
राज्यासह देशातील हवामानात मोठा बदल होत आहे. थंडी, पाऊस आणि उन्हाळा अशा तिन्ही हंगामाचा अनुभव घेता येतोय. सकाळी थंडी आणि दुपारी कडाक्याचे उन्ह अशी स्थिती आहे. यादरम्यानच राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात मोठा अवकाळी पाऊस झाला, त्याचा परिणाम शेतीवर झाला हाताशी आलेले शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले. पुढील दोन दिवसात राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे अजूनही थंडी गायब आहे. पण राज्यातील थंडी जवळपास गेली. पहाटे थोडासा गारठा जाणवत आहे. फेब्रुवारी महिन्यातही अनेक भागात पाऊस हजेरी लावताना दिसतोय. यादरम्यानच राज्यातील काही शहरातील वायू प्रदूषण हा गंभीर मुद्दा बनला. मुंबईमध्ये वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले असून हवा घातक बनली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण आहे. उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असतानाच राज्यात पाऊस हजेरी लावणार आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. यासोबतच वातावरणात सतत चढउतार बघायला मिळेल. विजांच्या कडाकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.
धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 14 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ब्रह्यपुरी येथे 36.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. यासोबतच पुढील काही दिवसात राज्यात उन्हाचा चटका अधिक वाढण्याची शक्यता आहे. फक्त राज्यातच नाही तर पंजाब, हरियाणा, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या भागातही पावसाचा अंदाज आहे.
डिसेंबर महिन्यातच राज्यात थंडी बघायला मिळाली. त्यानंतर राज्यातील थंडी कमी होताना दिसली. 1 जानेवरी 2026 रोजी राज्यात मोठा अवकाळी पाऊस झाला. या पावसानंतर थंडी जवळपास गायब झाली. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने अगोदरच वर्तवला होता. मात्र, आता फेब्रुवारी महिन्यात चक्क पाऊस होताना दिसत आहे.