मराठा पोरांविरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचलं; मनोज जरांगे पाटील यांचा सर्वात मोठा आरोप

Manoj Jarange Patil on CM Ekanath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar : शिंदे सरकारवर मनोज जरांगे पाटील यांचा सर्वात मोठा आरोप... मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यावरही मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा पोरांविरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचलं; मनोज जरांगे पाटील यांचा सर्वात मोठा आरोप
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2023 | 3:38 PM

जालना | 27 ऑक्टोबर 2023 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारवर सर्वात मोठा आरोप केला आहे. मराठा समाजातील तरुणांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचलं, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाला अपेक्षा होती. परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. पंतप्रधानांना आरक्षणाबाबत काही सांगितलं असेल असं वाटलं होतं. पण त्यांनी महाराष्ट्रातील आरक्षणाचा लढा पंतप्रधानांना सांगितलं नाही अशी शंका आहे. जर पंतप्रधानांना त्यांनी मराठा आरक्षण आणि आंदोलनाबाबत सांगितलं असेल तर पंतप्रधान जाणूनबुजून आरक्षणावर बोलले नाहीत असं समजायचं का. याची शंका आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी काल मराठा आरक्षणाचा विषय घेतला नाही. याचा अर्थ त्यांना सांगितलं नाही. सांगितलं असेल तर त्यांनी जाणूनबुजून हा विषय घेतला नाही. ही शंका आहे. पंतप्रधांनाना गोरगरीबांची गरज राहिली नाही असा त्यातून राज्यातील जनता अर्थ काढत आहे. पंतप्रधानांनी काल विषय घ्यायला हवा होता. पण दोन्ही बाजूच्या चर्चा सुरू आहेत. एक तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाणूनबुजून सांगितलं नाही. किंवा पंतप्रधानांना सांगितलं पण त्यांनी जाणूनबुजून आरक्षणाचा विषय घेतला नाही. या दोन्ही शंकापैकी एक शंका मराठ्यांच्या मनात शंभर टक्के आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

इतक्या जवळ येऊन पंतप्रधान देशव्यापी आंदोलन घेत नाही याचा अर्थ त्यांना सांगितलं नाही किंवा त्यांनी घेतला नाही. त्यांनी विषय घेतला काय आणि नाही घेतला काय मराठ्यांना फरक पडत नाही. पण समाज यासाठी शांत होता की पंतप्रधान हा विषय हाताळतील आणि राज्य सरकारला हा विषय मार्गी काढायला सांगतील. मराठ्यांच्या मनात पंतप्रधानांच्या मनात पाप नव्हतं. वाईट नव्हतं. जर मराठ्यांच्या मनात त्यांच्या विषयी वाईट भावना असतील. तर मराठ्यांनी त्यांचं विमानही शिर्डीला उतरू दिलं नसतं, असं म्हणत जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.