AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे-फडणवीस सरकार कधी पडणार? ठाकरे गटाच्या या नेत्यानं केली भविष्यवाणी

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असा दावा ठणकावून चंद्रकांत खैरे यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

शिंदे-फडणवीस सरकार कधी पडणार? ठाकरे गटाच्या या नेत्यानं केली भविष्यवाणी
Image Credit source: Google
| Updated on: Nov 22, 2022 | 4:15 PM
Share

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पहिल्यापासून पटत नव्हतं, आताही पटत नाही असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हंटलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार दोन महिन्यात पडेल असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी बोलतांना त्यांनी रावसाहेब दानवे आणि संजय राऊत यांच्या विधानाचा दाखला दिला आहे. रावसाहेब दानवे यांनी देखील हसत-हसत राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणून खळबळ उडवून दिली होती. त्याचाच आधार घेत संजय राऊत यांनी सरकार पडणार असा दावा करत असतांना रावसाहेब दानवे हे कधी कधी खरं बोलतात असाही दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. सुरुवातीपासूनच शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप करत ते कधीही कोसळू शकते असा आरोप विरोधकांनी वारंवार केला आहे. मात्र, याच दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा दावा करत चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकार येत्या दोन महिन्यात पडेल असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा दाखला देत केला आहे.

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद बंदची हाक दिली आहे, त्यामध्ये त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला आहे त्यावर देखील खैरे यांनी खडेबोल सुनावले आहे.

रावसाहेब दानवे त्यांचे सासरे आहे त्यांना रेल्वे आणायची आहे त्यासाठी त्यांनी लोटांगण घालवं असा देखील चंद्रकांत खैरे यांनी टोला लगावला आहे.

याशिवाय हर्षवर्धन जाधव हे काहीही बोलत असतात, सायको माणूस असल्याची टीका देखील चंद्रकांत खैरे यांनी केल्याने वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असा दावा ठणकावून चंद्रकांत खैरे यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.