AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मान्सून महाराष्ट्रात कधी सक्रिय होणार? हवामान विभागाचा अंदाज काय?

मे महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानंतर, महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार एन्ट्री केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पुणे वेधशाळेचा अंदाज १२-१३ जूनला मान्सूनचा पूर्ण प्रादुर्भाव असल्याचे सूचित करतो.

मान्सून महाराष्ट्रात कधी सक्रिय होणार? हवामान विभागाचा अंदाज काय?
maharashtra monsoon
| Updated on: Jun 04, 2025 | 2:04 PM
Share

यंदा मे महिन्यापासूनच सर्वत्र अवकाळी पाऊस सक्रीय झाला आहे. त्यातच आता महाराष्ट्रात मान्सूनने सक्रीय होण्यास सुरुवात केली आहे. सध्या मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूरसह मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यात मान्सूनचा जोर वाढणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यात १२ ते १३ जून दरम्यान मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ एस.डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या वाऱ्याची गती सध्या मंदावली आहे. यावर्षी सरासरी १०६ टक्के पाऊस अपेक्षित आहे. महाराष्ट्रातही यावर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, मात्र सर्वदूर पाऊस नसेल. राज्यात १२ ते १३ जून दरम्यान मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज सानप यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्ये जोरदार पाऊस

मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसानंतर आता रिमझिम पाऊस सुरू आहे. तर, दुसरीकडे अंधेरी, सांताक्रुज परिसरात कडक ऊन पडलं आहे. कांदिवली पश्चिम भागातही पाऊस कोसळत आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात काल रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र आता पावसाने जोर पकडला आहे. अचानक वाढलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडीचे चित्र आहे. मुसळधार पावसामुळे पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली. कल्याण सदानंद चौक परिसरात गटारीचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा

पुण्याच्या ग्रामीण भागात, विशेषतः चाकण आणि परिसरात, चार दिवसांच्या उसंतीनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा आहे. दुसरीकडे, पुण्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. आता शहरातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान

मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी सरकारने एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे वर्धा जिल्हा निरीक्षक वीरेंद्र जगताप यांनी राज्यपालांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करणार असल्याची माहिती दिली.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!