Maharashtra Assembly Election Highlights : पुणे शहरात अजित पवार समर्थकांनी दिल्या मुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा
Maharashtra Assembly Election 2024 Highlights : सध्या राज्यातील 4 हजार 136 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद झालं आहे. आता सर्वांचेच लक्ष 23 नोव्हेंबरला निकालाकडे लागले आहे. राज्यात कुणाचं सरकार येणार? याची उत्सुकता आता सर्वसामान्यांमध्ये दिसून येत आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Highlights Updates in Marathi: राज्यातील एकूण 288 मतदारसंघांमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 6 असे तब्बल 11 तास मतदानप्रक्रिया पार पडली. या मतदार प्रक्रियेदरम्यान कुठे तुफान राडे पाहायला मिळाले. तर कुठे ज्येष्ठ नागरिकांसह वयस्कर मतदारांनीही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. आता सध्या राज्यातील 4 हजार 136 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद झालं आहे. आता सर्वांचेच लक्ष 23 नोव्हेंबरला निकालाकडे लागले आहे. राज्यात कुणाचं सरकार येणार? याची उत्सुकता आता सर्वसामान्यांमध्ये दिसून येत आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
पुणे शहरात अजित पवार समर्थकांनी दिल्या मुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा
पुण्यात मार्केट यार्ड परिसरात अजित पवारांच्या समर्थनार्थ शुभेच्छांचे फलक लागले आहेत. या फलकांवर अजित पवार यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आले.
-
राहुल गांधी जयपूरला पोहोचले, लग्नसोहळ्यात सहभागी होणार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी जयपूरला पोहोचले आहेत. पुढील तीन दिवस ते येथेच राहणार आहे. येथे ते एका कौटुंबिक मित्राच्या लग्न समारंभात सहभागी होणार आहेत.
-
-
खासदार नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. खासदार नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला गेले आहेत.
वर्षा निवासस्थानी राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये भेट सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची समजली जात आहे. -
भाजपच्या अतुल सावे यांनी मतदारांना पैसे वाटले : इम्तियाज जलील
भाजपच्या अतुल सावे यांनी मतदारांना पैसे वाटले, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत व्हीडिओ दाखवत हा आरोप केला आहे. संभाजीनगरमध्ये ‘नोट फॉर व्होट’चा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय. सर्व व्हीडिओ आबंडेकर नगरमधील असल्याचा दावा जलील यांनी केला आहे.
-
राज्यात महाविकास आघाडीच सरकार येईल-जितेंद्र आव्हाड
सत्तेची आलेली मुजेरी ही जनतेला आवलेली नाही त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीच सरकार येईल असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
-
कोथरुड येथे निकालाआधीच चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे बॅनर लागले
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचे निकालापूर्वीच विजयाचे बॅनल लागले आहेत.
-
काँग्रेसची मोठी चाल, आतापासूनच बंडखोरांशी संपर्कात
काँग्रेसने निकालापूर्वीच एक पाऊल टाकले आहे. काँग्रेसने आतापासूनच बंडखोरांशी संपर्क साधला आहे. जे बंडखोर विजयी होण्याची शक्यता आहे. त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर काँग्रेस नेते सक्रिय झाले आहेत.
-
सोलापूरात वाद उफळला
काँग्रेसच्या ऐनवेळी दिलेल्या पाठिंब्यानंतर महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांच्याकडून खंत व्यक्त करण्यात आली. मी महाविकास आघाडीतून इच्छुक होतो पण मला ऐनवेळी तिकीट दिलं नाही. प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी आधीच पाठीशी राहणार असल्याचे सांगितलेलं होतं, पण त्यांनी उशिरा म्हणजे काल पाठिंबा जाहीर केला, असे ते म्हणाले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने प्रणिती शिंदे यांच्यावर घात केल्याचा आरोप केला आहे.
-
राज्यपालांची भूमिका महत्त्वाची
निकालानंतर जर स्पष्ट बहुमत मिळाले नाही. अथवा त्रिशंकुची परिस्थिती उद्धभवल्यास काय होईल, यावर घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या मते, 23 तारखेच्या निकालानंतर राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. ज्या गटाकडे बहुमत असणार त्यांना बहुमताचे पत्र राज्यपालांना द्यावे लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
-
22 संवेदनशील मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी
परळीतील 22 संवेदनशील मतदान केंद्रावरील मतदान फेर घेण्यात यावे अशी मागणी उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. मतदान केंद्रावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे कनेक्शन बंद करण्यात आले होते. त्या नंतर परळी तील बँक कॉलनी परिसरात माधव जाधव आणि त्यांच्या अंगरक्षकाला मारहाण झाल्याचा आरोप देशमुख यांनी केला. लोकशाही मार्गाने मतदान झाले नाही, असे ते म्हणाले.
-
अदानी प्रकरणात कायदानुसार कारवाई
अदानी प्रकरणात कायदानुसार कारवाई करण्यात येईल, असे भाजपाने स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांवर भाजपानं उत्तर दिले आहे. अमेरिकेतली दाखल खटल्यात काँग्रेसशासित राज्य असल्याचा ठपका भाजपाने केला आहे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप केले आहेत.
-
जिकडे एकनाथ शिंदे, तिकडे आम्ही
एकनाथ शिंदे हे जिकडे जातील तिकडे आम्ही त्यांचं शर्ट पकडून जायला तयार आहोत, सत्ता स्थापनेवरून संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य आलं आहे. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे शरद पवार यांच्याकडे गेले तर काय कराल या प्रश्नावर संजय शिरसाट यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
-
परळीत राड्याप्रकरणात 40 जणांवर गुन्हा
परळी मतदारसंघातील घाटनांदुर मतदान केंद्रावर झालेल्या घटनेबाबत पोलीस ॲक्शन मोडमध्ये आली आहे. 40 जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे.
-
भास्कर जाधव यांनी गाडीत जाऊन मानले आभार
मतदान करून मुंबईला निघालेल्या गावोगावच्या चाकरमान्यांचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव यांनी प्रत्येक गाडीमध्ये जाऊन आभार मानले आणि त्यांना सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
-
परळीत 40 जणांवर गुन्हा दाखल
परळी मतदारसंघातील घाटनांदूर मतदान केंद्रावर झालेल्या घटनेबाबत पोलीस ॲक्शन मोडमध्ये आली आहे. 40 जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे.
-
निकालाआधीच विजयाचे बॅनर
विधानसभा निवडणुकीच्या निकाला आधीच अहिल्यानगर शहरात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहे. शहरातील माळीवाडा वेश परिसरात संग्राम जगताप यांची तिसऱ्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा अशाचे बॅनर लावण्यात आले आहे.
-
ठाकरे गट आणि काँग्रेस मधीलवाद विकोपाला
सोलापुरात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद विकोपाला गेला आहे. युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षानी शिवसेना उपनेते शरद कोळींना ईशारा दिला आहे. प्रणिताताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो असा इशारा दिला आहे.
-
कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
कोल्हापूरच्या जाधव वाडीमधील शाळेमध्ये प्रार्थनेवरून तणाव निर्माण झाला. प्रार्थनेतील गाण्यांमधून एका विशिष्ट धर्माच उदातीकरण होत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप केला आहे.
-
संपूर्ण देश अदानींच्या ताब्यात – राहुल गांधी
“गौतम अदानींवरील घोटाळ्याचे आरोप मी केले नाहीत. अदानींची JPC चौकशी झाली पाहिजे. ज्या दिवशी अदानींना अटक होईल, त्या दिवशी मोदी सुद्धा जातील. अदानी भारतात रोज भ्रष्टाचार करत आहेत. संपूर्ण देश अदानींच्या ताब्यात आहे” असे आरोप राहुल गांधी यांनी केले आहेत.
-
गौतम अदानींना अटक झाली पाहिजे – राहुल गांधी
“गौतम अदानींना अटक झाली पाहिजे. अदानींना अटक होऊ शकत नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानींच्या पाठिशी आहेत. अदानींच भाजपाला पूर्णपणे समर्थन आहे. मोदी अदानींच संरक्षण करत आहेत” असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले.
-
105 पेक्षा जास्त जागा जिंकू – चंद्रशेखर बावनकुळे
“मला वाटतं अंदाजित आकडा आम्ही पार करु. सध्या आमचे 105 आमदार आहेत, त्यापेक्षा जास्त जागा जिंकू. एकनाथ शिंदे, अजितदादा यांचाही परफॉर्मन्स चांगला राहिलं. आमच्या तिघांच्या मिळून बहुमतापेक्षा जास्त जागा निवडून येतील” असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
-
मतांचा टक्का वाढला, त्याचा फायदा आम्हाला – चंद्रशेखर बावनकुळे
“लाडकी बहिण, शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान केलय. मतांचा टक्का वाढला, त्याचा फायदा आम्हाला होईल” असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
-
करमाळा विधानसभा मतदारसंघात 69.72% मतदान, स्त्रियांच्या मतदानाचा टक्का वाढला.
करमाळा विधानसभा मतदारसंघात 69.72% मतदान झालं. स्त्री मतदानाचा टक्का वाढला
करमाळा विधानसभा विधानसभेसाठी 69.72 टक्के मतदान झालं.
एकूण मतदान 2 लाख 29 हजार 375
पुरुष मतदार – 1,23,517
स्त्री मतदार – 1,05,853
-
एक्झिट पोलनंतर भाजप आता ॲक्शन मोडवर
एक्झिट पोलनंतर भाजप आता ॲक्शन मोडवर, भाजपच्या बंडखोरांशी पक्षाचे नेते संपर्क साधणार असल्याची सूत्रांची माहिती. भाजपच्या विजय बंडखोरांविरोधातील कारवाई मागे घेणार असल्याची माहिती असून त्या त्या विभागातील वरिष्ठ नेत्यांवर संपर्काची जबाबादारी देण्याची आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
निवडणूक प्रक्रिया आटोपून परतणारे बीएलओ यांचा दुचाकी अपघातात मृत्यू
जळगावातील चोपडा येथून निवडणूक प्रक्रिया आटोपून परतणारे बीएलओ यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. लक्ष्मीकांत पाटील ( वय 48 ) असे या मृत बीएलओचे नाव आहे. ते चोपडा तालुक्यात अनवर्दे खुर्द येथे शिक्षक आणि बीएलओ म्हणून कार्यरत होते
रात्री ते दुचाकीवरून चोपडा येथून बभळाज, ता शिरपूर या मूळ गावी जात होते. त्याचवेळी समोरून आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
-
एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांची हॉटेलवारी ?
एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांची हॉटेलवारी होण्याची शक्यता आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असून त्याला अद्याप 2 दिवस बाकी आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पक्ष आपापल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची शक्यता आहे.
-
ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली स्ट्राँगरूम आहे. कुलाबा विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉंगरूम जे जे स्कूल ऑफ आर्ट्स या ठिकाणी असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलाय.
२३ तारखेला मतमोजणी होणार असून तोपर्यंत ईव्हीएम मशीन चोख बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत.
-
26 नोव्हेंबरनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता
26 नोव्हेंबरनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपतेय. राज्य विधानसभेचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. या निकालानंतर राजकीय पक्षांच्या वाटाघाटीनंतर नवीन सरकार 26 नोव्हेंबरच्या अगोदर स्थापन होणं अपेक्षित आहे. मात्र, तोपर्यंत महाविकास आघाडी अथवा महायुती सरकार स्थापन करू शकली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल केंद्राकडे करू शकतात.
-
जळगावमध्ये मतदानाच्या दिवशी दोन कुटुंबांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
जळगावच्या राज मालती नगरमध्ये काल मतदानाच्या दिवशी दोन कुटुंबांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज मालती नगरमध्ये काल दुपारी दोन कुटुंबांमध्ये असलेल्या जुन्या वादातून झालेल्या तुफान हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सिद्धार्थ ऊर्फ बाळासाहेब वानखेडे असं मृत तरुणाचं नाव आहे. कुटुंबाच्या दोन गटात हाणामारी होत असताना बघ्यापैकी कोणीतरी हा व्हिडिओ चित्रित करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं समोर आला आहे.
-
पुणे- शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीची तयारी
पुणे- शहरातील आठही विधानसभा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगम महामंडळाच्या गोडाऊनमध्ये पार पडणार आहे. या ठिकाणी ईव्हीएम मशीन आणल्या गेल्या असून थ्री लेयर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. 24 सीसीटीव्ही कॅमेरांची करडी नजर या ठिकाणी असणार आहे.
-
राजधानी दिल्लीत आज संध्याकाळी भाजपची महत्त्वाची बैठक
राजधानी दिल्लीत आज संध्याकाळी भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्ड्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीवर चर्चा होणार आहे. मविआ नेत्यांची आज महत्त्वाची बैठक आहे, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. निवडणूक निकालासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे.
-
एकनाथ शिंदे यांनी शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला केलं अभिवादन
‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिना’निमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हेदेखील यावेळी उपस्थित होते.
-
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे भीषण अपघात
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर अपघात, बस 20 फूट खाली खड्ड्यात कोसळली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झालाय,या अपघातानंतर खाजगी बस 20 फूट खड्ड्यात कोसळली. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने मागून धडक दिल्याने बसवरील चालकाचा ताबा सुटला अन बस मार्ग सोडून खड्ड्यात कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी नाही, मात्र बसमधील अकरा प्रवासी यात जखमी झालेत. मध्यरात्री तीन वाजता हा अपघात घडला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
-
नाशिकमध्ये 67.97 टक्के मतदान
नाशिक विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 67.97 टक्के मतदान झालं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 05.37 टक्क्यांची वाढ होत आहे. दोन माजी मंत्री, एक विधानसभा उपाध्यक्ष यांच्यासह 196 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद आहे. सर्वाधिक 78.01 टक्के मतदान दिंडोरी मतदार संघात. तर सर्वात कमी 56.08 टक्के मतदान नाशिक मध्य मतदारसंघात झालं आहे. 2019 मध्ये महिलांचे मतदान 56.06 टक्के, तर 2024 मध्ये महिलांचे मतदान 66.96 टक्के होते. महिलांच्या मतदानामध्ये यंदा 9.33 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
-
बुलढाणा जिल्ह्यात ७०.३२ टक्के मतदान
बुलढाणा जिल्ह्यात ७०.३२ टक्के मतदान झालं आहे. जिल्ह्यातील २१३४५०० मतदान पैकी १५०१०२३ मतदारांनी मतदान केले. पैकी ७८७८१७ पुरुषांनी बजावला मतदानाचा हक्क तर ७१३१९१ महिलांनी मतदान केले. २०१९ चे तुलनेत यावेळी महिलांचा मतदान टक्का वाढला आहे. साधारण १० टक्के पेक्षा जास्त महिलांनी मतदान केले आहे.
-
घरात मृतदेह असताना परिवाराने बजावला मतदानाचा हक्क
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कळमळू गावात घरात मृतदेह असताना परिवाराने मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाच्या दिवशी पत्नीचे निधन झाल्याने पती राजेंद्र बच्चे यांनी परिवारातील सदस्यांसह मतदानाचा हक्क बजावला आहे. मुलची चार महिन्यांपूर्वीच अग्निवीर भरतीत निवड झाली होती. मुलगा सैन्य दलाच्या प्रशिक्षणासाठी असल्याने आईला शेवटचा निरोप देण्यासाठी येऊ शकला नाही. मुलीनेच आईला अग्नी दिला. कुटुंबावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
-
पालघर जिल्ह्यात विधानसभेच्या 6 मतदारसंघात अंदाजे 65.95 टक्के मतदान
पालघर जिल्ह्यातील विधानसभेच्या 6 मतदार संघात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. पालघरमध्ये एकूण 65.95 टक्के इतके मतदान झाले. पालघरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद बोडके यांनी याबद्दलची माहिती दिली.
पालघर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघानिहाय अंदाजे मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
128-डहाणू : 72.5
129-विक्रमगड : 77.75
130-पालघर : 71.05
131-बोईसर : 66.17
132-नालासोपारा : 57.1
133-वसई : 60.46 -
चंद्रकांत टिंगरे मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल
पुणे : चंद्रकांत टिंगरे यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार बापू पठारे यांना पाठिंबा दिल्याने माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रकांत टिंगरे यांना मारहाण करणाऱ्या दोघांनी मोटारीवर दगडफेक करून नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
-
भाजपच्या सुनील कांबळेविरोधात पोलिसात तक्रार
पुणे : भाजपच्या सुनील कांबळेविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मतदानाला जात असताना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील कांबळे आणि त्यांच्या समर्थकांनी आम्हाला शिवीगाळ करून मारहाण केली. भाजपला मतदान करा, नाही तर तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी दिल्याचा आरोप भवानी पेठेतील कासेवाडी भागातील मतदारांनी केला आहे. याबाबत कासेवाडीतील रहिवासी सुरेखा राजू खंडाळे यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. सुनील कांबळे आणि समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
-
रत्नागिरी जिल्ह्यात ६५ टक्के मतदान, साडेतीन टक्क्यांनी वाढ
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात ६५ टक्के मतदान झाले आहे. २०१९ च्या विधानसभा मतदानाच्या तुलनेत यावेळच्या निवडणुकीत साडेतीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत ६१,२२ टक्के मतदान झाले होते. तर लोकसभा निवडणुकीत ५८.३ टक्के मतदान झाले आहेत. चिपळूण विधानसभा मतदारसंघात सर्वाच जास्त मतदान ६८.६५ टक्के मतदान झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मतदान दापोली ६५.९५ टक्के, गुहागर ६२.५ टक्के, रत्नागिरी ६३ टक्के आणि राजापूर ६३ टक्के मतदान झाले आहे.
-
Maharashtra Assembly Election : पश्चिम महाराष्ट्रात मतदानाचा टक्का 70 टक्क्यांहून अधिक
पश्चिम महाराष्ट्रात मतदानाचा टक्का ७० टक्क्यांहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सायंकाळपर्यंत रांगा, महिलांचा उत्साह लक्षवेधी पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सरळ लढतीसोबतच मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळाली. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूरमधील विधानसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा टक्का वाढलेला दिसत आहे.
-
वाशिम जिल्ह्यात 66.6 टक्के मतदान, मागील निवडणुकीच्या तुलनेत 3.39 टक्क्यांची वाढ
Maharashtra Assembly Election : वाशिम जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून जिल्ह्यात 66.6 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास जिल्ह्यातील मतांमध्ये 3.39 टक्के मतदान वाढल्याचं दिसून येत आहे. अंतिम आकडेवारीत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र या वाढलेल्या मतदानाचा फायदा नेमका कुणाला होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
विधानसभा निवडणुकीत सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंतिम आकडेवारी वाशिम जिल्ह्यात तिन्ही मतदारसंघात सरासरी 66.06 टक्के मतदान झाले.
वाशिम: 2024:- 64.65%
मागील :2019:-59.19%रिसोड: 2024:- 68.14%
मागील 2019:- 67.05%कारंजा: 2024:- 65.04%
मागील :2019:- 61.77जिल्ह्यात 2024:- 66.06
मागील 2019 :- 62.67%3.39 टक्क्याने मतदान वाढले आहे.
-
पुणे जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदान, बारामतीत किती?
पुणे जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर ग्रामीण भागातील दहा मतदारसंघांत सरासरी ६९ टक्के मतदारांनी मतदान केले. तसेच शहरी भागातील ८ मतदारसंघांत ५४ टक्के मतदान झाले आहे. गेल्या विधानसभा (२०१९) निवडणुकीपेक्षा सहा टक्के मतदान शहरात वाढले आहे. सर्वाधिक ७६.९३ टक्के मतदान इंदापूर तालुक्यात झाले आहे. त्याखालोखाल बारामती आणि मावळ मतदारसंघात ७२ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे आता पुण्यात वाढलेल्या मतांचा लाभ कुणाला होणार असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.
-
ठाण्यात 56.05 टक्के मतदान, कोणत्या विभागात किती?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडले. ठाणे जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा मतदारसंघ असून या सर्व विधानसभा मतदारसंघातून एकूण 56.05 टक्के मतदान झाले.
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
134 भिवंडी ग्रामीण – 69.01
135 शहापूर अ.ज – 68.32
136 भिवंडी पश्चिम – 54.1
137 भिवंडी पूर्व – 49.2
138 कल्याण पश्चिम – 54.75
139 मुरबाड – 64.92
140 अंबरनाथ – 47.75
141 उल्हासनगर – 54
142 कल्याण पूर्व – 58.50
143 डोंबिवली – 56.19
144 कल्याण ग्रामीण – 57.81
145 मिरा भाईंदर – 51.76
146ओवळा माजिवडा – 52.25
147 कोपरी पाचपाखाडी – 59.85
148 ठाणे – 59.01
149 मुंब्रा कळवा – 52.01
150 ऐरोली – 51.5
151 बेलापूर – 55.24 -
मतदानानंतर एक्झिट पोलचे आकडेही आले, आता वेध निकालाचे, कोण जिंकणार?
राज्यात आज 20 नोव्हेंबर रोजी एकूण 288 मतदारसंघात सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान पक्रिया पार पडली. त्यानंतर विविध संस्थेच्या एक्झिट पोलनुसार, कुणाला किती जागा मिळणार? कुणाचं सरकार येणार? याचा अंदाज वर्तवण्यात आला. प्रचार, मतदान, एक्झिट पोल हे निवडणुकीतील टप्पे पार पडले. आता 23 नोव्हेंबरला मतमोजणी आणि निकालाचे सर्वांना वेध लागले आहेत. त्यामुळे आता कोणत्या मतदारसंघातून कोण निवडून येणार आणि कोण पराभूत होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून असणार आहे.
-
पी मार्क्यू एक्झिट पोलचा अंदाज
महायुती – 137 ते 157
मविआ – 126 ते 146 इतर 2-8
-
मॅट्रिझ एक्झीट पोलचा अंदाज
महायुती – 150 ते 170
- भाजप – 89-101
- शिंदे सेना – 37-45
- अजित पवार – 17-26
मविआ – 110 ते 130
- काँग्रेस – 39-47
- ठाकरे सेना – 21-39
- शरद पवार 35-43
इतर – 8 ते 10
-
चाणक्य स्ट्रेटेजीस एक्झीट पोलचा अंदाज
महायुती 152-160
- भाजप 90+
- शिंदे सेना 48+
- अजित पवार 22+
मविआ
- काँग्रेस – 63+
- ठाकरे सेना – 35+
- शरद पवार 40+
- इतर 6-8
-
पोल डायरीच्या एक्झिट पोलचा अंदाज
पोल डायरीच्या एक्झिट पोलचा अंदाज
महायुती – 122 ते 186
भाजप – 77 ते 108
शिंदे सेना – 27 ते 50
अजित पवार – 18 ते 28मविआ
काँग्रेस – 28 ते 47
ठाकरे सेना – 16 ते 35
शरद पवार – 25 ते 39इतर 12-29
-
टीव्ही 9 रिपोर्टर पोलनुसार, राज्यात मविआचं सरकार येण्याचा अंदाज, पाहा संभावित आकडे
टीव्ही 9 रिपोर्टर एक्झीट पोलनुसार, राज्यात मविआचं सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीला 136-145 जागा मिळण्याचा अंदाज हा या पोलद्वारे वर्तवण्यात आला आहे. तर महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
महायुती – 129 ते 139 जागा
भाजप – 80 पेक्षा अधिक जागा
शिवसेना शिंदे गट – 25 पेक्षा अधिक जागा
अजित पवार गट 23 पेक्षा अधिक जागामहाविकास आघाडी 136-145
काँग्रेस 50 पेक्षा अधिक जागा
ठाकरे गट 44 पेक्षा अधिक जागा
शरद पवार गट 42 पेक्षा अधिक जागाइतर 13-23
-
इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलनुसार मविआला सर्वाधिक जागा
इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलनुसार, मविआला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मविआला 150 तर महायुतीला 118 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोणत्या पक्षाला किती जागांचा अंदाज?
महायुती
- भाजप – 78
- शिंदे सेना – 26
- अजित पवार – 14
मविआ
- काँग्रेस – 60
- ठाकरे सेना – 44
- शरद पवार – 46
इतर – 20
-
Exit Poll Results Maharashtra : पी मार्कचा एक्झिट पोल, महायुतीला किती जागा?
पी मार्कचा एक्झिट पोलसमोर आला आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महायुतीला राज्यात 137 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळण्याची शक्यता या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.
-
Exit Poll Results 2024 : एक्झीट पोलनुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज
पोल डायरीच्या एक्झीट पोलनुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला 77-108 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे (अजित पवार) 18-28 उमेदवार जिंकतील, असा अंदाज पोल डायरीने त्यांच्या एक्झीट पोलमधून वर्तवला आहे.
-
पोल डायरीचा एक्झीट पोल, महायुती की मविआ? सर्वाधिक जागा कुणाला? पाहा अंदाज
पोल डायरीच्या या एक्झीट पोलनुसार राज्यात महायुतीचे सर्वाधिक उमेदवार विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पोलच्या अंदाजानुसार, महायुतीचे 122 ते 186 उमेदवार हे जिंकतील. तर मविआचे 69 ते 121 उमेदवार जिंकतील असा अंदाज आहे. तर 12 ते 29 इतर जिंकतील असा अंदाज पोल डायरीने वर्तवला आहे.
-
मतदान झालं, आता साऱ्यांच लक्ष एक्झीट पोलकडे
मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता साऱ्यांचं लक्ष हे एक्झीट पोलकडे लागून आहे. या एक्झीट पोलचा कौल कुणाच्या बाजूने असणार? कोणत्या मतदारसंघात कोण वरचढ ठरणार? याचा अंदाज थोड्यात वेळात एक्झीट पोलच्या माध्यमातून जाणून घेता येणार आहे.
-
मतदानाची वेळ संपली, उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद
मतदानाची वेळ संपली आहे. उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीत कैद झालं आहे. महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झालं आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई शहरात सर्वात कमी तर गडचिरोलीत सर्वाधिक मतदान झालं आहे.
पाहा जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अपडेट🗞️
सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ मतदान.गडचिरोली: ६९.६३% (सर्वाधिक)
मुंबई शहर- ४९.०७ टक्के (सर्वात कमी)#विधानसभानिवडणूक२०२४ #मतदानकरामहाराष्ट्र #मतदानकरूया #MaharahstraElection2024 #DoVoteMaharashtra pic.twitter.com/bG9tjTPu34— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 20, 2024
-
जळगावच्या गेंदालाल मिल परिसरात मतदान करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
जळगावच्या गेंदालाल मिल परिसरात शेवटच्या तासाभरात मतदान करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचा पाहायला मिळत आहे. गेंदालाल मिल परिसरातील महापालिकेच्या शाळेत मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर अवघी काही मिनिंट शेष असताना नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. या मतदान केंद्रातील प्रत्येक बूथसमोर चक्क नागरिकांच्या तीन-तीन रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.
-
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अडुळ-लाडसावंगी मतदान केंद्रावर धीम्या गतीने सुरू मतदान प्रक्रिया
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अडुळ आणि लाडसावंगी मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया धीम्या गतीने सुरू आहे. मतदान यंत्र संथपणे सुरु असल्याने मतदान प्रक्रियेला खिळ बसली आहे. मतदानप्रक्रिया धिम्या गतीने सुरू असल्यामुळे मतदान केंद्राबाहेर नागरिकांची मोठी रांग पाहायला मिळत आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. मतदान यंत्र हळू चालत असल्यामुळे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
-
शरद पवार गटाचे उमेदवार नितेश कराळे मास्तरांना मारहाण
मोठी बातमी समोर आली आहे. वर्ध्यातील शरद पवार गटाचे उमेदवार नितेश कराळे मास्तरांना मारहाण करण्यात आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
-
मुंबई शहरातील 10 मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत अंदाजे 39.34 टक्के मतदान
मुंबई शहरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अल्प प्रतिसाद मिळाल्याचं आतापर्यंतच्या मतदानाच्या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. मुंबई शहरातील 10 मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत अंदाजे 39.34 टक्के मतदान झालं आहे.
कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदार (दुपारी 3 पर्यंतची आकडेवारी)
- १७८-धारावी – ३५.५३ टक्के
- १७९सायन-कोळीवाडा- ३७.२६ टक्के
- १८०- वडाळा – ४२.५१ टक्के
- १८१- माहिम – ४५.५६ टक्के
- १८२-वरळी – ३९.११ टक्के
- १८३-शिवडी – ४१.७६ टक्के
- १८४-भायखळा – ४०.२७ टक्के
- १८५- मलबार हिल – ४२.५५ टक्के
- १८६- मुंबादेवी – ३६.९४ टक्के
- १८७- कुलाबा – ३३.४४ टक्के
-
राज्यात दुपारी 3 पर्यंत 45.53 टक्के मतदान, तुमच्या जिल्ह्याची टक्केवारी किती?
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तर दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 45.53 टक्के मतदान झाले आहे. राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत गोंदिया जिल्ह्यात राज्यातून सर्वाधिक मतदान झालं आहे. गोंदियात दुपारी 3 पर्यंत 53.88 टक्के मतदान झालं आहे.
- अहमदनगर – ४७.८५ टक्के
- अकोला – ४४.४५ टक्के
- अमरावती -४५.१३ टक्के
- औरंगाबाद- ४७.०५टक्के
- बीड – ४६.१५ टक्के
- भंडारा- ५१.३२ टक्के
- बुलढाणा-४७.४८ टक्के
- चंद्रपूर- ४९.८७ टक्के
- धुळे – ४७.६२ टक्के
- गडचिरोली-६२.९९ टक्के
- गोंदिया -५३.८८ टक्के
- हिंगोली – ४९.६४टक्के
- जळगाव – ४०.६२ टक्के
- जालना- ५०.१४ टक्के
- कोल्हापूर- ५४.०६ टक्के
- लातूर _ ४८.३४ टक्के
- मुंबई शहर- ३९.३४ टक्के
- मुंबई उपनगर-४०.८९ टक्के
- नागपूर – ४४.४५ टक्के
- नांदेड – ४२.८७ टक्के
- नंदुरबार- ५१.१६ टक्के
- नाशिक -४६.८६ टक्के
- उस्मानाबाद- ४५.८१ टक्के
- पालघर- ४६.८२ टक्के
- परभणी- ४८.८४ टक्के
- पुणे – ४१.७० टक्के
- रायगड – ४८.१३ टक्के
- रत्नागिरी- ५०.०४टक्के
- सांगली – ४८.३९ टक्के
- सातारा – ४९.८२टक्के
- सिंधुदुर्ग – ५१.०५ टक्के
- सोलापूर -४३.४९ टक्के
- ठाणे – ३८.९४ टक्के
- वर्धा – ४९.६८ टक्के
- वाशिम -४३.६७ टक्के
- यवतमाळ – ४८.८१ टक्के
-
111 वर्षाच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघातील मूलचेरा तालुक्यातील गोविंदपुर या गावाच्या 111 वर्षाच्या आजीबाईंनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. फुलमती बी सरकार अशा या आजीबाईचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आजीबाईंची जन्मतारीख 1 जानेवारी 1913 आहे. या आजीबाईंनी मतदान केंद्रापर्यंत जात मतदानाचा हक्क बजावलाय. तसेच साऱ्या राज्याला एक आदर्श मतदार कसा असावा हे दाखवून दिलंय.
-
परंडा तालुक्यातील रोहकल केंद्रावर मतदान सुरु, दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी मशीन बंद पडल्याने मतदारांची गैरसोय
परंडा तालुक्यातील रोहकल केंद्रावर मतदान सुरु झालं आहे. दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी मशीन बंद पडल्याने मतदारांची गैरसोय झाली होती. मात्र आता दुपारी 2.20 मिनिटांनी मशीन सुरू झाली आहे. सुमारे 45 मिनिटं मशीन बंद होती. मात्र आता मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे.
-
शिवसेना धाराशिवप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांना जीवे मारण्याची धमकी
शिवसेना शिंदे गटाचे धाराशिव जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे ही. जीवे मारण्याची धमकी व्हाट्सॲप कॉलद्वारे देण्यात आली आहे. परंडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांना परंडा ते वारदवाडी दरम्यान प्रवास करताना धमकीचा कॉल आला होता.
-
Thane Election Poll Percentage : ठाण्यात दुपारी 1 पर्यंत 32 टक्के मतदान
ठाणे शहर मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 पर्यंत 32.51 टक्के मतदान झालं.
ओवळा- माजिवडा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 पर्यंत 26.71 टक्के मतदान तर कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 पर्यंत 32.21 टक्के मतदान झालं
मुंब्रा-कळवा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 पर्यंत 27.39 टक्के मतदान झालं
-
बिटकॅाईन आर्थिक गैरव्यव्हार प्रकरणी सखोल चौकशीची शिवसेनेची मागणी.
बिटकॅाईन आर्थिक गैरव्यव्हार प्रकरणी सखोल चौकशीची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी थोड्याच वेळात पोलिस महासंचालकांकडे लेखी तक्रार दाखल करणार आहेत.
बिटकॅाईन घोटाळ्यातील संबधित सर्व राजकीय आणि इतर आरोपींची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र थोड्याच वेळात पोलिस महासंचालकांना शिवसेनेचे पदाधिकारी देणार.
-
Maharashtra Assembly Election : ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघेंवर गुन्हा दाखल
ठाकरे गटाचे कोपरी-पाचपाखाडीचे उमेदवार केदार दिघेंवर गुन्हा दाखल झाला आहे. केदार दिघेंवर दारू आणि पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या वर्षा भोसले यांच्या तक्रारीनंतर दिघेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निवडणुकीला उभे आहेत.
-
Maharashtra Assembly Election : प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी पार पडलं मतदानाचं कर्तव्य
प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी मतदानाचा अधिकार बजावला. कुटुंबियांसहित शंकर महादेवन यांनी वाशी मधील गोल्ड क्रिश शाळेत बजावला मतदानाचा अधिकार . नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केलं. स्वच्छ ,सुंदर आणि पारदर्शक राज्य घडवण्यासाठी नागरिकांनी न विसरता मतदान करावे असे ते म्हणाले.
-
Maharashtra Assembly Election : संजय शिरसाट शिव्या देत असल्याचा अंबादास दानवेंचा दावा, व्हिडीओ ट्विट करत आरोप
अंबादास दानवे यांच्याकडून संजय शिरसाट यांचा आणखी एक व्हिडीओ ट्विट, संजय शिरसाट शिव्या देत असल्याचा अंबादास दानवेंचा दावा. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील प्रकार समोर.
संजय शितसाट यांचीही कोणती पद्धत बोलायची! या खुलेआम धमक्यांची दखल घेऊन @ECISVEEP @CEO_Maharashtra आणि @DGPMaharashtra कारवाई करणार का? #MaharashtraElection2024 #महाराष्ट्र pic.twitter.com/Nz8tMc5TET
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 20, 2024
-
Maharashtra Election Poll Percentage : राज्यात दुपारी १ पर्यंत 32.18 टक्के मतदान
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:
- अहमदनगर – ३२.९० टक्के,
- अकोला – २९.८७ टक्के,
- अमरावती – ३१.३२ टक्के,
- औरंगाबाद- ३३.८९ टक्के,
- बीड – ३२.५८ टक्के,
- भंडारा- ३५.०६ टक्के,
- बुलढाणा- ३२.९१ टक्के,
- चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
- धुळे – ३४.०५ टक्के,
- गडचिरोली-५०.८९ टक्के,
- गोंदिया – ४०.४६ टक्के,
- हिंगोली -३५.९७ टक्के,
- जळगाव – २७.८८ टक्के,
- जालना- ३६.४२ टक्के,
- कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
- लातूर _ ३३.२७ टक्के,
- मुंबई शहर- २७.७३ टक्के,
- मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
- नागपूर – ३१.६५ टक्के,
- नांदेड – २८.१५ टक्के,
- नंदुरबार- ३७.४० टक्के,
- नाशिक – ३२.३० टक्के,
- उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,
- पालघर-३३.४० टक्के,
- परभणी-३३.१२टक्के,
- पुणे – २९.०३ टक्के,
- रायगड – ३४.८४ टक्के,
- रत्नागिरी-३८.५२ टक्के,
- सांगली – ३३.५० टक्के,
- सातारा -३४.७८ टक्के,
- सिंधुदुर्ग – ३८.३४ टक्के,
- सोलापूर – २९.४४,
- ठाणे -२८.३५ टक्के,
- वर्धा – ३४.५५ टक्के,
- वाशिम – २९.३१ टक्के,
- यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.
-
Solapur Election Poll Percentage : सोलापूर जिल्ह्यात 29.44 टक्के मतदान
सोलापूर जिल्ह्यातील दुपारी 1 वाजेपर्यंत 29.44 टक्के एवढे मतदान झाले आहे.
दुपारी 1 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी
– सोलापूर शहर मध्य – 28.61%
– करमाळा विधानसभा -27.34%
– माढा विधानसभा – 26.31%
– बार्शी विधानसभा – 32.71 %
– मोहोळ विधानसभा – 30.51%
– सोलापूर शहर उत्तर विधानसभा – 29.50%
– अक्कलकोट विधानसभा – 33.88%
– सोलापूर शहर दक्षिण – 29.53%
– पंढरपूर विधानसभा – 24.26%
– सांगोला विधानसभा – 31.58%
– माळशिरस विधानसभा – 30.50% -
Palghar Election Poll Percentage : पालघर जिल्ह्यात एकूण 33.40 टक्के मतदान
पालघर जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी समोर आली आहे. पालघर जिल्ह्यात एकूण 33.40 टक्के मतदान झाले आहे.
1) डहाणू : 40.02 टक्के
2)विक्रमगड : 32.1 टक्के
3)पालघर : 34.22 टक्के
4)बोईसर :32.5 टक्के
5)नालासोपारा : 30.35 टक्के
6)वसई : 34.53 टक्के -
Nanded Election Poll Percentage : धाराशिव जिल्ह्यात एकूण 28.15 टक्के मतदान
नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.15 टक्के एवढे मतदान झाले आहे.
– भोकर – 27.54 %
– देगलूर – 30.17 %
– हदगाव – 32.07 %
– किनवट – 33.47 %
– लोहा – 25.03 %
– मुखेड – 21.73 %
– नायगाव – 31.63 %
– नांदेड उत्तर – 27.64 %
– नांदेड दक्षिण – 24.70 % -
Dharashiv Election Poll Percentage : धाराशिव जिल्ह्यात एकूण 31.75 टक्के मतदान
धाराशिव जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यात एकूण 31.75 टक्के मतदान झाले आहे.
उस्मानाबाद विधानसभा – 30.52 %
परंडा – 30.04 %
तुळजापूर – 33 90%
उमरगा – 32.38 % -
Nandurbar Election Poll Percentage : नंदूरबार जिल्ह्यात एकूण 37.40 टक्के मतदान
नंदुरबार जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी समोर आली आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण 37.40 टक्के मतदान झाले आहे.
01- अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ- 34.00 टक्के
02- शहादा विधानसभा मतदारसंघ- 40.45 टक्के
03- नंदुरबार विधानसभा मतदारसंघ- 33.00 टक्के
04- नवापूर विधानसभा मतदारसंघ- 42.71 टक्के
-
Yawatmal Election Poll Percentage : यवतमाळ जिल्ह्यात दुपारी 1 पर्यंत 34 टक्के मतदान
यवतमाळ जिल्ह्यात दुपारी 1 वाजे पर्यंत झालेले 34.10 टक्के मतदान झालं आहे. आकडेवारी खालीलप्रमाणे –
1)आर्णी मतदारसंघ- 37.68
2) दिग्रस विधानसभा मतदारसंघ- 33.89
3) पुसद विधानसभा मतदारसंघ- 31.69
4) राळेगाव विधानसभा मतदारसंघ- 36.96
5) उमरखेड-32.10
6) वणी- 40.17
7) यवतमाळ- 28.10
-
Mumbai Election Poll Percentage : मुंबईत दुपारी 1 पर्यंत किती झालं मतदान ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून दुपारी 1 पर्यंत मुंबई शहरात 27.73 टक्के मतदान झालं आहे. तर मुंबई उपनगरांमध्ये 30.43 टक्के मतदान झालं आहे.
-
Maharashtra Election 2024 Poll Percentage : महाराष्ट्रात दुपारी 1 पर्यंत किती झालं मतदान ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी राज्यभरात एकाच टप्प्यात निवडणूक होत असून सकाळी 7 पासून मतदानाला सुरूवात झाली आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रात फक्त 32.18 टक्के मतदान झालं आहे. गडचिरोलीमध्ये ात्तापर्यंत सर्वाधिक मतदान झालं असून 50.80 टक्के मतदान झालंय.
-
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार, परळीत आम्ही – पंकजा मुंडे काय म्हणाल्या ?
सर्वांनी एकत्र येऊन लोकशाहीचा हक्क बजावला आहे, मतदान केलं आहे. महाराष्ट्रामध्ये खूप चांगली परिस्थिती आहे, शंभर टक्के महायुतीचं सरकार येईल . महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार असून परळी मध्ये आमचा रेकॉर्ड ब्रेक विजय होईल – पंकजा मुंडे यांना ठाम विश्वास
-
Maharashtra Assembly Election : ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी केलं मतदान
ज्येष्ठ लेखक, गीतकार गुलजार यांनी मतदानाचा हक्क बजावला.
#WATCH | Mumbai: Lyricist Gulzar says, “… People eagerly wait to turn 18 so that they can exercise their right to vote. Chosing a government is their right. And it is the responsibility of the media to ensure that youngsters come out to vote… The glamorous gifts which are… https://t.co/26tO12GpzP pic.twitter.com/jDsqexUC1l
— ANI (@ANI) November 20, 2024
-
Baramati Assembly Election : माझे पोलिंग एजंट धमकावण्याची भाषा वापरणार नाहीत – अजित पवार
शर्मिला पवार यांचा आरोप धादांत खोटा आहे. तसं काही झालेलं असेल तिथल्या सीसीटीव्हीमध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं असेल, निवडणूक अधिकारी चेक करतील. मी एवढ्या निवडणुका पार पाडल्या, पण कधीही आमच्या कार्यकर्त्यांनी अशी वक्तव्य केलेली नाही. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रात राहताना सुसंस्कृतपणा दाखवतो, माझा कार्यकर्ता कधीच असं वागणार नाही. माझे पोलिंग एजंट धमकावण्याची भाषा वापरणार नाहीत – अजित पवारांनी फेटाळले सर्व आरोप.
-
Navi Mumbai Election Poll Percentage : नवी मुंबईमध्ये 11 पर्यंत किती मतदान ?
नवी मुंबईमध्ये 9 ते 11 पर्यंत झालेलं मतदान टक्केवारी खालीलप्रमाणे –
ऐरोली विधानसभेमध्ये 17.72% मतदान तर बेलापूरमध्ये 17.89% मतदान झालं आहे.
-
Maharashtra Assembly Election : उल्हासनगरमध्ये भाजप उमेदवार पैसे वाटप करत असल्याचा आरोप
उल्हासनगरमध्ये भाजपचे उमेदवार कुमार आयलानी हे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुमार आयलानी यांच्या कार्यालयाबाहेर महिलांचा गोंधळ पहायला मिळत आहे. मनसे उमेदवार भगवान भालेराव यांनी भाजप उमेदवारावर हा आरोप लावला आहे.
-
Maharashtra Assembly Election : वरळीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडलं
वरळीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडलं. राज ठाकरे यांची खोटी सही असलेलं पत्र व्हायरल होत असल्याचा आरोप करण्यात आला. मनसेचा शिंदे गटाला पाठिंबा असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला होता.
-
Baramati Assembly Election : बारामतीमध्ये बोगस मतदान झालं – शरद पवार गटाचा आरोप
बारामतीमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे. मतदारांना दमदाटी केली जात असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला. मतदाना केंद्राबाहेर गोंधळाचं वातावरण आहे.
-
Maharashtra Assembly Election : ‘मरेपर्यंत लाल झेंडा सोडणार नाही, मरेन पण शरण जाणार नाही’ खोटे पत्र व्हायरल झाल्यावर नरसय्या आडम भडकले
माकपचे ज्येष्ठ नेते, सोलापूर मध्यचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या नावाने खोटे पत्र व्हायरल झालं आहे. माकपचे नरसय्या आडम यांनी भाजप उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा दिल्याचे खोटे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याचे समोर आले असून या संदर्भात आडम यांनी पोलीस आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. ‘मरेपर्यंत लाल झेंडा सोडणार नाही, मरेन पण शरण जाणार नाही’ आडम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
-
बुलढाणा – 100 वर्षांच्या आजींनी पार पाडलं मतदानाचं कर्तव्य
बुलढाणा – 100 वर्षीय वृद्ध महिलेने मतदान केंद्रात जाऊन केले मतदान. बुलढाण्यातील दुर्गाबाई चिंचोले या 100 वर्षीय वृद्ध महिलेने मस्तदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
-
Wadala Assembly Elections 2024 : यावेळेस नक्कीच नवनिर्माण होईल – मतदानानंतर अमेय खोपकरांना विश्वास
वडाळा विधानसभा मतदार संघात अमेय खोपकरांनी मतदान केलं. वडील विनोद खोपकर, स्वतः अमेय खोपकर आणि मुलगा ईशान यांनी केलं मतदान. यावेळेस नक्कीच नवनिर्माण होईल, वरळी विधानसभा मतदारसंघांमध्ये संदीप देशपांडे यांचा विजय नक्की होईल असा विश्वास अमेय खोपकर यांनी व्यक्त के
-
Maharashtra Assembly Elections 2024 : लातूरमधील टेंभूर्णी गावाचा मतदानावर बहिष्कार
लातूरमधील टेंभूर्णी गावाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावामध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या 25 वर्षांपासून ही मागणी करण्यात येत आहे. मात्र अद्याप त्यावर कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेलं नाही. त्यामुळे 900 ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला असून मतदान केंद्र ओस पडलं आहे.
-
Palghar Assembly Elections 2024 : पालघरमध्ये 11 वाजेपर्यंत एकूण मतदान किती ?
पालघरमध्ये सकाळी 11 पर्यंत सरासरी 19.40% मतदान झालं
मतदारसंघ टक्केवारी
1) 128- डहाणू : 23.01%
2) 129-विक्रमगड : 15.7%
3) 130-पालघर : 19.1%
4) 131-बोईसर :19.91%
5) 132-नालासोपारा : 18.54%
6) 133-वसई : 20.81% -
Maharashtra Assembly Elections 2024 : बुलढाणा – मतदान यंत्राची बॅटरी खराब झाल्याने 2 मतदान केंद्रांवरील मतदान थांबले
बुलढाणा – खामगाव मतदार संघातील गेरू माटरगाव व श्रीधर नगर येथील दोन मतदान केंद्रावरील मतदान यंत्राच्या बॅटरी खराब झाल्याने मतदान थांबले. गेल्या अर्ध्या तासापासून दोन्ही मतदान केंद्रावरील मतदान यंत्राच्या बॅटरी खराब झाल्याने मतदान थांबलेले आहे. अद्यापही दुसरे मतदान यंत्र या ठिकाणी पोहोचले नाही.
-
Nandurbar Assembly Elections 2024 : नंदुरबारमध्ये सकाळी 11 पर्यंत किती मतदान ?
नंदुरबारमध्ये सकाळी – 11 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी
01- अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ- 19.57 टक्के
02- शहादा विधानसभा मतदारसंघ- 24.98 टक्के
03- नंदुरबार विधानसभा मतदारसंघ- 17.57 टक्के
04- नवापूर विधानसभा मतदारसंघ- 24.58 टक्के
जिल्ह्यात एकूण 21.60 टक्के मतदान
-
Dharashiv Poll Percentage : धाराशिवमध्ये सकाळी 11 पर्यंत किती टक्के मतदान ?
धाराशिव मतदान आकडेवारी – सकाळी 11 वाजेपर्यंत
उस्मानाबाद विधानसभा – 15.92 %
परंडा – 15.86 %
तुळजापूर – 18.13 %
उमरगा – 17.36 %एकूण टक्केवारी – 17.07%
-
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात सकाळी 11 पर्यंत 18.14 टक्के मतदान
महाराष्ट्रात सकाळी 11 पर्यंत 18.14 टक्के मतदान झालं असून गडचिरोलीत सर्वाधिक 30 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. तर नांदेडमध्ये सर्वाधिक कमी 13.67 टक्के मतदान झालं आहे. सर्वांनी घराबाहेर पडा, मतदान करा, नेत्यांचे नागरिकांना आवाहन.
-
Parabhani Assembly Elections 2024 : परभणीमध्ये सकाळी 11 पर्यंत किती झालं मतदान ?
परभणी विधानसभा मतदारसंघात सकाळी 11 पर्यंत 19.62 टक्के मतदान झालं. तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघात 16.85 टक्के , पाथरी येथे 20.61 टक्के मतदान झालं. तसंच जिंतूर – सेलू विधानसभा सकाळी 7 ते 9 17.12 टक्के
-
Thane Assembly Elections 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा अधिकार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील मतदान केंद्रावर सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित होते.
#WATCH | Thane: After casting his vote, Maharashtra CM Eknath Shinde says, “Today is the festival of democracy and everyone should participate and vote and this will strengthen Maharashtra, democracy. People have not forgotten what happened in 2019, the mandate was for Mahayuti… pic.twitter.com/MrvO0RtKnV
— ANI (@ANI) November 20, 2024
-
धुळ्यात 10 हजार किलोच्या चांदीच्या विटा जप्त
धुळ्यात 10 हजार किलोच्या चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या आहेत. धुळे पोलिसांकडून एकूण 94 कोटी 68 लाख रुपयांच्या विटा जप्त करण्यात आल्या असून ती चांदी एचडीएफसी बँकेची असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
-
Maharashtra Assembly Elections 2024 : नवी मुंबई – नेरुळमध्ये मतदान केंद्राजवळ राऊटर आढळल्याने खळबळ
नवी मुंबईतील नेरूळमधील शिवाजीनगर मतदान केंद्राजवळ राऊटर आढळले. एका वाहनात हे राऊटर आढळले असून तुर्भे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
-
Dhule Assembly Elections 2024 : धुळे शहर मतदार संघातील विद्यावर्धिनी महाविद्यालयात मतदान यंत्र बंद..
धुळे शहरात दोन ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड , साक्री मतदारसंघातील जामदा येथे काही काळ मतदान केंद्रामध्ये बिघाड तर धुळे शहरातील विद्यावर्धिनी येथील मतदान केंद्रामध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली. मतदान यंत्र बंद पडल्याने मतदानाचा खोळंबा, काही काळ मतदारांना ताटकळत उभे राहण्याची वेळ आली होती. ही बाब लक्षात प्रशासनाने योग्य कारवाई करण्यासाठी पाऊले उचलली, मतदान पुन्हा सुरू.
-
Maharashtra Assembly Elections 2024 : वरळीकर सुज्ञ, शिंदे गटाला कोणताही पाठिंबा नाही – राज ठाकरे
जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मतदान कराव, राज ठाकरेंनी मतदारांना केलं आवाहन. वरळीत शिंदे गटाला कोणताही पाठिंबा दिलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.