पुढील 24 तास धोक्याची, हवामान विभागाचा मोठा इशारा, राज्यातील तापमान…
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. पुढील 24 तास तापमान नक्की कसे असणार हे जाणून घ्या.

मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी थंडी तर कधी उकाडा अशी स्थिती आहे. मध्ये कधी पाऊसही होतो. वातावरणातील बदलाचा आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. त्यामध्येच आता फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे. दुपारी कडक उन्हाळा जाणवत आहे. फक्त डिसेंबर महिन्यात म्हणावी तशी थंडी पडली. नोव्हेंबर महिन्यातही पाऊस सुरू होता. उत्तरेकडील काही राज्यात अजूनही थंडीचा कडाका कायम आहे. राज्यातील अनेक भागात म्हणावी तशी थंडी यंदा पडली नाही. मात्र, वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे बघायला मिळाले. मुंबई, पुणे आणि दिल्लीतील हवा घातक बनली. मुंबईमध्ये अजूनही वायू प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यादरम्यानच आता भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी मोठा इशारा दिला. कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाच्या झळा वाढणार आहेत.
उन्हाच्या झळा वाढण्याची शक्यता असतानाच कोकणात दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. देशातील नीचांकी तापमानाची नोंद पंजाबच्या भटिंडा येथे झाली. भटिंडा येथे 6.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून निफाड येथे 11.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
पुढील काही दिवसात उन्हाचा चटका अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. राज्यात जरी उन्ह वाढत असले तरीही काही राज्यात अजूनही थंडी आणि पाऊस कायम आहे. केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. सध्याचा उन्हाळा बघता राज्यात पुढील काही दिवस उन्हाचे चटके अधिक बसणार हे स्पष्टच आहे.
भारतीय हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीलाच सांगितले होते की, फेब्रुवारी महिन्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल. त्याप्रमाणे सध्या तापमानात चढउतार सुरू आहे. मध्येच कडाक्याची थंडी सकाळच्या वेळी पडते तर दुपारी उन्हाचा चटका अधिक जाणवतो. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील काही दिवस कमाल तापमानात मोठी वाढ होईल.
