Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो घराबाहेर पडणे टाळाच… पुढील 3 तास संकट, अलर्ट जारी..
Mumbai Rain Alert : भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला. पुणे, रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला.

Mumbai Rain Alert : राज्यात दमदार पावसाला सुरूवात झाली. मुंबईमध्ये तर सतत पाऊस कोसळत आहे. त्यामध्येच आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. आज भारतीय हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला. गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून थांबण्याचे नाव घेत नाही. नुकताच मंत्रालयाकडून मुंबईसह उपनगरे, पालघर आणि ठाण्यात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा पुढील 3 तासांसाठी दिला आहे. मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली. अंधेरीचा सबवे बंद आहे. पूर्ण पाणी तिथे साचले आहे. काल अनेक भागात झाड कोसळण्याच्या घटना घडल्या. दक्षिण मुंबई परिसरात जोरदार पावसाला सुरवात झाली. गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. प्रशासनाने मुंबईकरांना अतिमहत्वाच्या कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.
ठाण्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काल रात्रीपासून पावसाची संतातधार सुरु होती. काल रात्री 12 वाजल्या पासून 26 मिलिमिटर पावसाची नोंद झाली तर दिवसभरात 84 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. आज दिवसभर ठाण्यात मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी परिसरात अनेक भागात पाणी साचले आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
वांद्रेतील कलानगर परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. विविध भागात पाणी साचले आहे. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल रात्रीपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम अंधेरी सबवेमध्ये दिसून येत आहे. पाणी निचरले की, पुन्हा अंधेरी सबवे सुरू करण्यात येईल.
दुसरीकडे लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावताना दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने केला. कोकणात तर पावसाचा धुमाकूळ बघायला मिळतोय. पुढील काही दिवस पाऊस अशाचप्रकारे सुरू राहण्याचा अंदाज आहे. पुढील 4 दिवसांकरिता पावसाचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला. राज्यात पावसाचा जोर वाढत आहे.