AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याच्या राजकारणात संस्कार आणि संस्कृतीही राहिली नाही, या नेत्यांनी व्यक्त केली खंत

शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये आता अशी स्पर्धा लागली आहे की, कोण अधिक महिलांचा अपमान करेल असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

राज्याच्या राजकारणात संस्कार आणि संस्कृतीही राहिली नाही, या नेत्यांनी व्यक्त केली खंत
| Updated on: Nov 09, 2022 | 9:00 PM
Share

जळगावः सध्या महाराष्ट्राचे राजकारण अनेक वेगवेगळ्या मुद्यामुळे चर्चेत आले आहे. नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्याही फैरी झडत आहेत. नुकतेच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे शिंदे गटासह नेत्यांवर जोरदार टीका झाली होती. त्या प्रकरणाविषयी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी बोलताना खंत व्यक्त केली.

यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारण इतक्या खालच्या स्तरावर गेल्याचं मी कधीही अनुभवलं नव्हतं. तसेच राज्याच्या राजकारणात आता संस्कारही राहिले नाहीत आणि संस्कृतीपण राहिलेली नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कारण नुकतेच अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबद्दल राज्यातील राजकीय संस्कृतीविषयीही त्यांनी खेद व्यक्त केला.

अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर आणि शिंदे गटावरही जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी त्याविषयी माफी न मागता सारवासारव केल्यानेच आमदार एकनाथ खडसे यांनी राज्यातील राजकीय संस्कृती बदलते असल्याचे मत व्यक्त केले.

आमदार एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले की, शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये आता अशी स्पर्धा लागली आहे की, कोण अधिक महिलांचा अपमान करेल, कोण महिलांच्या बाबतीत अपमानकारक शब्द वापरले अशी त्यांच्याबद्दल त्यांनी टिप्पणीही केली आहे.

आपण मंत्री आहोत, समाज आपल्याकडे अपेक्षेने पाहतो आहे हे जबाबदारीचं भान न ठेवता, टीका टिप्पणी होते आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला डाग लागत असल्याची खंत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.