‘क्या बोलती पब्लिक’ सप्टेंबर महिन्यात कँपेन राबवणार, अभिजीत दिपके यांची मोठी घोषणा

अभिजीत दिपके यांनी गुरुवारी केंद्राच्या एनडीए सरकारवर टीका करताना म्हटले की विद्यार्थ्यांनी या सरकारला राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. गेल्या 14 वर्षांत देशाने दडपशाही आणि हुकुमशाही पाहिली आहे. परंतू, आता लोकांच्या मनातील भीती संपली आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लोक आता यांना घाबरत नाहीत.

क्या बोलती पब्लिक सप्टेंबर महिन्यात कँपेन राबवणार, अभिजीत दिपके यांची मोठी घोषणा
abhijeet dipke
| Updated on: Aug 06, 2026 | 7:50 PM

आजच्या काळात शिक्षण घेणे म्हणजे डोक्यावर कर्ज होते. आपल्या देशातले शिक्षण सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे आहे. आम्हाला देशातल्या शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवायची आहे. लोकांचा सर्वात जास्त राग देशातल्या मिडीयावर आहे. 60 टक्के लोक 35 वयाच्या खालचे आहेत. कोर्टात जाऊन पक्षही फोडले जात आहेत. सामान्य लोकांना न्यायालयात तारीखही मिळत नाही.  लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे, बेरोजगारी हा भारतातला सर्वात मोठा मुद्दा आहे. डिलिव्हरी बॉय होण्याचे कोणत्याच युवकाचे स्वप्न नसते. जंतरमंतरवर विद्यार्थीच नव्हे तर बेरोजगारही होते असे अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे.

जंतरमंतर आंदोलनानंतर कॉक्रोज जनता पार्टीचे अभिजीत दिपके प्रसिद्ध झाले आहेत.त्यांनी संभाजीनगरात दोन दिवसात बैठका घेतल्यानंतर आज आपली भूमिका मांडली आहे. अभिजीत दिपके यावेळी म्हणाले की CJP नेमकी काय आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, त्यांच्या विचारावर चालणारी ही पार्टी असणार आहे. जी संविधानाची विचारधारा आहे तीच आमची विचारधारा आहे.आम्ही सेक्युलर आहोत, लोकशाहीवर भरोसा ठेवतोय असे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे.

‘क्या बोलती पब्लिक’

कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दोन दिवसांच्या चर्चेनंतर आता आपला पुढचा प्लान जाहीर केला आहे. कॉक्रोच जनता पार्टी या वर्षी सप्टेंबरमध्ये ‘क्या बोलती पब्लिक’ नावाने एक राष्ट्रव्यापी कँपेन सुरु करणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश्य देशभरातील लोकांच्या आकांक्षा, अपेक्षा आणि चिंतेला जवळून समजणे आणि संवाद स्थापित करणे हा आहे. आम्ही देशभरात दौरा करणार आहोत,लोकांच्या समस्या आणि अडचणी समजून घेणार आहोत. शिक्षण आणि बेरोजगारी याबद्दल कोणी बोलत नाही, संसदेत कोणी बोलत नाही. सरकारला तर असं वाटते की हा काही मुद्दा नाही. सरकार फक्त एकच मुद्दा आणते तो म्हणजे हिंदू आणि मुसलमान असेही दीपके यांनी म्हटले आहे.

बेरोजगारी हा भारतातला सर्वात मोठा मुद्दा

आजच्या काळात शिक्षण घेणे म्हणजे डोक्यावर कर्ज होते. आपल्या देशातले शिक्षण सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे आहे. आम्हाला देशातल्या शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवायची आहे. लोकांचा सर्वात जास्त राग देशातल्या मिडीयावर आहे. 60 टक्के लोक 35 वयाच्या खालचे आहेत. कोर्टात जाऊन पक्षही फोडले जात आहेत. सामान्य लोकांना न्यायालयात तारीखही मिळत नाही. लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे, बेरोजगारी हा भारतातला सर्वात मोठा मुद्दा आहे. डिलिव्हरी बॉय होण्याचे कोणत्याच युवकाचे स्वप्न नसते. जंतरमंतरवर विद्यार्थीच नव्हे तर बेरोजगारही होते असेही अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us