AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

E20 पेट्रोलमुळे वाहन खराब, कोर्टाचा मोठा निकाल, थेट कंपनीला द्यावी लागणार नवीन कार आणि..

E20 इंधनाची जोरदार चर्चा सुरू आहे. इथेनॉलच्या वापरासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आग्रही आहेत. त्यामध्येच आता E20 इंधनामुळे कार खराब झाल्याची घटना पुढे आली. ज्याने एकच मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे.

E20 पेट्रोलमुळे वाहन खराब, कोर्टाचा मोठा निकाल, थेट कंपनीला द्यावी लागणार नवीन कार आणि..
E20
| Updated on: Jul 16, 2026 | 9:40 AM
Share

E20 इंधनाबाबत मोठी चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी E20 साठी आग्रही आहे. इथेनॉल इंधनाचा अनेकांनी विरोध केला. विविध चर्चा याबाबत सध्या सुरू आहेत. E20 इंधनाचा पुरवठा देखील सुरू आहे. याबात आता कोर्टान पहिल्यांदाच मोठे आदेश दिली आहेत. छत्तीसगडमधील रायपूर येथील ग्राहक न्यायालयाने वाहनमालकाच्या बाजूने निकाल दिला आहे. या प्रकरणात कार मालकाचा आरोप होता की, E20 इंधनामुळे त्याच्या कारचे मोठे नुकसान झाले. वारंवार त्याने दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला पण त्यामधून समस्या काही सुटत नव्हती. उलट सतत दुरूस्ती केल्याने अधिकचे पैसे लागले. गाडी मालकाचे म्हणणे होते की, मी माझ्या गाडीत E20 इंधन टाकल्यापासून मोठ्या समस्या निर्माण झाल्या. इंजिनवर त्याचा परिणाम झाला आणि मिसफायरिंग तसेच यासोबतच मायलेजही कमी झाले. गाडी वारंवार दुरूस्तीसाठी दिली पण समस्या काही कमी झाली नाही.

ज्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. E20 पेट्रोलमुळे गाडी खराब झाल्याचा दावा वारंवार गाडी मालकाकडून करण्यात आला. वाहन उत्पादक आणि विक्रेत्याने असा दावा केला की, संबंधित वाहन मॉडेल E20 इंधनासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. वाहनातील बिघाडांसाठी मालकच जबाबदार होता. कारण हा बिघाड अयोग्य देखभाल आणि वापरामुळे झाला.

पण कोर्टाने थेट गाडीच्या मालकाला दिलासा दिला. कारण गाडी मालकाचे म्हणणे होते की, ही गाडी 2024 मध्ये खरेदी केली होती, त्यावेळी गाडी व्यवस्थित चालत होती. मात्र, E20 इंधन टाकल्यापासूनच गाडीला समस्या सुरू झाल्या. गाडीच्या मालकाने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीविरोधात खटला दाखल केला होता.

सुनावणीदरम्यान कोर्टाने कंपनीला आदेश दिला की, तक्रारदाराला 45 दिवसांच्या आत त्याच मॉडेलची कार उपलब्ध करून द्यावी. ही गाडी E20 इंधनावर चालण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. जर तसे नसेल तर कारची संपूर्ण किमत म्हणजेच 20 लाख 50 हजार परत मालकाला द्यावेत. ही मोठा दणका कंपनीला देण्यात आला.

Follow Us
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधव...
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... शिवसेना सुनावणीआधीच...
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदे धावले
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!