AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याच्या राजकारणात संस्कार आणि संस्कृतीही राहिली नाही, या नेत्यांनी व्यक्त केली खंत

शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये आता अशी स्पर्धा लागली आहे की, कोण अधिक महिलांचा अपमान करेल असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

राज्याच्या राजकारणात संस्कार आणि संस्कृतीही राहिली नाही, या नेत्यांनी व्यक्त केली खंत
| Updated on: Nov 09, 2022 | 9:00 PM
Share

जळगावः सध्या महाराष्ट्राचे राजकारण अनेक वेगवेगळ्या मुद्यामुळे चर्चेत आले आहे. नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्याही फैरी झडत आहेत. नुकतेच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे शिंदे गटासह नेत्यांवर जोरदार टीका झाली होती. त्या प्रकरणाविषयी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी बोलताना खंत व्यक्त केली.

यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारण इतक्या खालच्या स्तरावर गेल्याचं मी कधीही अनुभवलं नव्हतं. तसेच राज्याच्या राजकारणात आता संस्कारही राहिले नाहीत आणि संस्कृतीपण राहिलेली नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कारण नुकतेच अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबद्दल राज्यातील राजकीय संस्कृतीविषयीही त्यांनी खेद व्यक्त केला.

अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर आणि शिंदे गटावरही जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी त्याविषयी माफी न मागता सारवासारव केल्यानेच आमदार एकनाथ खडसे यांनी राज्यातील राजकीय संस्कृती बदलते असल्याचे मत व्यक्त केले.

आमदार एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले की, शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये आता अशी स्पर्धा लागली आहे की, कोण अधिक महिलांचा अपमान करेल, कोण महिलांच्या बाबतीत अपमानकारक शब्द वापरले अशी त्यांच्याबद्दल त्यांनी टिप्पणीही केली आहे.

आपण मंत्री आहोत, समाज आपल्याकडे अपेक्षेने पाहतो आहे हे जबाबदारीचं भान न ठेवता, टीका टिप्पणी होते आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला डाग लागत असल्याची खंत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.