AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदानाच्या आदल्या दिवशी मनोज जरांगेंचं मराठा समाजाला महत्वाचं आवाहन

Manoj Jarange Patil on Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्वाचं आवाहन केलं आहे. तसंच कालिचरण महाराज यांनी केलेल्या विधानावर जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...

मतदानाच्या आदल्या दिवशी मनोज जरांगेंचं मराठा समाजाला महत्वाचं आवाहन
Image Credit source: Facebook
| Updated on: Nov 19, 2024 | 3:03 PM
Share

महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होत आहे. उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी tv9 मराठीशी बोलत असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्वाचं आवाहन केलं आहे. मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा, आपल्या हाल- अपेष्टा डोळ्यासमोर ठेवा. वेळेवर भावनिक होऊ नका. हा माझा नेता हा माझा नेत्याचा मुलगा आणि त्याला मतदान करावंच लागेल, असं न करता तुमचे कष्ट डोळ्यासमोर समोर ठेवा. तुम्ही विचार नाही केला तर कधी मोठे होणार आहात. विचारपूर्वक मतदान करा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

मनोज जरांगेंचं मराठा समाजाला काय आवाहन

श्रीमंत मराठे, नौकरी करणारे मराठे, उद्योजक, अनेक लहान मोठे व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी आपल्या मुलांना विचारा. मी लोकसभेला सांगितले होते, कोणाला पडायचे त्याला आणि कोणाला निवडून आणायचे त्याला निवडून आणा, आणि विधानसभेला पण तेच सांगत आहे. मी कोणालाही पाठिंबा दिला नाही आणि माझी कुठेही टीम पाठवली नाही. मी महाराष्ट्रमधील कोणत्याही मतदार संघातील, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, मी कोणालाही पाठिंबा दिला नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

मराठ्यांनी एकजुटीने 100 टक्के मतदान करा. पण ज्याने आरक्षणाला ज्यांनी विरोध केला आहे. त्यांना सोडू नका. राजकारणापेक्षा मला आरक्षण महत्वाचे आहे, आणि ते मी मिळवून देणार आहे. मराठ्यांनी संभ्रम ठेवू नये. मी कोणालाही काही सांगितले नाही आणि शेवटपर्यंत सांगणार नाही. कोणाचेही सरकार आले तर आपल्याला लढावेच लागणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

कालिचरण महाराज यांच्या विधानावर काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील म्हणजे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेले राक्षस, असं कालिचरण महाराज यांनी म्हटलं आहे. त्यावर जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. हे महाराज कुठून मध्येच आलेत? स्टॅम्पवर असल्यासारखी टिकली लावतो. आम्ही मराठ्यांनी याचे काय वाटोळे केलं आहे. तुला काय घेणं-देणं आहे. माझे माय बाप कष्ट करतात. आमच्या मराठ्यांच्या जीवावर तू पाकिटं खातो. ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. त्यांच्या घरी जाऊ बघ. मराठ्यांची तू का टिंगल करतो. मीठ कालवून शेण खा तिकडे.. तू काय महिलांबद्दल आदर आहे. सुंदर महिला भोगून घ्या म्हणत.. तुझे छप्पर फोडायला पाहिजे. ज्याचा मराठा द्वेष करतात त्या बंगल्यावरच्या वरून बोलतो. तू खेकडे खाऊन जगणारा महाराज, आमच्या नादी कशाला लागतो, असं जरांगे म्हणालेत.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.