AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 डिसेंबरनंतर मराठा आंदोलनाची काय दिशा असणार? मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितंल, म्हणाले…

Manoj Jaranage Patil : मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेत वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी केली होती. जरांगे यांनी यावर आपली काय प्रतिक्रिया दिली जाणून घ्या.

24 डिसेंबरनंतर मराठा आंदोलनाची काय दिशा असणार? मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितंल, म्हणाले...
मनोज जरांगे
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 17, 2023 | 11:31 AM
Share

जालना :राठा आरक्षणाचा  विषय आणखीनच चिघळत चालला असल्याचं दिसत आहे. मनोज जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. सरकारकडून मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगे यांची भेटत अल्टिमेटमबाबत विचार करावा असं म्हटलं होतं. २४ डिसेंबरच्या अल्टिमेटमचा परत एकदा विचार करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली होती. त्यामुळे यावर जरांगे सरकारला वेळ वाढवून देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

आम्हाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण पाहिजे. सरकार आरक्षण देईलच, नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज आहोत. परंतु त्यांना जो 24 डिसेंबपर्यंतचा जो त्यांना वेळ दिलेला आहे. त्यातला एक घंटाही कमी होणार नाही आणि नाही पण त्यांनी वेळ वाढवून मागितलेली आहे. वेळ नाही नाही मी कालच सांगितलं आणि हे मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगितलं असून मी आडून मी चर्चा करत नाही,  असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजच्या लेकरांच्या हिताचा आज निर्णय होणार आहे. आमच्या नोंदी असताना आम्हाला का आरक्षण देत नाही, सरकार का वेठीस धरत आहे. आज 3 वाजेपर्यंत निर्णय होणार आहे, नोंदीच्या आधारे निर्णय घ्यावा. मराठा समाजाच्या नोंदी मिळल्या आहेत आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत असल्याचंही जरागेंनी सांगितलं.

मी त्यांना सांगितलं, जे उपोषण सोडताना आले होते. त्यावेळी जे कागदावरती लिहिलं होतं, ते फक्त तुम्ही एकदा वाचा. तुम्ही ते वाचलं की तुम्हाला वेळ मागायची गरजच पडणार नाही. कारण तुमच्या हातात आणखीन आठ- दहा दिवस आहेत. त्यामुले तुम्हाला वेळ मागायची गरज पडणार नसल्याचं जरांगे म्हणाले.

दरम्यान, आता हा शेवटचा लढा आहे त्यामुळं लढूनच आरक्षण मिळवायचं आहे. दमायचा नाही पर्फेक्ट नियोजन काय जे करायचंय ते नियोजनबद्ध निर्णायक ठोस ठरवून चांगली बांधणी करणार असल्याचं जरागेंनी सांगितलं. मराठा संघटना आणि जरांगे यांच्यात 12 ते 3 अशा तीन तास बैठक चालणार आहे यामध्ये  काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?