AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये; उद्या घेणार संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट, नवा इशारा काय?

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. उद्या मनोज जरांगे पाटील हे देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत.

मनोज जरांगे पाटील पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये; उद्या घेणार संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट, नवा इशारा काय?
| Updated on: Dec 24, 2024 | 4:44 PM
Share

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.  संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेलं नाहीये, त्यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी राज्यभरातून होत आहे. दरम्यान उद्या पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.  कुणाचा बापही आला तरी देखील संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण दबू देणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. दुसरीकडे ते परभणीमध्ये जाऊन सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाची देखील भेट घेणार आहेत.

असा असणार मनोज जरांगे पाटील यांचा दौरा?

मनोज जरांगे पाटील उद्या 12 वाजता परभणीला जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांचा आज रात्रीचा मुक्काम परभणी जिल्ह्यामधील पूर्णा तालुक्यातील दामपुरी येथे असणार आहे. त्यानंतर ते उद्या सकाळी 9 वाजता आलेगाव आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता परभणी येथे जाणार आहेत. ते तिथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

दरम्यान उद्या दुपारनंतर मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. कुणाचा बापही आला तरी देखील संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण दबू देणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.   28 तारखेला बीड येथे होणाऱ्या मोर्चामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहनही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. या मोर्चात स्वत: मनोज जरांगे पाटील देखील सहभागी होणार आहेत. दरम्यान यापूर्वी देखील एकदा मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे, त्यावेळी देखील त्यांनी पोलीस यंत्रणांना इशारा दिला होता.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.