AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon News : आजीची प्रकृती खालावली म्हणून नातू पहायला आला, पण काकाच्या दारात येताच नातवाला हृदयविकाराचा झटका

आजारी पहायला भेटायला नातू काकाच्या घरी आला. पण काकाच्या दारात येताच नातू कोसळला अन् क्षणात सर्व संपलं. अखेर आजी-नातवाची शेवटची भेट झालीच नाही.

Jalgaon News : आजीची प्रकृती खालावली म्हणून नातू पहायला आला, पण काकाच्या दारात येताच नातवाला हृदयविकाराचा झटका
जळगावमध्ये आजी आणि नातवाची एकत्र अंत्ययात्राImage Credit source: TV9
| Updated on: Jul 27, 2023 | 10:32 AM
Share

खेमचंद कुमावत, टीव्ही 9 मराठी, जळगाव / 27 जुलै 2023 : जळगावातील फैजपूर शहरात हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. आजी आजारी पडली म्हणून 24 वर्षीय नातू आजीला पहायला वडिलांसोबत काकाच्या घरी गेला. मात्र घरात प्रवेश करण्यापूर्वीच दारातच त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. नातवाच्या मृत्यूनंतर दोन तासांनी आजीचाही मृत्यू झाला. आजी आणि नातवाची एकत्रच अंत्ययात्रा निघाली अन् सर्वांना अश्रू अनावर झाले. कमलाबाई कोंडू मोरे आणि वैभव विष्णु मोरे अशी मयत आजी-नातवाची नावे आहेत. या घटनेमुळे मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे फैजपूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

आजीची प्रकृती बिघडली म्हणून पहायला आला

फैजपूर शहरात मोरे कुटुंब वास्तव्यास आहेत. मयत कमलाबाई यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा दत्तात्रय यांचे लक्कड पेठ परिसरात डी.के. मोरे ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दत्तात्रय मोरे आई आणि आपल्या कुटुंबासह लक्कड पेठमध्ये वास्तव्यास आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ विष्णु मोरे आपल्या कुटुंबासह भारंबे वाड्यात राहतात. मंगळवारी पहाटे कमलाबाई यांची प्रकृती खालावली. यामुळे आपला विष्णु यांना आईच्या तब्येतीबाबत सांगितले.

दारात येताच हृदयविकाराचा झटका आला

आईची प्रकृती बिघडल्याचे कळताच विष्णु मोरे हे मुलगा वैभवसह भावाच्या घराकडे निघाले. मात्र काकाच्या दाराजवळ येताच वैभवला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नातवाच्या मृत्यूनंतर दोन तासांनी आजीनेही प्राण सोडले. यानंतर दुपारी आजी आणि नातवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.