AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, शिवसेना नेत्याच्या मनात खदखद, गोगावले बीडच्या दौऱ्यावर असताना नेमकं काय घडलं?

मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना नेत्याकडून भरत गोगावले यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार करण्यात आली आहे. आपल्याला न्याय मिळत नसल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, शिवसेना नेत्याच्या मनात खदखद, गोगावले बीडच्या दौऱ्यावर असताना नेमकं काय घडलं?
BHARAT GOGAWALEImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 14, 2026 | 9:29 AM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. पुन्हा एकदा महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी गेवराई शहरात आयोजित पक्षाच्या बैठकीमध्ये बीडचे गेवराई विभाग जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले यांनी गोगवले यांच्याकडे राष्ट्रवादीची तक्रार केली आहे. इथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजय पंडित आहेत. त्यामुळे न्याय मिळत नाही, असं यावेळी चंद्रकांत नवले यांनी म्हटलं आहे. मात्र जरी असं असलं तरी देखील आपण पक्षवाढीसाठी काम करणार आहोत आणि मरेपर्यंत आपण शिवसेनेतच राहू असंही ते यावेळी म्हणाले.

गोगावले यांनी यावेळी चंद्रकांत नवले यांची तक्रार ऐकून घेतली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की,   हरकत नाही आपला आमदार नाही. जिथे आपला आमदार नाही तिथे काय अडचणी येतात हे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला ताकद देण्यासाठीच मी इथे आलो आहे. आपल्याला संघटनेला मोठं करण्यासाठी काम करायचं आहे, असा यावर गोगावले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अजूनही रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भरत गोगावले हे उत्सुक आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने मंत्री आदिती तटकरे या देखील उत्सुक आहेत. यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना आता भरत गोगावले यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

आमचे नेते एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. त्यातून नक्कीच सकारात्मक निर्णय होईल. पावणे दोन वर्षे थांबलो आहे, सब्र का फल मीठा होता है आणि हे फळ भरतशेठलाच मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले आहे. तटकरे यांच्या पुतण्याला आता आमदारकी मिळाली आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचा आमचा मार्ग मोकळा झाला असल्याचे देखील भरत गोगावले यांनी म्हटले असून, 15 ऑगस्ट झेंडा देखील मीच फडकवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?