजार, अकरावीत गेली आठ हजार आणि अठराव्या वर्षी ७५ हजार अशी एक लाख रुपये देणारी योजना आपल्या सरकारने पहिल्यांदा सुरू केली. पीएम यांचे सहा हजार होते. त्याच धरतीवर नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली. आता शेतकऱ्यांना १२ हजार रुपये सन्मान निधी मिळणार आहे.

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Follow Us
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....