मोठी बातमी, अजून चार आरोपींना दिलासा, मग मालेगावमध्ये बॉम्बस्फोट घडवला कोणी?
या आधी या प्रकरणातील 11 जणांची निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर वरील लोकांवरती आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयात पाठवले. आता तर तेही निर्दोष सुटल्याचं समोर येत आहे.

मालेगाव येथे 2006 साली बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणातील सर्व चार आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी 2006 च्या मालेगाव स्फोट प्रकरणातील चारही आरोपींवर दोषारोप निश्चित करणारा आदेश रद्द केला. या निकालामुळे आरोपींची या प्रकरणातून प्रभावीपणे मुक्तता झाली असून त्यांच्यावरील खटल्याची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. त्यांच्यावरील आरोप तांत्रिक दृष्ट्या बसत नसल्याने कोर्टाने हा निर्णय दिला आहे. लोकेश शर्मा, धन सिंग, राजेंद्र चौधरी, मनोहर नरवारिया या चारही आरोपींना दिलासा मिळाला आहे. मशिदीजवळ झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात 37 जणांचा मृत्यू झाला होता.
या आधी या प्रकरणातील 11 जणांची निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर वरील लोकांवरती आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयात पाठवले. आता तर तेही निर्दोष सुटल्याचं समोर येत आहे. त्यांच्यावरील आरोप पत्र रद्द करण्यात आले आहे. यापूर्वी मालेगाव प्रकरणात ज्या अकरा लोकांची न्यायालयाने मुक्तता केली होती, त्यांच्या विरोधात NIA ने न्यायालयात जाऊन आरोप केले होते. मग आता आरोपपत्र रद्द झालेल्या चारही आरोपींच्या विरोधात न्यायालयात जाणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली तर ब्लास्ट घडवला कुणी? असा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.
त्यांची सुटका झाली होती
स्फोटानंतर 19 वर्षांनी मागच्यावर्षी विशेष कोर्टाने चौघांविरोधात आरोप निश्चित केले होते. 2016 साली या प्रकरणात नऊ जण निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. त्यांची सुटका झाली होती. 2006 साली ATS ने त्यांना अटक केली होती. नंतर NIA ने हा तपास आपल्या हाती घेतला. मक्का मशिद बॉम्ब स्फोट प्रकरणात 2007 साली गुन्हा दाखल झाला. 2011 साली एनआयएने हा तपास आपल्या हाती घेतला. डिसेंबर 2012 ते जानेवारी 2013 दरम्यान चारही आरोपींना अटक झाली. मागच्यावर्षी 31 जुलैला 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. यात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक जण जखमी झाले होते
