AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील 24 तास धोक्याची, हवामान विभागाचा मोठा इशारा, राज्यातील तापमान…

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. पुढील 24 तास तापमान नक्की कसे असणार हे जाणून घ्या.

पुढील 24 तास धोक्याची, हवामान विभागाचा मोठा इशारा, राज्यातील तापमान...
Indian weather
| Updated on: Feb 17, 2026 | 7:27 AM
Share

मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी थंडी तर कधी उकाडा अशी स्थिती आहे. मध्ये कधी पाऊसही होतो. वातावरणातील बदलाचा आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. त्यामध्येच आता फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे. दुपारी कडक उन्हाळा जाणवत आहे. फक्त डिसेंबर महिन्यात म्हणावी तशी थंडी पडली. नोव्हेंबर महिन्यातही पाऊस सुरू होता. उत्तरेकडील काही राज्यात अजूनही थंडीचा कडाका कायम आहे. राज्यातील अनेक भागात म्हणावी तशी थंडी यंदा पडली नाही. मात्र, वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे बघायला मिळाले. मुंबई, पुणे आणि दिल्लीतील हवा घातक बनली. मुंबईमध्ये अजूनही वायू प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यादरम्यानच आता भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी मोठा इशारा दिला. कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाच्या झळा वाढणार आहेत.

उन्हाच्या झळा वाढण्याची शक्यता असतानाच कोकणात दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. देशातील नीचांकी तापमानाची नोंद पंजाबच्या भटिंडा येथे झाली. भटिंडा येथे 6.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून निफाड येथे 11.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

पुढील काही दिवसात उन्हाचा चटका अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. राज्यात जरी उन्ह वाढत असले तरीही काही राज्यात अजूनही थंडी आणि पाऊस कायम आहे. केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. सध्याचा उन्हाळा बघता राज्यात पुढील काही दिवस उन्हाचे चटके अधिक बसणार हे स्पष्टच आहे.

भारतीय हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीलाच सांगितले होते की, फेब्रुवारी महिन्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल. त्याप्रमाणे सध्या तापमानात चढउतार सुरू आहे. मध्येच कडाक्याची थंडी सकाळच्या वेळी पडते तर दुपारी उन्हाचा चटका अधिक जाणवतो. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील काही दिवस कमाल तापमानात मोठी वाढ होईल.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा