AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईवरुन कोकण-गोव्यात जाणाऱ्यांसाठी चांगली बातमी, 26 जानेवारीपासून मिळणार ही नवीन सुविधा

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर सर्वांत अवघड आणि धोकेदायक कशेडी घाट आहे. या घाटात सुमारे दोन किलोमीटरचे येण्या-जाण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे केले आहे. कशेडी बोगदा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वाहनधारकांना चांगला दिलासा मिळणार आहे.

मुंबईवरुन कोकण-गोव्यात जाणाऱ्यांसाठी चांगली बातमी, 26 जानेवारीपासून मिळणार ही नवीन सुविधा
Mumbai Goa Highway
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 02, 2025 | 11:24 AM
Share

Mumbai Goa Highway Second Tunnel in Kashedi Ghat: मुंबई-गोवा महामार्गाबाबत गेल्या काही वर्षांपासून चर्चा होत आहे. या महामार्गाचे काम रखडले आहे. गेली अठरा वर्षे झाली या महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. या महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे गोवा अन् कोकणला जाणारे वाहनधारक संतप्त आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या महामार्गासाठी डिसेंबर 2024 ची दिलेली डेडलाईन आता हुकली आहे. परंतु त्यातील एक चांगली बातमी आली आहे. या महामार्गावरील कशेडीतील दोन्ही बोगदे 26 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.

कशेडी येथील पहिल्या बोगद्यातून दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरळीत सुरू आहे. दुसऱ्या बोगद्यात तात्पुरत्या स्वरूपातील वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आला होता. कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासाठी विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. विद्युतीकरणाची कामे जवळपास पूर्ण झाल्यावर दोन्ही बोगदे 26 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील.

45 मिनिटांचा प्रवास 8 मिनिटांत

मुंबई-गोवा महामार्गावर सर्वांत अवघड आणि धोकेदायक कशेडी घाट आहे. या घाटात सुमारे दोन किलोमीटरचे येण्या-जाण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे केले आहे. कशेडी बोगदा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वाहनधारकांना चांगला दिलासा मिळणार आहे. या महामार्गावर बोगद्याच्या परिसरात 45 मिनिटांचा असणारा प्रवास 8 मिनिटांत होणार आहे. यामुळे कोकणवासियांचा रस्ते प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

मुंबई-गोवा हा महामार्ग कोकणवासीयांसाठी महत्वाचा आहे. 503 किलोमीटरचा महामार्ग कोकणातून जातो. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर कोकणातील पर्यटन वाढणार आहे. तसेच जेएनपीटीमधील कंटेनरची वाहतूक करणारे भारतामधील सर्वात मोठे बंदर आणि निर्माणाधीन असलेले दिघी बंदर या महामार्गाला जोडली जातात. त्यामुळे व्यापारी वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते. मुंबई कोकणातील असंख्य चाकरमाने राहतात. ते गणपती, होळी किंवा इतर वेळी गावी जात असतात. त्या काळात रेल्वे आरक्षण फुल्ल असते. त्यामुळे त्यांच्यासाठी रस्ते प्रवास सोयीचा होतो. परंतु महामार्गाचे काम पूर्ण नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणी येतात. बोगदे पूर्ण होत असले तरी महामार्ग कधी पूर्ण होणार? हा प्रश्न कोकणवासियांना आहे.

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय