AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक… लाडकी बहीण योजनेमुळे नवरा-बायकोंवर घटस्फोटाची वेळ? शेतकरी महिलेने उद्धव ठाकरेंना नेमकं काय सांगितलं?

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे कुटुंबात वाद, अगदी घटस्फोटाची वेळ आल्याचे समोर आले आहे. धाराशिव येथे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान, एका महिलेने ई-केवायसीमुळे गाडी घेण्यास विरोध केल्याने नवरा-बायकोत भांडणे झाल्याचे सांगितले.

धक्कादायक... लाडकी बहीण योजनेमुळे नवरा-बायकोंवर घटस्फोटाची वेळ? शेतकरी महिलेने उद्धव ठाकरेंना नेमकं काय सांगितलं?
| Updated on: Nov 06, 2025 | 1:06 PM
Share

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरु केलेली लाडकी बहिण योजना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र आता याच लाडकी बहीण योजनेमुळे घराघरात भांडण सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे नवरा बायकोचा घटस्फोट होण्याची वेळ आली आहे. नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एका शेतकरी महिलेने लाडकी बहीण योजनेमुळे कुटुंबात समस्या निर्माण होत असल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे हे धाराशिव दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एका आंदोलक महिला शेतकऱ्याने सरकारच्या अटी नियमांवर आक्रमक भाष्य केले. लाडकी बहीण योजनेमुळे एका कुटुंबात घटस्फोटाची वेळ आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. धाराशिवमध्ये लाडकी बहीण योजनेमुळे एका शेतकरी कुटुंबात मोठी समस्या उभी राहिली आहे. या योजनेतील अटींमुळे नवरा-बायकोच्या संसारात वादळ निर्माण झाले आहे. यामुळे ते थेट घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

लाडक्या बहिणीच्या पैशामुळे घरात नवरा-बायकोचा घटस्फोट होण्याची वेळ

माझा नवरा गाडी घेण्याच्या विचारात होता. मात्र, गाडी घेतल्यास लाडकी बहीण योजनेतून मिळणारे दीड हजार रुपये बंद होतील या भीतीने मी त्याला विरोध केला. यावरुन आम्हा पती-पत्नीमध्ये भांडण झाले. आता हे भांडण टोकाला जाऊन घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे, अशी तक्रार त्या महिला शेतकऱ्याने केली. या घटनेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या योजना कशा कुटुंबांमध्ये फूट पाडत आहेत यावरुन जोरदार टीका केली. लाडक्या बहिणीच्या पैशामुळे घरात नवरा-बायकोचा घटस्फोट होण्याची वेळ आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

धाराशिव येथील चौपालमध्ये आणि शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर सडकून टीका केली. या सरकारने फसवे पॅकेज जाहीर केले आहे. आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही, फक्त आमच्या मालाला हमीभाव द्या. शेतकऱ्याला तुमची भीक नकोय. त्याला त्याच्या हक्काचा भाव हवा आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

अजित पवारांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवू

हिंमत असेल तर सरकारने खात्यात रक्कम जमा करून येथे येऊन दाखवावे. अजित पवारांनी हिंमत असेल तर कर्जमाफी द्यावी. आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवू. शेतकऱ्यांनी सरकारचा भ्रमाचा भोपळा आणि टरबूज फोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जात-पात, धर्म सोडून एकजूट राहावे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

यावेळी काही शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे तक्रार केल्या. नुकसानीपोटी अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. हेक्टरी २ रुपये ते ७ हजार रुपये अशी तुटपुंजी मदत मिळाली असून, दिवाळीत हायब्रीड (खराब) धान्य मिळाले असल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी केली. तसेच येरमाळा गावातील उपोषणकर्त्या महिला शेतकऱ्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. मी कोणत्याही राजकीय पक्षाची नाही, तर सामाजिक कार्यकर्ती आहे. आम्ही चार दिवस आमरण उपोषण केले, तरी सरकारने दखल घेतली नाही. मी जेव्हा झाडावर चढले, तेव्हा कुठे सरकार जागे झाले, असे ती महिला म्हणाली. या सर्व घटनाक्रमामुळे धाराशिवमधील शेतकरी वर्गातील असंतोष आणि सरकारी योजनांची दुर्दशा स्पष्ट दिसून येत आहे.

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र