AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे प्रवाशांनो प्लॅन बदला… रेल्वे प्रवासात अचानक मोठे बदल, अनेक गाड्या रद्द; नेमकं काय घडलं?

राजनांदगाव-कलमना रेल्वे मार्गावर तिसऱ्या लाईनच्या जोडणीसाठी ८ दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे २४ ते ३१ जानेवारी दरम्यान १४ महत्त्वाच्या मेमू आणि पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

रेल्वे प्रवाशांनो प्लॅन बदला... रेल्वे प्रवासात अचानक मोठे बदल, अनेक गाड्या रद्द; नेमकं काय घडलं?
indian railways
| Updated on: Jan 21, 2026 | 10:11 AM
Share

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि तितकीच चिंतेची बातमी आहे. नागपूरच्या राजनांदगाव ते कलमना दरम्यान रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे काम सुरू होणार आहे. या कामामुळे रेल्वे प्रशासनाने २४ जानेवारी ते ३१ जानेवारी या ८ दिवसांच्या कालावधीत १४ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) विभागात पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. राजनांदगाव ते कलमना दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनच्या जोडणीचे (Non-Interlocking work) काम सुरू करण्यात आले आहे. या तांत्रिक कामामुळे २४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या दरम्यान रेल्वे वाहतुकीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

आतापर्यंत किती गाड्या रद्द?

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राजनांदगाव-कलमना हा विभाग अत्यंत गजबजलेला असून येथे गाड्यांचा वेग आणि क्षमता वाढवण्यासाठी तिसरी लाईन जोडणे आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक विस्कळीत होणार असली तरी भविष्यात रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. सध्या ऐन प्रवासाच्या दिवसांत गाड्या रद्द झाल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे नियोजन कोलमडणार आहे.

यामुळे रद्द करण्यात येणाऱ्या १४ गाड्यांमध्ये प्रामुख्याने लोकल पॅसेंजर आणि मेमू (MEMU) गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या २४ जानेवारी ते ३१ जानेवारी या ८ दिवसांच्या कालावधीत धावणार नाहीत.

  • तुमसर रोड-तिरोडी पॅसेंजर (सर्व फेऱ्या)
  • तिरोडी-तुमसर रोड पॅसेंजर
  • इतवारी-तिरोडी पॅसेंजर
  • बालाघाट-इतवारी-तिरोडी मेमू स्पेशल
  • दुर्ग-गोंदिया मेमू पॅसेंजर
  • गोंदिया-दुर्ग मेमू पॅसेंजर
  • इतवारी-गोंदिया मेमू
  • गोंदिया-इतवारी मेमू
  • डोंगरगड-गोंदिया मेमू स्पेशल
  • गोंदिया-डोंगरगड मेमू स्पेशल

रेल्वे विभागाचे प्रवाशांना आवाहन

तसेच काही गाड्या त्यांच्या पूर्ण मार्गावर न धावता अर्ध्यावरच थांबवल्या जातील. ज्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा फटका बसेल.  तुमसर रोड ते तिरोडी दरम्यान धावणाऱ्या सर्व डेमू (DEMU) गाड्या या प्रवासाच्या मध्यभागी थांबवल्या जातील. तर बालाघाट ते तिरोडी दरम्यानच्या डेमू गाड्या देखील त्यांच्या शेवटच्या स्थानकापर्यंत पोहोचणार नाहीत.

या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, रेल्वे स्थानकावर येण्यापूर्वी १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा रेल्वेच्या अधिकृत ॲपवर आपल्या ट्रेनची खात्री करून घ्यावी. रद्द केलेल्या गाड्यांच्या जागी प्रवाशांना पर्यायी खासगी वाहनांचा किंवा बसचा आधार घ्यावा लागणार आहे.

Follow Us
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...