AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार इतके नालायक असू शकते…आता छातीवर गोळ्या पडल्या तरी माघार नाही…मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यात अश्रू

maratha reservation issue | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी येथून निघणार आहे. मुंबईत निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर मोठा हल्ला केला. सरकार इतके नालायक असू शकते...असा घणाघात त्यांनी केला.

सरकार इतके नालायक असू शकते...आता छातीवर गोळ्या पडल्या तरी माघार नाही...मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यात अश्रू
| Updated on: Jan 20, 2024 | 9:06 AM
Share

संजय सरोदे, जालना, दि.20 जानेवारी 2024 | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी येथून निघणार आहे. मुंबईत निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते भावूक झाले अन् आक्रमक झाले. आता प्राण गेले तरी माघार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. मराठ्यांच्या अंगावर आरक्षणाचा गुलाल लागणारच आहे. अंतरवलीतून मी जरी एकटा निघत असलो तरी मुंबईमध्ये तीन कोटी लोक येणार आहेत. मी गमिनी कावा करणार आहोत. सर्व काही आताच सांगणार नाही. आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे आम्ही केले आहेत. मराठ्यांनो आता ही शेवटची लढाई आहे. आता घरी राहू नको. जे मुंबईला जातील त्याला सोडण्यास इतर मराठ्यांनी जावे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

सरकार इतके नालायक असू शकते…

आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. या आंदोलनात शेकडो मराठे शहीद झाले आहेत. अनेक माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले आहे. अनेक घरातील कर्ता पुरुष गेला आहे. परंतु त्यानंतर सरकारने आरक्षण दिले नाही. आपली मुले मरत असताना सरकारला झोप कशी येते? सरकार इतके नालायक असू शकते का? सरकार निर्दयी आहे. निष्ठूर आहे.  मराठा समाजाबद्दल हा सर्व विचार करताना मला रात्ररात्र झोप येत नाही. यामुळे आता आरपारची लढाई करण्याचा निर्णय मी घेतला आहे.

आता मी शहीद झालो तरी माघार नाही. माझ्या छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही. मराठयांसाठी टोकाचे पाऊल उचलणार आहे. सरकारच्या दारात मरण आले तरी आता माघार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही.

मी एकटा निघतो…पण तीन कोटी मराठा येतील

येथून मी एकटा निघतो. परंतु मुंबई जवळ आल्यावर तुम्हाला कोट्यवधी दिसतील. मुंबईत तीन कोटी मराठा दिसणार आहे, असे आमचे नियोजन झाले आहे. आम्ही अनेक गोष्टी उघड केल्या नाहीत. सरकार ज्या पद्धतीने वागणार तशी आमची रणनीती तयार आहे. मराठा मुलांनी आपले अंथरुण, पांघरुन, जेवणाचे साहित्य सोबत घ्या. सर्वांनी शिस्तीत यावे. व्यसन करु नका. गोंधळ करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देत, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.