काही तरी मोठं घडतंय..? एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता गिरीश महाजन थेट दिल्लीकडे; 4.30 वाजता…

Eknath Shinde-Girish Mahajan Delhi: छत्रपती संभाजीनगरनंतर जळगावच्या जागेसाठी शिंदे सेना आग्रही आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुलासाठी इथं फिल्डिंग लावली आहे. तर जळगाव आणि नाशिकच्या जागेचं साटंलोटं टाळण्यासाठी मंत्री गिरीश महाजनांनीही कंबर कसल्याचे दिसते.

काही तरी मोठं घडतंय..? एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता गिरीश महाजन थेट दिल्लीकडे; 4.30 वाजता...
एकनाथ शिंदे, गिरीश महाजन
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 24, 2026 | 2:49 PM

किशोर पाटील, प्रतिनिधी टीव्ही ९ मराठी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. काही जागांवर अजूनही ओढताण होत आहे. तर पारंपारिक जागांच्या अदलाबदलीची चर्चा असली तरी त्यासाठीही राजकीय समीकरण जुळवताना मोठी कसरत होत असल्याचे दिसते. छत्रपती संभाजीनगरनंतर जळगावच्या जागेवरून असाच पेच निर्माण झाला आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मुलाला विधान परिषदेचे तिकीट मिळावे यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. तर दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा मैदानात उतरले आहेत. जळगावच्या जागेवरून (Eknath Shinde-Girish Mahajan Delhi)  आता थेट दिल्लीत राजकारण तापतंय की काय? अशी चर्चा रंगली आहे.

मंत्री गिरीश महाजनही दिल्लीत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल तातडीने दिल्लीला रवाना झाले. विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत ते दिल्लीला गेलेत का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण त्यांच्या या दौऱ्यामुळे राज्यात चर्चेंना उधाण आले. तर त्यांच्या पाठोपाठ आज भाजपचे मंत्री गिरीश महाजन दिल्लीकडे रवाना होणार आहे. राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिंदेंच्या पाठोपाठ भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन दिल्लीकडे दिल्लीकडे रवाना होत आहेत.

जागांचा तिढा कायम

साडेचार वाजता माझं विमानाचे तिकीट असून दिल्लीला जात आहे. मात्र मी तिकिटासाठी जात नसल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलं. उद्यापासून विधानपरिषदेसाठी अर्ज भरण्याचे प्रक्रिया सुरू होणार असून दिवस कमी असल्याने जागांचा तिढा सोडवण्यासाठी नेते दिल्ली दरबारी जात असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे तर भाजपकडून मंत्री गिरीश महाजन दिल्लीच्या दरबारी विधान परिषदेच्या जागा संदर्भात बाजू मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सात जागांसाठी शिवसेना आग्रही

प्राथमिक बोलणीत एकूण १७ जागांपैकी भाजप १२, शिवसेना ३ व राष्ट्रवादी काँग्रेस २ या फॉर्म्युलावर चर्चा झाल्याचे समजते. शिवसेना राज्यात सात जागांवर ठाम असून भाजप केवळ तीन ते चार जागा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. विधान परिषदेच्या जागांचा वाद आता दिल्लीच्या दरबारी सोडवला जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. नाशिक आणि जळगावच्या विधान परिषदेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

Follow Us