AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा करताच सरकार दरबारी हालचालींना वेग, मुंबईतून मोठी बातमी

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे, ते येत्या 30 मे पासून उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. मोठी बातमी समोर येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा करताच सरकार दरबारी हालचालींना वेग, मुंबईतून मोठी बातमी
manoj jarange patilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 28, 2026 | 10:00 PM
Share

मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. आज त्यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठी घोषणा केली आहे. ते येत्या 30 मे पासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहेत. आपण रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. आपण सरकारला दहा महिन्यांचा वेळ दिला,  29 मे रोजी दहा महिने पूर्ण होत आहेत, सरकारला अजून किती वेळ द्यायचा? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय केला जात आहे, त्यामुळे आता कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे, मला कोणाला दोष द्यायचा नाहीये, परंतु जर गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय होत असेल तर कठोर भूमिका घ्यावी लागेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या या इशाऱ्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे.  मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वाहनाने मुंबईकडे रवाना झाले आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विखे पाटलांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.  या बैठकीनंतर ते उद्या दुपारी बारा वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहेत. इथे विखे पाटील यांची विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.  या बैठकीनंतर विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान त्यापूर्वी गुरुवारी दुपारी राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद देखील पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले की मी सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहे, आणि या सगळ्या विषयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय सकारात्मक आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील हे शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा