मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने (Maharashtra Rain Update) धुमाकूळ घातलेला आहे. अनेक जिल्ह्यांना पुन्हा झोडपून काढलेलं (Flood) आहे. काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्यासारखा पाऊस पडताना दिसत आहे. तर हवामान खात्याकडून (IMD Alert) हे पुढचे काही तास पावसाचे राहणारा असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही पावसाच्या कोसळधारा सतत सुरूच आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन ही करण्यात आलेले आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच पिकांची पेरणी झाल्याने त्यातच आता पावसाने कमबॅक केल्याने बळीराजा काहीसा सुखावला आहे. मात्र ज्या ठिकाणी जास्त पाऊस आहे, त्या ठिकाणी पिकं जाण्याची भीतीही शेतकऱ्यांना लागलेली आहे. सुरू असलेल्या पावसाच्या प्रत्येक वेगवान अपडेट तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात..
बाॅलिवूडची सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चव्हाण विरोधात शिवसेनेच्या शिव वाहतूक संघटनेमार्फत ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
पाकिस्तान स्पाॅन्सर्ड कार्यक्रम करत असल्याने केला विरोध
13 ऑगस्टला शनिवारी होणार आहे लाईव्ह कार्यक्रम
सुनिधी लाईव्ह हा कार्यक्रम मुंबईत देशात कुठेही होऊ नये यासाठी शिवसेनेचा विरोध
शिव वाहतूक सेना कार्यकारी प्रमुख गफ्फार शेख यांनी दिली तक्रार
राधानगरी – राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धरण 87 टक्के भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अवघे साडेसहा फूट पाणी कमी आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास चार ते पाच दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. आज (सोमवार) सकाळी चोवीस तासात धरण क्षेत्रात 150 मिमी पाऊस झाला आहे. जूनपासून आजअखेर 2563 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणातून खासगी वीजनिर्मितीसाठी 1600 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे.
यवतमाळच्या वरुड लघु प्रकल्पाच्या पाण्यात पती-पत्नी वाहून गेल्याची घटना घडली आहे. राळेगाव तालुक्यातील वरुड येथे हा प्रकार घडलाय. सुभाष राऊत (50) आणि सुरेखा राऊत (45) अशी या दोन्ही पती-पत्नींची नावे आहेत. हे दोघेही वन्यप्राण्यांचा हैदोस असल्याने रात्री जागलीसाठी शेतात गेले होते. सकाळी घरी परत येत असताना वरूड तलाव प्रकल्पाच्या सांडव्यावरुन एकमेकांचा हात धरून येत होते
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेले. ही घटना गावकऱ्यांना कळताच, त्यांना वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. गावाशेजारील नंदिनी नदीतून मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
मुंबई – उद्या सकाळी 11 वाजता राजभवनावर मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, एकूण 12 मंत्री उद्या शपथ घेणार असल्याची माहिती आहे. अधिवेशनापूर्वी विस्तार गरजेचा असल्याने छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या मंत्र्यांचा समावेश असेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्यात चर्चा झाली, अशी माहिती रामदास कदम यांनी दिली आहे.
दोन दिवसाच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री नांदेड दौऱा करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मी मंत्री-आमदार काहीही होणार नाही, असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले आहे.
नागपुरातील नाग नाल्याच्या पाण्यात एक मुलगा गेला वाहून
अग्निशमन विभागाने सुरू केलं सर्च ऑपरेशन
अग्निशमन विभागाला मिळाली होती माहिती
इमामवाडा परिसरातून वाहून घेल्याची माहिती
पाय घसरून पडल्याची माहिती
गोवा वाहतूक बंद
अंजनारी पुलावरची वाहतूक करण्यात आली बंद
गोव्याच्या दिशेने आणि मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक केली बंद
रत्नागिरीतील मंडणगडमधील भिंगळोली भागातील अपार्टमेंटमध्ये शिरलं पुराचे पाणी
सृष्टी अपार्टमेंट आणि समर्थ कृपा अपार्टमेंट येथील वसाहतीत पाणी भरले
ओढ्याचे पाणी शिरले वसाहतीमध्ये
ओढ्याला पाणी मोठा आल्याने काही भागात पाणी साचले
सांगलीतील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी
धरणातून पाण्याचा विसर्ग कधीही सोडण्यात येणार
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
शिर्डीत मुसळधार पाऊस
रात्री झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण
महावितरणचे सब स्टेशन , शासकीय विश्रामगृह, साई प्रसादालयाभोवती पाणीच पाणी
गुडघाभर पाण्यामुळे सेवा विस्कळीत
पाणी भरल्याने विज वितरण ठप्प
रात्री पासुन शिर्डीतील अनेक भागाचा विजपुरवठा खंडीत
साई प्रसादालयात जाताना भाविकांची तारांबळ
तर शासकीय विश्रामगृहाला पाण्याचा विळखा
पाणी काढण्यासाठी सुरू आहेत उपाययोजना
मुसळधार पावसाने शेतीही पाण्याखाली तर रस्ते देखील जलमय
पावसामुळे जनजिवन विस्कळीत
वाशिमच्या गिंभा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस
गावाला आलं नदीचं स्वरूप
वाशिम जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून संध्याकाळी अनेक ठिकाणी ढग फुटी सदृष्य पाऊस पडत आहे
अनेकांच्या घरात पाणी घुसून नुकसान झाले आहे
संततधार पावसाचा अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागांना मोठा फटका
पावसामुळे वरुड-मोर्शीसह आदी तालुक्यातील संत्रा गळला
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अंदाजे 250 कोटींचा फटका
आंबिया बहाराच्या संत्राचा शेतात सळा
संत्रा उत्पादक शेतकरी यंदाही अडचणीत
गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात पुन्हा सकाळपासून मुसळधार पावसाचा फटका
आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे पुन्हा एकदा बंद
कुमरगुडा आणि पार्लाकोटा या दोन पुलावर पाणी वाहत असल्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद
भामरागड भागात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याचे चित्र
भामरागड तालुक्यातील जवळपास 40 गावे जिल्हा मुख्यालयाच्या संपर्काशी बाहेर
सिंधुदुर्गात संरक्षक भिंत कोसळल्याने करूळ घाटातील वाहतूक बंद
वैभववाडी तालुक्यात दोन दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने याचा फटका करूळ घाटाला बसला आहे
रात्री 10 च्या सुमारास घाटातील संरक्षक भिंत कोसळली
अनुचित प्रकार घडू नये म्हणून या मार्गाने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे
फोंडाघाट व आंबोली घाटातून वाहतूक वळविण्यात आली आहे
रात्री 10 पासून करूळ घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात मुसळधार पाऊस
जाम नदीला मोठा पूर
वरुड-काटोल महामार्गावर भारसिंगी जवळ पुलावरून वाहत पाणी
दोन्हीकडील वाहतूक मध्यरात्री पासून झाली ठप्प
पन्हाळ्यावरील दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच
पन्हाळागडावर जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या मुख्य रस्त्यावरील अत्याधुनिक कठड्याच्या बाजूची जमीन सरकली
गेल्यावर्षी मुख्य रस्ता खचल्याने बांधण्यात आला होता कठडा
कठड्याच्या बाजूची जमीन सरकल्याने गडपायथ्याशी राहणारे नागरिक भयभीत
आज पहाटे च्या सुमारास घडली जमीन सरकल्याची घटना
गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात पुन्हा सकाळपासून मुसळधार पावसाचा फटका
आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे पुन्हा एकदा बंद
कुमरगुडा व पार्लाकोटा या दोन पुलावर पाणी वाहत असल्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी सध्या बंद आहे
भामरागड भागात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याचे चित्र
भामरागड तालुक्यातील जवळपास 40 गावे जिल्हा मुख्यालयाच्या संपर्काशी बाहेर
सिंधुदुर्गात आज तिसऱ्या दिवशी ही कोसळधारा
रात्री लागलेल्या पावसाने माणगाव येथील निर्मला नदीला पूर
निर्मला नदीवरील आंबेरी पुलावर पाणी
वाहतूक पुन्हा ठप्प.दोन्ही बाजूला गाड्या अडकल्या
वाहनचालक पाणी ओसरण्याची वाट पाहता आहेत
जनजीवन विस्कळीत
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी नाले दुथडी भरून वाहता
अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बहादा गावाला मुसळधार पाऊस आणि पुराचा फटका
नदीकाठच्या अनेक घरात पुराचे पाणी घुसलं
नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान
घराच्या भिंती कोसळल्या
कपडे,धान्य पुरात गेले वाहून
अनेक कुटूंब आले उघड्यावर
सिंधुदुर्गात आज तिसऱ्या दिवशी ही कोसळधारा.रात्री लागलेल्या पावसाने माणगाव येथील निर्मला नदीला पूर.निर्मला नदीवरील आंबेरी पुलावर पाणी.वाहतूक पुन्हा ठप्प.दोन्ही बाजूला गाड्या अडकल्या.वाहनचालक पाणी ओसरण्याची वाट पाहता आहेत. जनजीवन विस्कळीत. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी नाले दुथडी भरून वाहता आहेत.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदाद पाऊस सुरु
कोयना धरण पाणीसाठयात वाढ
धरण पाणीसाठा झाला 68.89 tmc
धरण पाणलोट क्षेत्रात
कोयनानगर 92 मिलीमिटर
नवजा115 मिलीमिटर
महाबलेश्वर 130मिलीमिटर
पाउसाची नोंद
मद्यरात्री ढग फुटी सदृश्य पाउस.
तुमसर तालुक्यातील धनेगाव सोनेगाव गावात सिरल पावसाचं पाणी .
चार ते पाच घरे जमीनदोस्त
तहसीलदार हे स्वतः घटनास्थळी पोहचले असून या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सद्या कुठलीही जीवित हानी झाली नाही.
मुंबईमध्ये मध्यरात्री पासून पाऊसांनि विश्रांती घेतली आहे
मात्र काही ठिकाणी रिपरिप पाऊस सुरू आहे
वातावरण ढगाळ पाहायला मिळत आहे
अमरावती जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच
अप्पर वर्धा धरणाचे सर्वच गेट उघडण्यात आल्याने वर्धा नदीला महापूर
अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
कौडण्यापूर – आर्वी व मोर्शी – आष्टी ची वाहतूक बंद
आजही अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
अमरावती जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील सोकी आणि ब्राम्हणी नदीला मोठा पूर
बहादा गावातील वार्ड नंबर एक मधील दहा पंधरा घर बुडाली
सातनुर गावातील अंदाजे 50 जनावरे वाहून गेल्याची प्राथमिक माहिती
अमरावती-वरुड महामार्ग बंद असल्याने माहिती
जरूड गावात आठवडी बाजार परिसर आणि बहादा फाटा परिसर पाण्यात
ग्रामस्थांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे
जिल्हा शोध व बचाव पथक पोहचणार असल्याची माहिती
नागपुरात आता पावसाला झाली सुरवात
मध्य रात्री चांगला पाऊस झाला
सकाळ पाऊस सुद्धा पावसाचं वातावरण आता झाली पावसाला सुरुवात
आज पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट
घाटमाथ्यावर अतिवृष्टीची दाट शक्यता
हवामान विभागाचा अंदाज
कोकणात ॲारेंज अलर्ट तर, मराठवाडा आणि विदर्भासाठी यलो अलर्ट
पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज
वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात रात्रीपासून पावसाच्या सरी
आताही सुरु आहे पावसाची जोरदार बॅटिंग
सतत सुरु असलेल्या पावसामुळे धरणक्षेत्राच्या पाणीपातळीत वाढ
देवळी तालुक्याच्या यशोदा नदीची पाणी पातळी वाढल्याने राळेगाव वर्धा मार्ग वाहतुकीकारिता बंद
वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोंढण्यपूर जाणारा आर्वी देऊरवाडा रस्ता बंद
सततच्या पावसामुळे शेतकरी चिंतेत
पहिलेच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान आता परत पावसाच्या सरीने नुकसान
रत्नागिरी – खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे कोसळली मोठी दरड
12 तासाहून अधिक रघुवीर घाट बंद
रघुवीर घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
रत्नागिरी जिल्हा आणि सातारा या दोन जिल्ह्यांना रघुवीर घाट जोडतो
घाटात मोठी दरड कोसळल्याची 15 दिवसातील 3 री घटना समोर
घाट सुरू करण्याचे युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू
रत्नागिरी-दक्षिण रत्नागिरीत सकाळपासून धुवाधार पाऊस
सर्वच नद्या दुथडी भरून
काजळी नदी पात्रा बाहेर
हवामान खात्याचा पावसाचा दिवसभर इशारा
रत्नागिरी राजापूर लांजा संगमेश्वर जोरदार पाऊस
अमरावती: मध्यप्रदेश मध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा संततधार पाऊस सुरू आहे,त्यामुळे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे व अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणामध्ये पाणीसाठा 89 टक्के पुढे गेला आहे.त्यामुळे धरणाचे सर्वच 13 ही दरवाजे पहिल्यांदा तब्बल 230 सेमी उघडल्यामुळे मोर्शी वरून वर्धा कडे जाणाऱ्या रस्त्यावर सात फूट पाणी आल्याने मोर्शी वरून अमरावती व वर्धा जिल्हाचा संपर्क तुटला, अप्पर वर्धाच्या पुलावरून पाणी जात असल्याने मोर्शी व आष्टीची वाहतूक सकाळ पासून बंद ठेवण्यात आली आहे,तर या धरणाचे पाणी वर्धा नदीला सोडण्यात आल्याने वर्धा नदीला महापूर आला आहे त्यामुळे दुपार नंतर जिल्ह्यात पूरस्थीती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही
नागपूर जिल्ह्यातील 75 तलावांचे झाले खोलीकरण
खोलीकरण झालेले तलाव तुडुंब भरले
कामे पूर्ण झालेल्या तालावांवर 15 ऑगस्ट ला झेंडा वंदन आणि वृक्षरोपन केलं जाणार
अमृत सरोवर योजने अंतर्गत करण्यात आले काम
काही तलावात मासेमारी सुद्धा केली जाणार
नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर 15 हून अधिक पर्यटक अडकले
रात्री उशिरा पर्यटकांना रेस्क्यु करण्यात रेस्क्यू टिमला यश
अचानक वाढलेल्या पावसाने पाण्याची पातळी वाढल्याने पर्यटक अडकले
रात्री 11 वाजे पर्यंत पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश
उर्वरित एका पर्यटकाचा बचावासाठी रेक्यू सुरू
पर्यटक अडकलेलं ठिकाण डोंगराच्या कपारी आणि पाण्याच्या अतिवेगाने होणाऱ्या प्रवाहजवळ असल्याने रेस्क्युमध्ये अडथळे
अडकलेल्या पर्यटाकांपैकी 1 पर्यटक वाहून गेल्याची भीती
आजही मुसळधारेचा अंदाज
मुंबई, ठाणे आणि पालघरला 5 दिवस ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याचा अंदाज
तर काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय
मच्छिमारांनाही हवामान खात्याकडून इशाराही देण्यात आलाय
पुढचे दोन दिवस समुद्रात न जाण्याच्या सूचना
परिसरातील शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे शेतकऱ्यासह बैलाचे वाचले प्राण
सुदैवाने कुठलही जिवीत हानी नाही
पूर ओसरल्यावर परिसरातील शेतकऱ्यांनी बैलगाडी काढली बाहेर
सेनगाव तालुक्यातील साखरा शेत शिवारातील घटना
उद्याच्या पावसाचा अंदाज मार्गदर्शन,कोकण आणि घाट भागात pic.twitter.com/GmSO5jsIaA
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 7, 2022
? 7 August.?☔
IMD ने महाराष्ट्रासाठी 5 दिवसांच्या तीव्र हवामानाच्या चेतावणी दिल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सून जोरदार (vigorous) होण्याची शक्यता.
कृपया दररोज अद्यतने तपासा.
काही ठिकाणी पुरजनक परिस्थितीची शक्यता. नदीकाठच्यांनी सावध प्लीज
काळजी घ्या pic.twitter.com/taJzTRifaj— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 7, 2022
Widespread rainfall activity with heavy to very heavy rainfall at a few places with extremely heavy rainfall at isolated places is expected over Konkan and adjoining ghat areas of Madhya Maharashtra during next 5 days pic.twitter.com/JxboipjVeW
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 7, 2022
विजांच्या कडकडाटासह इगतपुरीसह तालुक्यात काही भागात मुसळधार पावसाला सुरवात
हवामान खात्याने सुद्धा वर्तविला होता पावसाचा अंदाज
गेल्या काही तासांपासून जोरदार हवेसह पावसाचा तडाखा कायम
पावसाच्या लहरीपणामुळे बळीराजा चिंताग्रस्त
चिपळूण मध्ये मुसळधार पाऊस पडतोय. तरी मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट सुरळीत सुरू आहे. दर तासाला या परशुराम घाटाची पाहणी केली जातेय. या घाटाची पाहणी करतानाचा व्हिडिओ जिल्हा प्रशासनानं सोशल मीडिया वरती पोस्ट केलाय.