AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra DCM : तासा दोन तासांमध्येच नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची होणार घोषणा? राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान घडामोडी

अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे, त्यांच्या निधनानंतर आता नवा उपमुख्यमंत्री कोण असणार? याबाबत चर्चा सुरू झाली असून, राष्ट्रवादीमध्ये घडामोडींना वेग आला आहे.

Maharashtra DCM : तासा दोन तासांमध्येच नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची होणार घोषणा? राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान घडामोडी
Chhagan BhujbalImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 30, 2026 | 6:20 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांचा भीषण विमान अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे, अजित पवार यांचं अकाली निधन हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्रिपद देखील रिक्त झालं आहे. त्यामुळे आता नवा उपमुख्यमंत्रि कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात देखील वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार उद्या राष्ट्रवादीने पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक मुंबईमध्ये बोलावली आहे, या बैठकीमध्ये एकमुखानं नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यात आहे. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे, त्यामुळे पुढील काही तासांमध्येच नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

राष्ट्रवादीचे नेते  प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील. मीही त्यात होतो. धनंजय मुंडे देखील होते. आमचं असं साधारण असं ठरलं, उद्या सीएलपीची मिटिंग घेऊन सुनेत्रा ताईंचं नाव सीएलपी लीडर म्हणून फायनल करायचं आहे. पत्र निघालं नाही, कारण दुखवटा आहे. सुतक आहे. काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत. सुनील  तटकरे आणि प्रफुल्ल पटेल त्यात लक्ष घालत आहेत. येत्या तास दोन तासात आपल्याला त्याबद्दल कळेलच.

आज  विधान मंडळाचा प्रमुख म्हणजे सीएलपी लीडर नेमणे.  उपमुख्यमंत्री ठरवणे, हे महत्त्वाचं आहे.  बाकीच्या गोष्टी नंतरच्या आहेत. आज ते फार आवश्यक आहे. सरकार चालवायचं आहे. त्यात भाग घ्यायचा आहे. त्यामुळे पक्षाचा नेता ठरवला पाहिजे. त्याला आधी प्राधान्य देत आहोत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान काल रात्रीही  मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. उद्या शपथविधीसह इतर गोष्टी  करता येतील का असं विचारलं? तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला काही अडचण नाही, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता लवकरच राष्ट्रवादीकडून नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Follow Us
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल