Rain Update : राज्यावर मोठं संकट! पावसाचा धुमाकूळ, थेट इशारा, घरातून बाहेर निघताना..

Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वदूर पाऊस कोसळताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढेल.

Rain Update : राज्यावर मोठं संकट! पावसाचा धुमाकूळ, थेट इशारा, घरातून बाहेर निघताना..
Rain Update
| Updated on: Jun 30, 2026 | 7:28 AM

राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. अखेर राज्यात सर्वदूर मॉन्सून दाखल झाला. मुंबईमध्ये रात्रभर पाऊस सुरू होता. सकाळीही पावसाची रिपरिप सुरू आहे. कालपासून पाऊस सतत कोसळत आहे. राज्यभरात पावसाने हजेरी लावली. शेतकरीही समाधानी आहेत. पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस कोसळत आहे. यंदा राज्यात तब्बल 15 दिवस उशिराने पाऊस दाखल झाला. सध्या पावसाची बॅटिंग जोरदार बघायला मिळत आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणात पावसाचा धुमाकूळ बघायला मिळत आहे. कोकणात अनेक भागात अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरीच्या खेर्डी येथे 197 मिलिमीटर, धामनंद येथे 192 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कोलाड, इंदापूर, तुडील, महाड, देवगड, चिपळून, देवरूख मंडनगड या भागात जोरदार पाऊस झाला. कोकणात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याचे दिसतंय. कोकण, घाटमाथ्यावर भारतीय हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासोबत पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. पूर्व पश्चिम कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्र ते पूर्वमध्य अरबी समुद्रापर्यंत हवेत तयार झाला.

ज्यामुळे पुढील काही दिवस पाऊस राहण्याचा अंदाज आहे. मुंबई, पुणे, ठाणे, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला. पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, छत्तीसगड या भागात मॉन्सूनने वाटचाल केली. मॉन्सूनला पोषक वातावरण असून दोन ते तीन दिवसात उत्तर अरबी समुद्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात मॉन्सून पुढे सरकण्याची शख्यता आहे.

गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्री दोन वाजल्यापासून सुमारे दोन तास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतरही जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे.  या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, पावसामुळे शेतजमिनीत ओलावा निर्माण झाल्याने खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us