Maharashtra News LIVE : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची पाऊस आणि पेरण्यांबद्दल मोठी माहिती..

Maharashtra News LIVE Updates In Marathi: सिंहस्थपूर्वी नाशिकला तब्बल 9,129 कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. आयुक्त मनीषा खत्री यांच्या आर्थिक नियोजनामुळे अर्बन चॅलेंज फंडातून 277 कोटींचा निधी. नाशिक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्टसाठी 58.50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra News LIVE : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची पाऊस आणि पेरण्यांबद्दल मोठी माहिती..
Breaking news
| Edited By: | Updated on: Jul 16, 2026 | 9:16 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 16 Jul 2026 09:50 AM (IST)

    शेतीच्या वादातून पुतण्याने केली चुलत्याची हत्या, लातूर येथील धक्कादायक प्रकार

    लातूर जिल्ह्यातल्या हरीजवळगा इथं शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. राजेंद्र चव्हाण ( वय 60) अस हत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीची वाटणी कमी जास्त आल्याच्या वादातून डोक्यात दगड घालून ही हत्या करण्यात आली आहे. आरोपी मुरली चव्हाण याला कासार शिरशी पोलिसांनी अटक केली आहे.

  • 16 Jul 2026 09:40 AM (IST)

    अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी त्यांच्या घरावरच लावला शरद पवारांचा फोटो असलेले पक्षाचे बॅनर..

    जळगावात अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी त्यांच्या घरावरच लावला शरद पवारांचा फोटो असलेले पक्षाचे बॅनर.. जळगावात गणेश कॉलनी येथील निवासस्थानी जिल्हाध्यक्षांनी लावलेल्या अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाच्या बॅनर वर शरद पवारांचा फोटो झळकला आहे.. या बॅनरवर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल खासदार पार्थ पवार याचे देखील फोटो आहेत..


  • 16 Jul 2026 09:30 AM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यातील १५१ कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश

    सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमता नसल्याच्या ८३२ तक्रारी. जिल्हाधिकाऱ्यांनी कंपन्यांना धरले जबाबदार. १५१ कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिले असून, तर ३८ परवाने निलंबित केले आहेत. १५ परवाने कायमस्वरूपी रद्द केले तर आठ प्रकरणांमध्ये फौजदारी कारवाई करण्यात आली आहेत

     

  • 16 Jul 2026 09:20 AM (IST)

    वसई विरार मधील महापूरानंतर महावितरणचा प्राथमिक कृती आराखडा तयार

    नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी वीजवाहक तारा भूमिगत करण्यासाठी पाचूबंदर, अर्नाळा, आगाशी, वटार, विरार आणि नालासोपारा या किनारपट्टी भागांचे सर्वेक्षण करून वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम पूर्ण करण्यासाठी महावितरण च्या हालचाली सुरू. नैसर्गिक आपत्ती सौम्यीकरण योजनेअंतर्गत शासनाने २११ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर केले असून, या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती

  • 16 Jul 2026 09:16 AM (IST)

    एल निनोच्या संकटाला सर्वांनाच सामोरे जावे लागतंय- दत्ता भरणे

    कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकताच मोठी माहिती सांगितली. दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यात काही भागात जास्त तर काही भागात कमी पाऊस झाला. खरीपाची 70% पेरणी पूर्ण झाली असून, अद्याप 30% पेरणी खोळंबलेली आहे. एल निनोच्या संकटाला सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस चांगला पाऊस होईल


  • 16 Jul 2026 09:05 AM (IST)

    दिल्लीत सर्व खासदारांची एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यासोबत झाली सकारात्मक बैठक

    अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत मंत्रीपदाबाबतही सहा खासदारांची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेतून आपल्या पक्षात आलेल्या सहा खासदारांचा योग्य तो सन्मान होणार , विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी दिली ग्वाही. एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाल्याने पुन्हा आमपरेशन टायगर सक्रिय होण्याची चर्चा सुरू…

  • 16 Jul 2026 08:57 AM (IST)

    तरुणाचे केस कापून अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली

    नालासोपा-यात एका तरुणाचे केस कापून एका टोळक्याने भर रस्त्यात अर्धनग्न अवस्थेत तरुणाची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तरुणाने एका महिलेची छेड काढल्याने त्याची धिंड काढल्याचा आरोप करण्यात येत आहे. अर्धनग्न अवस्थेत तरुण भर रस्त्यातून चालताना, त्याच्या मागे मोटरसायकल वर एक टोळक असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

  • 16 Jul 2026 08:51 AM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यातील 151 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश

    यवतमाळ जिल्ह्यातील 151 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश. सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता नसल्याच्या 832 तक्रारी मिळाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कंपन्यांना धरले जबाबदार. 151 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिले असून 38 परवाने निलंबित केले आहेत. 15 परवाने कायमस्वरूपी रद्द केले. आठ प्रकरणांमध्ये फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांची धडक कारवाई.

  • 16 Jul 2026 08:42 AM (IST)

    कल्याण -आंबिवली रेल्वे स्थानका दरम्यान गँगची पुन्हा दहशत!

    धावत्या एक्सप्रेसमधील प्रवाशाच्या हातावर काठीने फटका मारून 30 हजारांचा मोबाईल केला लंपास. कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू. कल्याण -आंबिवली दरम्यान फटका गँग पुन्हा सक्रिय झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण.

  • 16 Jul 2026 08:26 AM (IST)

    खरीप हंगामातील धान पिकाची नर्सरी (पर्हे) धोक्यात

    गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील धान पिकाची नर्सरी (पर्हे) धोक्यात आली आहे. पाऊस नसल्याने कोवळी रोपे सुकू लागली असून, ही रोपे वाचवण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत आहेत. अशाच एका भागात, पाणी उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्याला दूरवरून बादलीची कावड बनवून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.

  • 16 Jul 2026 08:07 AM (IST)

    मध्य रेल्वेकडून विशेष वाहतूक ब्लॉक

    मध्य रेल्वेने मशीद -सँडहर्स्ट रोड दरम्यान स्लीपर बदलण्याच्या कामासाठी 16 जुलैपासून 19 जुलैपर्यंत चार मध्यरात्री सीएसएमटी-वडाळा रोड दरम्यान विशेष वाहतूक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज रात्री १.१५ ते पहाटे ४.१५ या वेळेत हा ब्लॉक असेल. या काळात हार्बर मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येणार असून काही लोकल वडाळा रोडपर्यंतच धावतील.

  • 16 Jul 2026 08:05 AM (IST)

    मुंबईत केवळ ढगांची दाटी

    मुंबई शहरात आणि उपनगरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. अवघ्या चार-पाच दिवसांत मुंबईत जुलैच्या सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने मुंबईसह उत्तर कोकण प्रदेशात विश्रांती घेतली असून आषाढ महिना सुरू झाला तरीही केवळ ढगांची दाटी दिसून येत आहे

  • 16 Jul 2026 08:04 AM (IST)

    गावातील विहिरीत आढळली चक्क मगर

    सोलापूरच्या कोरवली गावातील विहिरीत चक्क मगर आढळली. संभाजी जमदाडे या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत मोठी मगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सोलापूर वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून या मगरीला ताब्यात घेतले. शेतातील विद्युत पंप बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीच्या कडेला ही मगर दिसली. दरम्यान वन विभागाने त्या मगरीला पडकून नैसर्गिक अधिवासात सोडले.

  • 16 Jul 2026 08:03 AM (IST)

    जळगावमध्ये 30 वर्षीय विवाहितेचं मुलासह अपहरण करून तिच्यावर अत्याचार

    जळगावच्या अमळनेर तालुक्यात 30 वर्षीय विवाहितेचं मुलासह अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी सुदाम भगवान भिल्ल याला अटक करण्यात आली आहे. सोन्याचे दागिने करण्यासाठी पैसे देतो, असं आमिष दाखवून 30 वर्षीय विवाहितेचं तिच्या मुलासह अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे.

मागच्या काही दिवसांपासून गायब असलेला पाऊस पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करु शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 20 जुलैपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळू शकतो. आज काही भागात पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण होत आहे. दरम्यान यंदा पावसाला उशिराने सुरुवात झाली आहे. त्यामुळे बळीराज चिंतेत आहे. काही भागात पेरण्या रखडल्या आहेत. दरम्यान मुंबईत लोकांना उकाड्याचा अनुभव येत आहे. मुंबई शहरात आणि उपनगरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. अवघ्या चार-पाच दिवसांत मुंबईत जुलैच्या सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने मुंबईसह उत्तर कोकण प्रदेशात विश्रांती घेतली असून आषाढ महिना सुरू झाला तरीही केवळ ढगांची दाटी दिसून येत आहे.

Follow Us