AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : नाना पाटेकर यांनी 1.50 कोटीची कार विकत घेतली नाही, पण तेच पैसे त्यांनी..प्रसिद्ध लेखकाने सांगितली नानांच्या स्वभावाची दुसरी बाजू

Nana Patekar : 1996 साली आलेल्या 'अग्निसाक्षी' चित्रपटात रणबीर पूष्प यांनी नाना पाटेकरांसोबत काम केलं होतं. 'अग्निसाक्षी' नाना पाटेकरांच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. नाना पाटेकरांबद्दल अनेकांचा गैरसमज आहे असं रणबीर पूष्प यांचं मत आहे.

Nana Patekar : नाना पाटेकर यांनी 1.50 कोटीची कार विकत घेतली नाही, पण तेच पैसे त्यांनी..प्रसिद्ध लेखकाने सांगितली नानांच्या स्वभावाची दुसरी बाजू
Nana Patekar
| Updated on: Sep 16, 2026 | 9:48 AM
Share

मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट आणि हिंदी सिने सृष्टीमध्ये आज नाना पाटेकरांचं एक वेगळं स्थान आहे. नाना पाटेकरांची एक वेगळी ओळख आहे. त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. नाना पाटेकर हे उत्तम अभिनेते आहेतच. पण त्यांना सामाजिक विषयांची सुद्धा तितकीच जाण आहे. एक माणूस म्हणून नाना पाटेकरांबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं आहेत. नाना पाटेकर आक्रमक स्वभावाचे, गरम डोक्याचे म्हणूनही ओळखले जातात. हिंदी सिने सृष्टीतील त्यांच्या वादांचीही भरपूर चर्चा होते. 1989 साली ‘परिंदा’च्या सेटवर दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेते पटकथा लेखक रणबीर पूष्प यांनी नाना पाटेकरांच्या स्वाभावाची दुसरी बाजू सांगितली आहे. 1996 साली आलेल्या ‘अग्निसाक्षी’ चित्रपटात रणबीर पूष्प यांनी नाना पाटेकरांसोबत काम केलं होतं. ‘अग्निसाक्षी’ नाना पाटेकरांच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे.

नाना पाटेकरांबद्दल अनेकांचा गैरसमज आहे असं रणबीर पूष्प यांचं मत आहे. ‘लोकांनी नाना पाटकेरांबद्दल चुकीचं मत बनवून घेतलं आहे’ असं सिद्धार्थ कनन सोबतच्या मुलाखतीत रणबीर पूष्प म्हणाले. शेतीच्या दुरावस्थेमुळे टोकाचा निर्णय घेणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल नाना पाटेकर यांच्या मनात वेदना होती. त्यासाठीच त्यांनी केलेल्या कामाचा दाखला पूष्प यांनी दिला. शेतकऱ्याची स्थिती पाहून नाना पाटेकरांनी दीड कोटीची कार विकत घेण्यास नकार दिला. तेच पैसे त्यांनी शेतकरी कुटुंबांना दिले असं रणबीर पूष्प म्हणाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. ते का कुणाचं नुकसान करतील असं पूष्प म्हणाले.

नाना पाटेकर रागावतात हे मान्य पण..

‘नाम’ या संस्थेची स्थापना करुन त्या माध्यमातून येणारा निधी ते शेतकऱ्यांसाठी वापरत आहेत. ते स्वत: शेतात राहतात असं पूष्प यांनी सांगितलं. नाना पाटेकर यांचा संयम सुटतो, त्यांना राग येतो हे पुष्प यांनी मान्य केलं. पण त्यांच्या रागावण्यामागे काहीतरी कारण असतं हे सुद्धा पूष यांनी सांगितलं. नानांनी एकदा धावत्या कारमधून कोणीतरी प्लास्टिक बॉटल बाहेर टाकल्याचं पाहिलं. त्यांनी कार थांबवली, ती बॉटल उचलली. ट्रॅफिक सिंग्नलजवळ त्यांनी बॉटल बाहेर फेकणाऱ्या कार चालकाला थांबवलं. त्यांनी कार चालकाला तिथेचं असलेलं महात्मा गांधींच होर्डिंग दाखवलं. त्यावर लिहिलेला स्वच्छ भारताचा संदेश दाखवून त्याला समजावलं.

Follow Us
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी