AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही”;राष्ट्रवादीच्या टीकेला शिंदे गटानं एकाच वाक्यात उत्तर दिलं

राज्यात सत्तांतर झाल्यापासून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि महाविकास आघाडी असा सामना रंगाला आहे. त्यावरूनच जयंत पाटील यांनी शिवसेनेवर टीका करताच कावळ्याच्या शापाने गाय मरत नसल्याचे प्रत्युत्तर देत जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले.

कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही;राष्ट्रवादीच्या टीकेला शिंदे गटानं एकाच वाक्यात उत्तर दिलं
| Updated on: Mar 18, 2023 | 2:45 PM
Share

जळगाव : राज्यात काही महिन्यापूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर ठाकरे व महाविकास आघाडीकडून वारंवार टीका केली जात आहे. त्यातच पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाल्यामुळे आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यात यश मिळणार नाही अशी टीका ठाकरे गट, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जात आहे.

त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीचे शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या आमदारांवर महाविकास आघाडीकडून सातत्याने टीका केली जात आहे.

त्यामुळे आताही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. आगामी काळात शिवसेनेला चांगले यश मिळणार नाही अशी टीका करण्यात आली होती.

त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनीही आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी शिवसेनेवर टीका करताना आगामी काळात शिंदे गटाचे नामोनिशान मिटणार असल्याची टीका करण्यात आली होती.

त्या टीकेला प्रत्युत्तर देत आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे की, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसल्याचे सांगत जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आमदार गुलाबराव पाटील यांनी उत्तर देताना त्यांना सांगितले की, जर जयंत पाटील असंही म्हणत असले तरी त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही.

त्यामुळे रामदास आठवले यांचे पण आमदार निवडून येतात त्यामुळे जयंत पाटील यांच्या टीकेला आम्ही गांभीर्याने घेत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.