AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! जळगावातही बनावट औषधांचा पुरवठा? रुगणांच्या जीवाशी खेळ? प्रकरण उजेडात येताच मोठी खळबळ

जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागाने पुरवलेल्या औषधांमध्ये बनावट औषधे असल्याचे समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेने चौकशी समिती नेमली आहे. याप्रकरणात दोषी आढळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. औषधांचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि दोषींवर कडक कारवाईची ग्वाही दिली आहे.

धक्कादायक! जळगावातही बनावट औषधांचा पुरवठा? रुगणांच्या जीवाशी खेळ? प्रकरण उजेडात येताच मोठी खळबळ
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 05, 2025 | 10:56 PM
Share

किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : राज्यात काही जिल्ह्यांत आरोग्य विभागाच्या वतीने पुरवठा केल्या गेलेल्या औषधांमध्ये काही औषधी बनावट असल्याच्या घटना समोर आल्या आहे. यानंतर जळगाव जिल्ह्यातही अशाच प्रकारे काही औषधी या बनावट असल्याची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भोळे यांच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने चौकशी समिती गठीत केली आहे. या चौकशीच्या अहवालात कोणी दोषी आढळून आले तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात 78 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. 442 उपकेंद्र आहेत. या सगळ्या आरोग्य केंद्रांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने औषध पुरवठा केला जातो. या औषध पुरवठामधील काही औषधांमध्ये डाग आढळून आले. त्याच बरोबर औषधींचा भुगा आढळून आला असल्याने, सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे यांना या औषधींबाबत संशय आला. त्यांनी ही औषधी बनावट असल्याची लेखी तक्रार स्थानिक जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली. राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार केल्याने जिल्हा परिषदेसह आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

आरोग्य यंत्रणेमधील या बनावट औषधांचा पुरवठा पाहता हा रुग्णांच्या जिविताशी खेळ केला जात असल्याने, या औषधांच्या पुरवठा करणाऱ्या ठेकेदार अन् जिल्हा परिषदेमधील जबाबदार अशा अधिकाऱ्यांवर निलंबन किंवा बडतर्फिची कारवाई सरकारने करावी, अशी मागणी दिनेश भोळे यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी काय म्हणाले?

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पुरवठा केला गेलेल्या औषधांमध्ये काही औषधं ही बनावट असल्याची तक्रार प्राप्त होताच जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने चौकशी समिती गठीत केली आहे. त्याचबरोबर ज्या औषधांबाबत संशय आहे, त्या औषधांचा वापर थांबविण्यात आला आहे. सर्व औषधांची ल्याब तपासणी केली जाणार आहे. तसेच पुरवठादारांचे पेमेंट ही रोखून धरण्यात आल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार गोडाऊनमध्ये साठवण करताना ही औषधी खराब होऊ शकले असल्याचा अंदाज असला तरी, तक्रारदाराने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीत कोणी दोषी आढळून आल्यास त्यावर दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचंही जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अंकित यांनी सांगितलं आहे.

मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?

“जिल्हाधिकाऱ्यांना आजच सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मी देणार आहे. सगळ्या गोष्टी खपवल्या जातील. पण औषधांमध्ये जर कोणी भ्रष्टाचार करत असेल आणि रुग्णांच्या जीवाशी खेळत करत असेल तर हे मुळीच खपवले जाणार नाही. जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या आधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे”, अशी प्रतिक्रिया या प्रकरणावर बोलताना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...