AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतमी पाटीलच्या आडनावाचा वाद; संभाजीराजे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Sambhajiraje Chhatrapati on Gautami Patil Dance : गौतमी पाटीलच्या आडनावाचा वाद; संभाजीराजे यांनी स्पष्ट भूमिका मांडली, म्हणाले...

गौतमी पाटीलच्या आडनावाचा वाद; संभाजीराजे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 29, 2023 | 8:29 AM
Share

जळगाव : नृत्यांगना गौतमी पाटील हिचा डान्स याआधी वादात सापडला होता. आता तिच्या आडनावावरून वाद निर्माण झाला आहे. गौतमी पाटीलने पाटील हे आडनाव वापरू नये अशी भूमिका काही संघटनांनी घेतली आहे. आता संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमी पाटील हिच्या डान्स आणि आडनावाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. महिला संरक्षणाचा मुद्दा संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना संरक्षण दिलं. त्यामुळे स्वातंत्र्य सर्वांना आहे. महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळं राज्य आहे. त्यामुळे सर्वांनी गौतमी पाटील यांच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळालं पाहिजे, हे या मी मताचा आहे, असं संभाजीराजे म्हणालेत.

बाकीच्या राज्यात जातीवर राजकारण चालतं. जाती विषमता जर कमी करायची असेल बहुजन समाजाच्या लोकांना न्याय दिला गेला पाहिजे. सध्या खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. लोक या अशा राजकारणाला कंटाळले आहेत. खोके-बोके, मांजर-कुत्रे ही भाषा ऐकण्यापेक्षा सुसंस्कृत महाराष्ट्र कसा घडावा, यासाठी लोक अपेक्षा करत आहेत, असंही ते म्हणालेत.

काल देशाच्या नव्या संसदभवनाचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं. याला विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध केला. राष्ट्रपती देशाच्या प्रथम नागरिक आहेत. त्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावं, अशी भूमिका विरोधी पक्षांची होती. मात्र काल पंतप्रधानांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. त्यावरही संभाजीराजे बोलले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाचं उद्घाटन केलं. मात्र त्यांच्यासोबत राष्ट्रपती असत्या तर या कार्यक्रमाची गरिमा वाढली असती, असं संभाजीराजे म्हणालेत.

ईडीला मी घाबरत नाही का? असं विचारलं असता, ईडीला घाबरायला मी आयुष्यात चुकीचं काम केलंच नाही. त्यामुळे ईडीला घाबरायचं काय कारण? ज्यांना घाबरायचं ते घाबरतील, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

सिंदखेड राजा येथील किल्ल्याचा दगड घसरला. त्यावर बोलताना जुनी किल्ले जिवंत ठेवायचे असतील तर वेगळं महामंडळ किंवा वेगवेगळे मार्ग आहेत. मात्र ते होत नाहीत त्यामुळे दुर्दैवी घटना घडतात, असं संभाजीराजे म्हणाले.

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...