AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Alert : राज्यात पुन्हा कोसळणार पाऊस, थेट गारपिटीचाही इशारा, तब्बल…

Weather Update Maharashtra : मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सतत हजेरी लावत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. सतत पाऊस कोसळत असल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.

Maharashtra Weather Alert : राज्यात पुन्हा कोसळणार पाऊस, थेट गारपिटीचाही इशारा, तब्बल...
Weather Update Maharashtra
| Updated on: Apr 01, 2026 | 7:12 AM
Share

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात काल जोरदार पावसाने हजेरी लावली. यासोबतच गारपिटीचाही तडाखा बसला. भारतीय हवामान विभागाकडून आजही मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. गारपिटीसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. आज राज्यातील उर्वरित भागात ढगाळ वातावरण राज्याची शक्यता आहे. धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला. बाकी उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. आता एप्रिल महिन्याला सुरूवात झाली आहे, पण पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात सतत पाऊस कोसळताना दिसत आहे.

या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्टसह पावसाचा येलो अलर्ट जारी केला. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर, सामोडे, चिकसे, देशशिरवाडे, झंझाळे, देगाव, गव्हाणी पाडा, घोडदे आदी परिसरात काल संध्याकाळी झालेल्या बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. कांदा, मका, गहू, टरबूज हरभरा तसेच फळबागा आंबे यांना मोठा फटका बसला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर आज महसूल विभागाने तत्काळ हालचाल करत सामोडे परिसरात पंचनामे करण्यास सुरुवात केली प्रत्यक्ष शेतबांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. सटाणा तालुक्यात अक्षरश: वादळी वाऱ्यासह झालेल्या लिंबू , बोराच्या आकाराच्या गारांनी होत्याचे नव्हते झाले. गहू आडवा झाला तर या भागातील प्रमुख कांदा पिकाला मोठा फटका बसला असून काढणीला आलेला उन्हाळी कांदा नेस्तनाबूत झाला आहे.

उन्हाळी कांदा या भागातील महत्वाचे पिक आहे. त्यावर बळीराजाचे वार्षिक गणिते अवलंबून असतात. उधार उसनवार करून महागडे औषध फवारणी करून त्यांनी पोटाच्या मुलाच्या जिवापाड कांदा जपला होता. त्याला एकरी सत्तर हजार रुपये खर्च आला. आठ ते पंधरा दिवसांनी कांदा काढणीला होता.मात्र गारपिटीने होत्याचे नव्हते झाले. त्यामध्येच आजही हवामान विभागाने मोठा इशारा दिला.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.