AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राधा-कृष्णचं सुपरहिट गाणं, जे 25 वर्षांपूर्वी मुस्लिम कलाकारांनी बनवलं, ठरलं प्रचंड सुपरहिट

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील 25 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, जे मुस्लिम कलाकारांनी बनवलं अजरामर. आजही हे प्रत्येक ठिकाणी वाजत.

राधा-कृष्णचं सुपरहिट गाणं, जे 25 वर्षांपूर्वी मुस्लिम कलाकारांनी बनवलं, ठरलं प्रचंड सुपरहिट
| Updated on: Jul 10, 2026 | 7:28 PM
Share

भक्तीसंगीत म्हटले की ते लिहिणारे, संगीतबद्ध करणारे आणि सादर करणारे कलाकारही त्या देवतेचे भक्त असतील अशी अनेकांची धारणा असते. मात्र भारतीय चित्रपटसृष्टीने वेळोवेळी सिद्ध केले आहे की कला, संगीत आणि सर्जनशीलतेला धर्माच्या सीमांचे बंधन नसते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘लगान’ या चित्रपटातील ‘राधा कैसे ना जले’ हे अजरामर गाणं.

आजही जन्माष्टमी, लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध धार्मिक उत्सवांमध्ये हे गाणे आवर्जून ऐकायला मिळते. राधा-कृष्णांच्या प्रेमाची, भक्तीची आणि राधेच्या विरहभावनेची सुंदर मांडणी करणारे हे गाणं दोन दशकांहून अधिक काळानंतरही तितकेच लोकप्रिय आहे.

राधेच्या भावविश्वाचे सुंदर चित्रण

‘राधा कैसे ना जले’ या गाण्यात भगवान श्रीकृष्ण गोपींसोबत रास खेळताना पाहून राधेला होणारी ईर्ष्या, तिची नाराजी आणि त्यानंतर कृष्णाने आपल्या खट्याळ, प्रेमळ स्वभावाने तिला समजावण्याचा प्रसंग अत्यंत प्रभावीपणे साकारण्यात आला आहे. गाण्यातील प्रत्येक शब्द राधा-कृष्णांच्या प्रेमाची आणि भक्तीची अनुभूती देतो.

या गाण्याची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्याच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे चारही प्रमुख कलाकार मुस्लिम धर्मीय होते. या गाण्याचे अर्थपूर्ण आणि भावपूर्ण शब्द प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिले. गाण्याला मधुर आणि अविस्मरणीय संगीत संगीतकार ए. आर. रहमान यांनी दिले. उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन ज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान यांनी केले. हे गाणं लगान चित्रपटात आमिर खान आणि ग्रेसी सिंह यांच्यावर चित्रित करण्यात आले.

या सर्व कलाकारांनी आपल्या कलेच्या बळावर राधा-कृष्णांच्या भक्तीचा भाव इतक्या प्रभावीपणे मांडला की हे गाणं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय भक्तिरसप्रधान गाण्यांपैकी एक ठरले.

सुरेल आवाजांनी मिळवून दिली अमरता

या गाण्याला ज्येष्ठ गायिका आशा भोसले, गायक उदित नारायण आणि गायिका वैशाली सामंत यांनी आपल्या सुरेल आवाजाची साथ दिली. त्यांच्या गायकीमुळे गाण्यातील भावना अधिक प्रभावीपणे रसिकांपर्यंत पोहोचल्या.

गाण्याचे बोल, रहमान यांचे संगीत, आशा भोसले आणि उदित नारायण यांचा आवाज तसेच सरोज खान यांचे अप्रतिम नृत्यदिग्दर्शन यांचा सुंदर संगम या गाण्यात पाहायला मिळतो.

Follow Us
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय