AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याच्या राजकारणात संस्कार आणि संस्कृतीही राहिली नाही, या नेत्यांनी व्यक्त केली खंत

शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये आता अशी स्पर्धा लागली आहे की, कोण अधिक महिलांचा अपमान करेल असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

राज्याच्या राजकारणात संस्कार आणि संस्कृतीही राहिली नाही, या नेत्यांनी व्यक्त केली खंत
| Updated on: Nov 09, 2022 | 9:00 PM
Share

जळगावः सध्या महाराष्ट्राचे राजकारण अनेक वेगवेगळ्या मुद्यामुळे चर्चेत आले आहे. नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्याही फैरी झडत आहेत. नुकतेच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे शिंदे गटासह नेत्यांवर जोरदार टीका झाली होती. त्या प्रकरणाविषयी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी बोलताना खंत व्यक्त केली.

यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारण इतक्या खालच्या स्तरावर गेल्याचं मी कधीही अनुभवलं नव्हतं. तसेच राज्याच्या राजकारणात आता संस्कारही राहिले नाहीत आणि संस्कृतीपण राहिलेली नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कारण नुकतेच अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबद्दल राज्यातील राजकीय संस्कृतीविषयीही त्यांनी खेद व्यक्त केला.

अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर आणि शिंदे गटावरही जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी त्याविषयी माफी न मागता सारवासारव केल्यानेच आमदार एकनाथ खडसे यांनी राज्यातील राजकीय संस्कृती बदलते असल्याचे मत व्यक्त केले.

आमदार एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले की, शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये आता अशी स्पर्धा लागली आहे की, कोण अधिक महिलांचा अपमान करेल, कोण महिलांच्या बाबतीत अपमानकारक शब्द वापरले अशी त्यांच्याबद्दल त्यांनी टिप्पणीही केली आहे.

आपण मंत्री आहोत, समाज आपल्याकडे अपेक्षेने पाहतो आहे हे जबाबदारीचं भान न ठेवता, टीका टिप्पणी होते आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला डाग लागत असल्याची खंत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.