AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराच्या दारात बसणाऱ्या श्वानाकडे दुर्लक्ष करू नका; धार्मिक मान्यतेत दडले आहे मोठे रहस्य

धार्मिक आणि लोकमान्यतानुसार घराच्या दारावर बसलेला श्वानाला विशेष महत्व दिले जाते. कारण तो निष्ठा आणि सतर्कतेचा प्रतीक म्हणून ओळखला जातो.

घराच्या दारात बसणाऱ्या श्वानाकडे दुर्लक्ष करू नका; धार्मिक मान्यतेत दडले आहे मोठे रहस्य
| Updated on: Jun 13, 2026 | 5:48 PM
Share

आपल्या घराच्या दारात किंवा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एखादा श्वान नियमितपणे बसलेला दिसला तर अनेकजण त्याकडे साध्या प्राण्याच्या नजरेने पाहतात. मात्र सनातन धर्म, लोकमान्यता आणि तांत्रिक परंपरांमध्ये श्वानाला अत्यंत विशेष स्थान देण्यात आले आहे. धार्मिक श्रद्धेनुसार श्वान हा केवळ निष्ठा आणि सतर्कतेचे प्रतीक नसून तो घराचे रक्षण करणारा, नकारात्मक शक्तींना दूर ठेवणारा आणि काही प्रसंगी दैवी संकेत देणारा जीव मानला जातो.

धार्मिक मान्यतांनुसार भगवान भैरव यांचे वाहन श्वान आहे. त्यामुळे भैरव उपासनेत श्वानाला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक ठिकाणी अशी श्रद्धा आहे की एखादा श्वान जर एखाद्या घराच्या दारात नियमितपणे येऊन बसत असेल तर तो केवळ अन्न किंवा आश्रयाच्या शोधात आलेला नसतो. त्या घरातील सूक्ष्म ऊर्जा, वातावरण आणि तेथील लोकांशी त्याचा एक आध्यात्मिक संबंध निर्माण झालेला असू शकतो.

श्वान घराचे रक्षण करतो, अशी लोकमान्यता

शकुनशास्त्र आणि लोकपरंपरेत असे मानले जाते की काही श्वान हे पूर्वज, जुने मित्र किंवा गतजन्मातील आत्मीय व्यक्तींच्या चेतनेशी जोडलेले असू शकतात. अशा श्वानांचा त्या कुटुंबाशी विशेष संबंध असतो आणि ते घरातील संकटे, दुःख किंवा ग्रहदोषांचे परिणाम स्वतःवर घेण्याचा प्रयत्न करतात अशी श्रद्धा आहे.

लोकमान्यतेनुसार असे श्वान घराभोवती एक अदृश्य संरक्षण कवच निर्माण करतात. त्यामुळे अनेक भागांत श्वानांना अन्न देणे, पाणी पाजणे आणि त्यांच्याशी प्रेमाने वागणे हे पुण्यकर्म मानले जाते.

महाभारतातील श्वानाचे अद्वितीय स्थान

श्वानाच्या निष्ठेचे आणि धार्मिक महत्त्वाचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण महाभारतातील महाप्रस्थानिक पर्वात आढळते. पांडव जेव्हा हिमालयाच्या दिशेने अंतिम प्रवासासाठी निघाले होते, तेव्हा एक श्वान धर्मराज युधिष्ठिरांच्या सोबत अखेरपर्यंत राहिला. स्वर्गाच्या प्रवेशद्वाराजवळ देवांनी युधिष्ठिरांना त्या श्वानाला सोडून देण्यास सांगितले.

मात्र युधिष्ठिरांनी आपल्या आश्रयाला आलेल्या जीवाचा त्याग करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांच्या या धर्मनिष्ठेची परीक्षा घेण्यासाठी तो श्वान प्रत्यक्ष धर्मदेवाच्या रूपात आला होता. युधिष्ठिरांच्या करुणा, निष्ठा आणि धर्मपालनामुळे ते या परीक्षेत यशस्वी ठरले. हा प्रसंग आजही शरणागताचे रक्षण, सर्व जीवांप्रती करुणा आणि निष्ठेचे सर्वोच्च उदाहरण म्हणून सांगितला जातो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप