AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रात मृत्यू? नागपुरातल्या 2 मृतदेहांचा अहवाल काय?

नागपूर शहरातील मोरभवनजवळ 70 वर्षीय व्यक्ती तसेच गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत 34 ते 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय.

थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रात मृत्यू? नागपुरातल्या 2 मृतदेहांचा अहवाल काय?
Image Credit source: social media
| Updated on: Jan 07, 2023 | 4:04 PM
Share

गजानन उमाटे, नागपूरः राज्यातील विविध शहरांमध्ये आजही कडाक्याची थंडी  (Cold Wave)आणि गार वाऱ्यांचे सत्र सुरुच आहे. याच मालिकेत नागपुरातून (Nagpur) मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरात दोन व्यक्तींचे मृतदेह (Dead body) आढळले असून हे थंडीचे बळी असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. मागील दोन दिवसात दोन अनोळखी व्यक्तींचे मृतदेह सापडले आहेत. थंडी सहन न झाल्यामुळे या दोहोंचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

नागपूर शहरातील मोरभवनजवळ 70 वर्षीय व्यक्ती तसेच गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत 34 ते 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. हे दोन्ही जण कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपले असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्याही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समोर येईल.

उत्तर प्रदेशात 25 जणांचा मृत्यू

उत्तर भारतात राजधानी दिल्लीसह विविध राज्यांमध्ये थंडीचा प्रकोप पहायला मिळतोय. उत्तर प्रदेशात तर कालपर्यंत तब्बल 25 जणांचा मृत्यू थंडीमुळे झाल्याची घटना समोर आली आहे. अति थंडीमुळे हृदयविकार तसेच पक्षाघाताचा त्रास होऊन 25 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

जास्त थंडीत मृत्यू का होतात?

मानवी शरीराला अति थंडी सहन होत नाही. थंडी सहन न झाल्यास मृत्यूचीही शक्यता असते. हृदयविकार तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या दिवसात हृदय तसेच मेंदू यांच्या क्रियेवर परिाण होण्याची शक्यता असते. तसेच अतिशय कडाक्याची थंडी असल्यास रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या होतात. तसेच रक्तदाब वाढून लोकांना हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. अशी स्थिती उद्भवल्यास मृत्यूचीही शक्यता असते.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.