AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजही तो कोसळणार.. पावसाचा अलर्ट, वातावरणात होणार मोठा बदल, थेट..

हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आजही काही भागात पावसाचा मोठा इशारा दिला. पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.

आजही तो कोसळणार.. पावसाचा अलर्ट, वातावरणात होणार मोठा बदल, थेट..
Rain
| Updated on: Apr 07, 2026 | 7:04 AM
Share

राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस सतत हजेरी लावताना दिसत आहे. पावसामुळे मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. अवकाळी पाऊस राज्यातून जाण्याचे नाव घेत नाही. गारपिटीसह पाऊस होताना दिसत आहे. त्यामध्येच आजही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. आज राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल. काही भागात उष्णता वाढण्याचे संकेत आहेत. गेल्या आठ दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून अवकाळीचे ढग राज्यावर होते. आता कुठे अवकाळी पाऊस कमी होताना दिसत आहे. मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. गडचिरोली आणि चंद्रपूर सोडले तर राज्यातील इतर भागात आज उष्णता वाढण्याचे संकेत आहेत.

अनेक दिवसानंतर पावसापासून दिलासा मिळत आहे. रब्बीचे हाताशी आलेले पिक शेतकऱ्यांचे गेले. अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोल्यात 37.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद महाबळेश्वर येथे झाली. महाबळेश्वर येथे नीचांकी 13.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सोलापूरमध्येही कडाक्याचे उन्ह होते. सोलापूरात 37 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान नोंदवले गेले.

जळगाव जिल्ह्यातील आंबा उत्पादकांनाही अवकाळी आणि वादळाचा फटका बसला. पंचनामे करून मदतीची मागणी आंबा उत्पादक शेतकऱ्याकडून होत आहे. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादक शेतकरी आहेत. सलग दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस आणि वादळी वारा यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून शेतकरी चिंतेत आहेत.

नाशिकच्या निफाड तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांना मोठा फटका बसला. कोटमगाव येथील शेतकऱ्याच्या टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने आता तोंडाशी आलेला घास हिरावला. गेल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामध्येच आजही काही भागात पाऊस पडणार आहे.

Follow Us
बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिला, शरद पवारांचं मत काय? म्हणाले निवडणुक
बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिला, शरद पवारांचं मत काय? म्हणाले निवडणुक.
हिगोलीत शेतीला अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठीने हाताशी आले
हिगोलीत शेतीला अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठीने हाताशी आले.
अशोक खरात प्रकरण तापलं; सुषमा अंधारेंची CID चौकशीची मागणी
अशोक खरात प्रकरण तापलं; सुषमा अंधारेंची CID चौकशीची मागणी.
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर फुल्या कोणी मारल्या? - सुषमा अंधारे
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर फुल्या कोणी मारल्या? - सुषमा अंधारे.
अजितदादांच्या अपघाताच्या आदल्यादिवशी भोंदू खरातला 17 मेसेज कुणाचे?
अजितदादांच्या अपघाताच्या आदल्यादिवशी भोंदू खरातला 17 मेसेज कुणाचे?.
मोठी खळबळ! दिल्ली विधानसभा परिसरात अज्ञात कार थेट आत घुसली अन्...
मोठी खळबळ! दिल्ली विधानसभा परिसरात अज्ञात कार थेट आत घुसली अन्....
सरकार 6 महिन्यांआधीच पडलं असतं; शिरसाट यांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
सरकार 6 महिन्यांआधीच पडलं असतं; शिरसाट यांच्या दाव्याने राजकारणात खळबळ.
मित्रानेच गोणीत भरलं अन् हत्या केली, शोभायात्रेतून बेपत्ता झालेल्या 14
मित्रानेच गोणीत भरलं अन् हत्या केली, शोभायात्रेतून बेपत्ता झालेल्या 14.
राजकारणात मोठे भूकंप होण्याची सुरूवात, पटोलेंच्या सूचक विधानाचा....
राजकारणात मोठे भूकंप होण्याची सुरूवात, पटोलेंच्या सूचक विधानाचा.....
सर्वच मर्यादा ओलांडल्या! खरातचा नवा प्रताप उघड, 13वा गुन्हा दाखल
सर्वच मर्यादा ओलांडल्या! खरातचा नवा प्रताप उघड, 13वा गुन्हा दाखल.