AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठे संपूर्ण कुटुंब संपलं, तर कुठे विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत; महाराष्ट्रात 48 तासांत मृत्यूचं तांडव

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत भीषण अपघातांचे सत्र पाहायला मिळाले. अकोला, कोल्हापूर, लातूर, मुंबई आणि पुण्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये चिमुकल्यांसह अनेकांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.

कुठे संपूर्ण कुटुंब संपलं, तर कुठे विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत; महाराष्ट्रात 48 तासांत मृत्यूचं तांडव
maharashtra accident
| Updated on: Jun 05, 2026 | 12:06 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात रस्ते अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यातच गेल्या ४८ तासात राज्याच्या विविध भागांत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारे अपघात घडल्याचे पाहायला मिळत आहेत. राज्यातील अकोला, कोल्हापूर, मुंबई, लातूर, ठाणे आणि पुणे या ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये चिमुकल्यांसह अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला. वेगावरील नियंत्रण सुटल्याने आणि बेशिस्त वाहतुकीमुळे अनेक हसतीखेळती कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अकोल्यात शेताकडे निघालेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू

अकोला ते दर्यापूर रस्त्यावरील खरब परिसरात आज पहाटे ५.३० च्या सुमारास एक भीषण अपघात झाला. खरब येथील स्थानिक रहिवासी विजय इंगळे आणि प्रतिभा इंगळे हे पती-पत्नी पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून शेताकडे निघाले होते. दरम्यान, एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला असून सिव्हिल लाईन पोलिसांनी पंचनामा करत तपास सुरू केला आहे.

कोल्हापुरात मुंबईच्या चांदे कुटुंबावर काळाचा घाला; चौघांचा अंत

उन्हाळी सुट्टीसाठी आणि गावाकडे बांधलेल्या नवीन घरात राहण्यासाठी मुंबईहून आलेल्या चांदे कुटुंबावर कोल्हापुरात काळाने झडप घातली. आजरा तालुक्यातील उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर दुचाकी आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दीपक चांदे (३९), शोभा चांदे (३५), जय चांदे (१०) आणि पूर्वा चांदे (७) या एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण व्होन्याळी गावचे रहिवासी होते. उद्या ते मुंबईला परतणार होते. त्यापूर्वी नातेवाईकांना भेटण्यासाठी दुंडगे गावाकडे जात असताना हा भीषण अपघात घडला.

लातूरमध्ये दोन विद्यार्थ्यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

तर लातूर शहरातील पिव्हीआर चौक भागात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पालकांना न सांगता दुचाकीवरून कॉम्प्युटर क्लासला निघालेल्या दोन १७ वर्षीय विद्यार्थ्यांना भरधाव ट्रकने चिरडले. पार्थ बरचे (१७) आणि प्रतीक सांगवे (१७) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. या अपघातामुळे लातूर शहरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्यात कारची दुचाकीला धडक; तरुणासह ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, CCTV समोर

पुण्यातील खराडी परिसरात ३१ मे च्या रात्री विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघाताचा थरारक CCTV व्हिडीओ आता समोर आला आहे. या अपघातात पवन पांडुरंग भारंबे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी झालेल्या दीपराज तुषार कोल्हे या ३ वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता अपघातानंतर कारचालक फरार झाला असून खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई नाशिक महामार्गावर नियंत्रण सुटले, २०० फूट खाली रेल्वे ट्रॅकवर कोसळून एकाचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळ मुंबई-नाशिक महामार्गावर खर्डी रेल्वे पुलावर मोटरसायकल चालकाचे नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात झाला. दुचाकी पुलाच्या संरक्षक कठड्याला घासली आणि त्यावरील दोघेही थेट २०० फूट खाली रेल्वे ट्रॅकवर फेकले गेले. या भीषण घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांच्या मदतीने खर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोन्ही तरुण अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

मुंबईत बसच्या धडकेने ऑटो रिक्षा उलटली, एकाचा मृत्यू

मुंबईतील दहिसर भागात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एका बसने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे रिक्षा महामार्गावरच पलटी झाली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे हायवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे.

पालघरमध्ये भरधाव ट्रक थेट घरात घुसला; ग्रामस्थांचा तीव्र संताप

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धनिवरी परिसरात एका भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट महामार्गालगत असलेल्या एका घरात घुसल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वीच याच भागात एका साखरपुड्याच्या वाहनाला झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला होता. प्रशासनाने अद्यापही येथे सुरक्षेच्या उपाययोजना न केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Follow Us
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा