AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Assembly Election : या पाच व्हीआयपी जागांवर रंजक लढत

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत आहे. या पाच ही जागांवर मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला आहे. त्यामुळे मतदार कोणाच्या पारड्यात मतदान करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Assembly Election : या पाच व्हीआयपी जागांवर रंजक लढत
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 19, 2024 | 5:30 PM
Share

देशातील सर्वात समृद्ध राज्य महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील जनता 20 नोव्हेंबरला मतदानाचा हक्क बजावणार आहे. विधानसभेच्या 288 जागांसाठी या दिवशी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडी आणि विरोधी पक्षांची महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापल्या विचारधारेच्या भूमिकेखाली मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केले आहे. तर शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट, शिवसेना-उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी-शरद पवार गट यांनीही जोरदार प्रचार केलाय.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 234 मतदारसंघ सर्वसाधारण, 29 अनुसूचित जाती (एससी) आणि 25 अनुसूचित जमाती (एसटी) साठी राखीव आहेत. या जागांसाठी एकूण 10 हजार 900 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये 3302 जणांनी माघार घेतली. तर 1649 जणांचे अर्ज बाद झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा या राष्ट्रीय नेत्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपापल्या पक्षांचा प्रचार केला. पण राज्यात अशा पाच जागा आहेत जेथे रंगतदार निवडणूक होणार आहे.

1. वरळी

मुंबईच्या वरळी विधानसभेच्या जागेवर यावेळी तिरंगी लढत होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शिंदे गटाचे मिलिंद देवरा रिंगणात आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे ही निवडणूक लढवत आहेत. मिलिंद देवरा हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. यूपीए-2 सरकारमध्ये ते मंत्री होते. संदीप देशपांडे स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहेत.

2. बारामती

बारामतीची जागा पवार घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र यावेळी पवार कुटुंबातच स्पर्धा आहे. या जागेवरून शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. जनता काका निवडून देते की पुतण्याला हे पाहणं येथे उत्सूकतेचं ठरणार आहे.

अजित पवार हे 1991 पासून सलग सात वेळा या मतदारसंघातून आमदार आहेत. तर युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत आहेत.

3. वांद्रे पूर्व 

काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले झीशान सिद्दीकी हे मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. बाबा सिद्दीकी यांची नुकतीच हत्या झाली होती, त्यामुळे झीशान सिद्दीकी यांना जनतेची सहानुभूती मिळू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. झीशान सिद्दीकी मुस्लीम समाजात लोकप्रिय चेहरा आहेत. तर वरुण सरदेसाई हे उद्धव ठाकरे यांचा पुतण्या आहे.

4. नागपूर दक्षिण पश्चिम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सलग चौथ्यांदा नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडधे रिंगणार आहेत.  2009 पासून नागपूर दक्षिण पश्चिममधून आमदार असलेले फडणवीस 2019 मध्ये 49,000 पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते. विकासकामांवर आणि भाजपच्या मजबूत संघटनात्मक पायावर त्यांची लोकप्रियता अवलंबून आहे.

काँग्रेसचे प्रफुल गुडधे हे स्थानिक समस्या आणि शहरी पायाभूत सुविधांतील त्रुटींवरून निवडणुकीच्या मैदानात उतरलेत.

5. कोपरी-पाचपाखाडी

या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केदार दिघे यांच्यात लढत आहे. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. आनंद दिघे यांच्या कौटुंबिक आणि भावनिक संबंधांमुळे केदारला स्थानिक मराठी मतदारांचाही पाठिंबा मिळू शकतो.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.