AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपाल हटवा असा ठराव करणारं गावं कोणतं? गावाने ठरावात काय म्हंटलंय ?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त विधानावरुन राज्यभर आंदोलन आणि निदर्शने केली जात आहे.

राज्यपाल हटवा असा ठराव करणारं गावं कोणतं? गावाने ठरावात काय म्हंटलंय ?
Image Credit source: FACEBOOK
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Nov 23, 2022 | 12:01 PM
Share

नाशिक : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर थेट राष्ट्रपती यांच्याकडे प्रस्ताव पाठविला जात आहे. पंतप्रधानांना पत्र लिहून राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी केली जात आहे. याच दरम्यान नाशिकमधील जाखोरी गावाने राज्यपाल यांना हटवा म्हणून ग्रामसभा बोलावून ठराव केला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राज्यातील वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असून ग्रामीण भागातही पडसाद उमटू लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला म्हणून नाशिक मधील जाखोरी गावाने बैठक घेऊन राज्यपाल हटवा म्हणून ठराव केला आहे. राज्यपाल हटवा म्हणून असा ठराव करणारे नाशिकच काय राज्यातील पहिले गाव असल्याचं बोललं जात आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त विधानावरुन राज्यभर आंदोलन आणि निदर्शने केली जात आहे.

सर्वच राजकीय पक्ष भगतसिंग कोश्यारी यांच्या मताशी सहमत नसून गडकरी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

नाशिकमधील जाखोरी गावाने मंगळवारी ग्रामसभा घेऊन राज्यपाल यांच्या विरोधात एकमुखाने ठराव केला असून पुढील प्रकिया लवकरच केली जाणार आहे.

राज्यपाल यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून ठिकठिकाणी जोडे मारो आंदोलन, निदर्शने केली जात आहे.

मात्र, नाशिक मधील जाखोरी येथील ग्रामस्थांनी राज्यपाल यांच्या विरोधात घेतलेली ही भूमिका चर्चेचा विषय ठरत असून राज्यातील इतर गावांनीही ठराव करून राष्ट्रपती महोदयांना पाठवावा असं आवाहनही करण्यात येत आहे.

सरपंच मंगला जगळे, उपसरपंच ज्योती पवार, सदस्य विश्वास कळमकर, राहुल धात्रक, तुकाराम चव्हाण, नितीन कळमकर, मधुकर पवार, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप कळमकर यांनी याबाबत पुढाकार घेतला होता.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...