AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalna lathi charge | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची Tv9 मराठीला EXCLUSIVE प्रतिक्रिया

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लाठीचार्जच्या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण लवकरात लवकर लागू करावं, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहनदेखील केलं.

Jalna lathi charge | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची Tv9 मराठीला EXCLUSIVE प्रतिक्रिया
| Updated on: Sep 01, 2023 | 9:14 PM
Share

जालना | 1 सप्टेंबर 2023 : मराठा आंदोलकांवर आज जालन्यात लाठीचार्ज करण्यात आलं. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवली सराटी गावात उपोषण सुरु होतं. गेल्या चार ते पाच दिवसांपासून हे आंदोलन सुरु होतं. मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणस्थळी पाच हजार पेक्षा जास्त जणांचा जमाव जमलेला होता. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे पोलीस मनोज जरांगे यांना रुग्णालयात घेऊन जाणार होते. पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण नंतर पोलीस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली. त्यातून पुढे गोष्ट लाठीचार्जपर्यंत गेली.

या घटनेवर मनोर जरांगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. “एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकारला हा सर्वात मोठा डाग आहे. माझी माता माऊलीला गावात येवून मोघलाईने मारलं नाही, शिंदे साहेब सर्व मराठ्यांकडून अपेक्षा होत्या. खास मराठ्याचा माणूस आहे, पण तुम्ही आमच्या माता-माऊलींना मारुन गोळीबार करायला लावला”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘अहो मला उठताही येत नाही, तरी…’

“अहो मला उठताही येत नाही. तरी माझ्यावर तुम्ही हल्ला करायला लावता. तुमच्या आयुष्यातला हा मोठा डाग आहे. आम्ही काय केलं की आमच्या माता माऊलींना तुम्ही घरात घुसून मारलं? आमच्यावर गोळीबार? आम्ही काय केलं? शांततेत मागणी केली की, आम्हाला आरक्षण द्या. उपोषण केलं. शिंदे साहेब तुम्हाला आणखी एकदा सांगतो, आताच या लोकांना थांबायला सांगतो, नाहीतर हे गावात धिंगाणा घालतील. आमच्या माता माऊलींना धक्का लागू देऊ नका. आम्ही काही केलेलं नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे, ते मरेपर्यंत मी घेणारच”, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

“आता मला गोळ्या घाला. मला लोटून दिलं. मला उठता येत नाही. माझ्यात शक्ती नाही. ज्या माणसाच्या पोटात पाच दिवसापासून पाण्याचा थेंब नाही तो माणूस उठू शकत नाही. मला उठता येईना, मी बसून राहिलो. मला मीडियासमोर गोळ्या घालूद्या. कर्फ्यू लावला. शिंदे साहेब गावात कर्फ्यू लागलाय, थाबवा. तीन महिने झालं, समिती काम करत नाही. मी टीव्ही 9च्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो, लाठीचार्ज करु नका. लोकं घाबरायला लागले आहेत. तुम्ही लहान मुलांना मारलं”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.